शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

वाढीव घरांचा पायाभूत सुविधांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:59 IST

एलआयजीच्या घरांची संख्या दहापट वाढली : सांडपाणी व्यवस्थापनाची यंत्रणाही कोलमडली

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कळंबोलीतील एलआयजी कॉलनीत एकाची दहा ते अकरा घरे झाली आहेत. त्यामुळे पाणी, मलनि:सारण आणि वीजवितरणला अडचणी येत आहेत. या पायाभूत सुविधांवर परिणाम होत आहे. ही वाढीव बांधकामे आजच्या घडीला सर्व यंत्रणांची डोकेदुखी ठरत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात सिडकोला अपयश असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यात ही गुंतागुंत आणखी वाढण्याची चिन्ह दिसू लागले आहे.

कळंबोलीत अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी सेक्टर १, २, २ ई ३ ठिकाणी बैठी घरे बांधली. या भागाला एलआयजी कॉलनी असे संबोधले जाते. तिथे अनेकांनी घरे घेतली. कालांतराने या ठिकाणी जवळपास सगळ्याच जणांनी दोन ते तीन मजले वाढविले आहे. एका मजल्यावर तीन ते चार खोल्या बांधल्या. कित्येकांनी त्या भाडेतत्त्वावर सुद्धा दिल्या. रस्त्याच्या बाजूला खाली दुकान आणि वरती मकान अशी परिस्थिती आहे. त्या घरांचा व्यावसायिक वापर सुरू आहे, तरी सुद्धा पाणीपट्टी घरगुती वापराची भरली जाते. दहा ते अकरा घरांचे फक्त सव्वाशे रुपये इतके पाणी बिल आहे. मागणीच्या तुलनेत पाणी कमी येत असल्याने या वाढीव घरांना पाणी देणे कठीण आहे. त्याशिवाय या जलवाहिन्यांवर काहींनी बांधकाम केले आहेत. त्यामुळे पूर्णपणे जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलण्याकरिता अडचणी येत आहेत.

मलनि:सारण वाहिन्यांचीही तीच गत आहे. जितकी बैठी घरे होती त्याचनुसार येथे वाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र आता इमले चढविण्यात आल्याने मलनि:सारण वाहिन्या तुंबतात. त्यामुळे कित्येक घरांमध्ये हे मलमिश्रित पाणी साचते. तसेच इमारतीच्या आजूबाजूला सांडपाण्याचे डबके साचतात. जितके मूळ घरे तितकीच मलनि:सारण वाहिनी त्यात बदल होणार नसल्याने भविष्यात येथील मलनि:सारणाचा प्रश्न निकाली निघणे कठीण असल्याचे सिडकोचे अधिकारी खाजगीत सांगतात.वसाहत समुद्रसपाटीपासून खाली असल्याने ही घरे बांधली आहेत ती सिडकोने कायम करावी ही जुनी मागणी असल्याचे पनवेल महानगर अपार्टमेंट ओनर्स संस्थेचे अध्यक्ष आत्माराम गावंड यांनी सांगितले.विद्युत सुविधेवरही ताणएलआयजीमध्ये मूळ घरांना लागणारी वीज विचारात घेऊन त्याच क्षमतेच्या वीजवाहिन्या या परिसरात टाकण्यात आल्या होत्या. परंतु एकाची दहा घरे झाल्याने आता विजेची मागणीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे जी वितरण व्यवस्था आहे त्यावर ताण पडत आहे. 

बैठ्या घरांना सुरुवातीलाच ज्या मूलभूत सुविधा दिल्या आहेत त्याच सिडकोे देणार.त्यात वाढ करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही कारण वाढीव घरे परवानगी घेऊन बांधले नाहीत. या घरांचा पुनर्विकास झाल्यानंतरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो- सीताराम रोकडे,अधीक्षक अभियंता, सिडकोआता जी परिस्थिती एलआयजीमध्ये झाली आहे त्याला सिडको जबाबदार आहे कारण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नियंत्रण न ठेवल्यामुळे घरांची संख्या वाढली ही वस्तुस्थिती आहे. त्यानुसार वाढीव लोकसंख्येनुसार सिडकोने पायाभूत सुविधा द्याव्यात.- आत्माराम कदम,रहिवासी, कळंबोली