शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

पूरस्थितीमुळे स्थलांतरित डुंगी ग्रामस्थ चिंतेत; ओस पडलेल्या गावात चोरीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 04:25 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत.

- वैभव गायकरपनवेल : अतिवृष्टीमुळे डुंगी गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण गावाला करंजाडे येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले. येथील शाळेमधील दोन वर्गात या ग्रामस्थांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्थलांतरित केलेले डुंगी ग्रामस्थ गावात चोरीच्या भीतीने चिंतेत आहेत.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत. मागील वर्षी देखील गावात पुराचे पाणी शिरले होते. मध्यंतरी डुंगी गावाचे देखील पुनर्वसन करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तास प्रस्ताव सिडकोने शासनाकडे पाठविला आहे. मात्र गावात शिरलेल्या पाण्यामुळे संपूर्ण गावाचे येथील कारंजाडे शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित केल्यानंतर संपूर्ण डुंगी गाव ओस पडले आहे. ग्रामस्थांचे स्थलांतर केले असले तरी घरातील मौल्यवान वस्तू, सर्व सामान घरात असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. करंजाडे येथील गावातील शाळेतील दोन वर्गात ग्रामस्थांची राहायची व्यवस्था करण्यात आली आहे. सिडकोने वेळीच योग्य भूमिका घेतली नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरु आहेत. दरम्यान पावसाळ्यात ग्रामस्थांनी बाहेर राहण्यासाठी तहसील प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना ५0 हजारांची मदत तहसीलदार अमित सानप यांनी केली. त्यानुसार बुधवारी ५0 हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये १११ कुटुंबांना धनादेशाचे वाटप करण्यात आले तर उर्वरित ३0 कुटुंबाची चाचपणी सुरु असल्याचे सानप यांनी सांगितले. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी स्थलांतरित ग्रामस्थांची भेट घेवून सहकार्याचे आश्वासन दिले होते.पोलीस बळ पुरविण्याची मागणीस्थलांतरित झाल्यानंतर गाव ओस पडले आहे. गावातील विद्युत पुरवठा देखील बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रात्री चोरीची घटना होऊ शकते. अशा परिस्थितीत गावात विद्युत पुरवठा सुरळीत करून गावात पोलीस बंदोबस्त द्यावा जेणेकरून गावात अनुचित प्रकार होणार नसल्याची मागणी ग्रामस्थ महेंद्र पाटील, मधुकर नाईक यांनी केली आहे.बंबावी कोळीवाड्यालादेखील भरपाई द्याबंबावी कोळीवाड्यात देखील पूरसदृश स्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे.अनेक घरात पाणी शिरल्याने येथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाल्याने या ग्रामस्थांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मयूर भोईर यांनी सिडको व तहसीलदारांकडे केली आहे.

टॅग्स :panvelपनवेल