शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

नवी मुंबईत नियम पाळून विसर्जन; १५८ ठिकाणी २,००० हून अधिक बाप्पांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 01:47 IST

शहरातील विसर्जन तलावांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने, शहरात सुमारे १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली.

नवी मुंबई : कोरोना संकटामुळे या वर्षी शहरातील अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणपती दीड दिवसांचे बसविण्यात आले होते. विसर्जन स्थळी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली होती. नियमांचे पालन करून नागरिकांनी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला.

रविवारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या विभागांतील एकूण १५८ ठिकाणी २००० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

शहरातील विसर्जन तलावांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने, शहरात सुमारे १३५ कृत्रिम तलावांची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली. शासन आणि महापालिकेने लागू केलेल्या नियमावलीचे पालन करीत, भाविकांनी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. शहरातील प्रत्येक विभागात तलावांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने विसर्जन स्थळी भाविकांची गर्दी नव्हती.मिरवणुका नाही : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गणपती बाप्पांचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक न काढण्याच्या सूचना शासन, महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या. सार्वजनिक आणि घरगुती गणोशात्सव साजरा करणाऱ्या भक्तांनी या सूचनांचे पालन करीत कोणतीही मिरवणूक काढली नाही. गणरायाच्या विसर्जनावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गर्जनेसह निरोप देण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGanpati Festivalगणेशोत्सव