शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

बेकायदा व्यवसायाचा होतोय अधिकृत व्यापाऱ्यांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:28 IST

एपीएमसीतील प्रकार: पालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांकडे तक्रार

n  लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एपीएमसी मार्केटमधील अवैध व्यवसायाचा फटका येथील अधिकृत व्यापाऱ्यांना बसला आहे. अधिकृत गाळ्यांच्या समोरच अनधिकृत व्यापार सुरू असल्याने हे व्यापारी संतप्त झाले आहेत. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे केली आहे.सानपाडा रेल्वे स्थानकाकडून माथाडी भवनपर्यंतच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यापार सुरू आहे. विशेषत: एपीएमसी वाहतूक शाखा ते माथाडी भवन दरम्यानचा रस्ता आणि पदपथ अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापला आहे. काही ठिकाणी तर चक्क रस्तेच अडविले आहेत. मागील अनेक दिवसांपासून फळ मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारावर टॅम्पोतून कांदा-बटाट्याचा अनधिकृत व्यवसाय सुरू आहे. माथाडी भवनपर्यंतच्या अंतरावर टप्प्याटप्प्यावर अनधिकृत व्यवसाय करणारे असे टेम्पो उभे असल्याचे दिसून येते. त्यांच्या जोडीला फेरीवाल्यांची फौज असून, या परिसरातील दळवळण यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे, तसेच कोरोनाचे संकट अद्यापी कायम आहे, परंतु या भागात कोरोनाविषय नियमांना सपशेल हरताळ फासला जात आहे. शारीरिक अंतर राखणे तर दूरच, मास्कचा वापरही केला जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रार करूनही या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई होताना दिसत नाही. महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे फेरीवाल्यांचा अनधिकृत व्यवसाय फोफावत चालल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.गुरुवारी माथाडी भवनमधील काही गाळेधारकांनी आपले व्यवसाय बंद करून महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयावर धडक दिली. माथाडी भवनसमोरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली, परंतु तीन दिवस उलटले, तरी या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही.महापालिकेच्या माध्यमातून येथील अनधिकृत व्यवसायांवर कारवाई होणे गरजेचे आहे, परंतु तक्रार करूनही कारवाईला बगल दिली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी.- चंद्रकांत पाटील, माथाडी युनियनचे संयुक्त सरचिटणीस, माजी नगरसेवक