शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शहरातील बेकायदा गॅरेजमुळे रहदारीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:59 IST

पालिकेचे दुर्लक्ष; बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघातील स्थिती

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पदपथ आणि रस्त्यांवर बेकायदेशीरपणे गॅरेज थाटण्यात आले आहेत. या गॅरेजमुळे रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच अस्वच्छताही झाली आहे.नवी मुंबई शहर हे नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाते, परंतु वाढलेल्या वाहनांमुळे विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेकायदा वाहने पार्किंग, अनधिकृत फेरीवाले, बेकायदा गॅरेज अशा समस्यांचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी मुंबईने राज्यात पहिल्या क्रमांकचे स्थान कायम ठेवले असून, या वर्षी देशात पहिल्या क्रमांकचे स्थान पटकाविण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात असून, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शहरातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा सर्वच विभागात पदपथ आणि रस्त्यांवर बेकायदा गॅरेज मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. गॅरेजचालकांनी रस्ते आणि पदपथ काबीज केले असून, यामुळे रहदारीला अडथळा होत असून, अनेक ठिकाणी वाहतूककोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. गॅरेज सुरू असलेले रस्ते आणि पदपथ ऑइलमुळे काळे झाले आहेत, तसेच या परिसरात कचरा होत आहे. शहरात अभियान राबविताना याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पदपथ आणि रस्ते मोकळे व्हावेत, यासाठी पालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.जुनी वाहने विक्रीसाठीगॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी वाहने पदपथ आणि रस्त्यांच्या कडेला उभी केली जातात, तसेच यामध्ये विक्रीसाठी जुनी वाहने, अपघातग्रस्त वाहनांचाही समावेश असतो. ही वाहने अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी केलेली असतात, यामुळेही दैनंदिन स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे.