शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

शहरातील बेकायदा गॅरेजमुळे रहदारीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:59 IST

पालिकेचे दुर्लक्ष; बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघातील स्थिती

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पदपथ आणि रस्त्यांवर बेकायदेशीरपणे गॅरेज थाटण्यात आले आहेत. या गॅरेजमुळे रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच अस्वच्छताही झाली आहे.नवी मुंबई शहर हे नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाते, परंतु वाढलेल्या वाहनांमुळे विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने बेकायदा वाहने पार्किंग, अनधिकृत फेरीवाले, बेकायदा गॅरेज अशा समस्यांचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी मुंबईने राज्यात पहिल्या क्रमांकचे स्थान कायम ठेवले असून, या वर्षी देशात पहिल्या क्रमांकचे स्थान पटकाविण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात असून, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. शहरातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा सर्वच विभागात पदपथ आणि रस्त्यांवर बेकायदा गॅरेज मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. गॅरेजचालकांनी रस्ते आणि पदपथ काबीज केले असून, यामुळे रहदारीला अडथळा होत असून, अनेक ठिकाणी वाहतूककोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. गॅरेज सुरू असलेले रस्ते आणि पदपथ ऑइलमुळे काळे झाले आहेत, तसेच या परिसरात कचरा होत आहे. शहरात अभियान राबविताना याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पदपथ आणि रस्ते मोकळे व्हावेत, यासाठी पालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.जुनी वाहने विक्रीसाठीगॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणारी वाहने पदपथ आणि रस्त्यांच्या कडेला उभी केली जातात, तसेच यामध्ये विक्रीसाठी जुनी वाहने, अपघातग्रस्त वाहनांचाही समावेश असतो. ही वाहने अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी केलेली असतात, यामुळेही दैनंदिन स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे.