शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

चाळीशीनंतर गर्भधारणा झाल्यास बालक मुदतपूर्व जन्माला येण्याचा धोका अधिक; डॉक्टरांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 17:12 IST

गेल्या काही वर्षांमध्ये आता करिअर, शिक्षण यामुळे स्थिरस्थावर न झाल्याने मुली उशीरा लग्न करत आहेत.

नवी मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये मुदतपूर्व बालके जन्माला येण्याचे प्रमाण वाढत असून यामागे गर्भधारणेचे वाढते वय हे देखील एक कारण असल्याचे मत डॉक्टरांनी नोंदविले आहे. चाळीशी किंवा त्यानंतर गर्भधारणा झालेल्या मातांमध्ये मुदतपूर्व बालके जन्माला येण्याचा धोका जास्त असतो. मुदतपूर्व म्हणजे प्रसूतीच्या ठराविक कालावधी (३७ आठवडे) आधीच बाळ जन्माला येणे. या बाळांची पुरेशी वाढ न झाल्याचे यांचे वजन कमी असतेय त्यामुळे या बाळांची सुरुवातीचे काही दिवस अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते. 

गेल्या काही वर्षांमध्ये आता करिअर, शिक्षण यामुळे स्थिरस्थावर न झाल्याने मुली उशीरा लग्न करत आहेत. परिणामी गर्भधारणेचे वयही वाढले आहे. आता काही महिला वयाच्या पस्तीशीनंतर तर काही महिला अगदी चाळीशीनंतरही गर्भवती होण्याचा निर्णय घेत आहे. या वयामध्ये प्रजनन क्षमता कमी होते. त्यामुळे गर्भधारणा होणे ही फार अवघड असते. एआरटीसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आणखीनच शक्य झाले आहे. परंतु उशीरा गर्भधारणा झाल्याने बाळ मुदतपूर्व जन्माला येण्यासह परंतु उशीरा गर्भधारणेमुळे मुदतपूर्व जन्मासह अनेक गुंतागुंत होऊ शकतात, असे मेडिकव्हर रुग्णालयाच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विज यांनी सांगितले.

खारघर येथील मदरहुड रूग्णालयातील सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ म्हणाल्या की, ‘‘ज्या मातांचे वय ३५ पेक्षा जास्त आहे त्यांना अकाली बाळ होण्याची शक्यता असते. पण प्रत्येक प्रकरणांमध्ये असं होत नाही. शिवाय, उशीरा गर्भधारणा करणाऱ्या महिलांना गर्भधारणा होण्यापूर्वी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईड समस्या यासारख्या आरोग्य समस्या असू शकतात. अकाली जन्मलेल्या बाळांना श्वासोच्छवासाचा त्रास, कमी प्रतिकारशक्ती आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर यासारख्या आरोग्याच्या अनेक समस्या असू शकतात. अशा नवजात बाळांची एनआयसीयूमध्ये योग्यपद्धतीने काळजी घेणं आवश्यक आहे.''

वाढत्या वयासोबत गर्भधारणा होणे ही गोष्टही फार धोकादायक ठरु शकते. त्याचे मातेसह बाळावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. अकाली जन्मलेल्या बाळाला श्वसनाचा त्रास, कावीळ यासोबतच अशक्तपणा, चिंता निर्माण होणे. तसेच प्रतिकारशक्ती कमी असणे, न्यूरोलॉजिकल विकार, श्रवणशक्ती कमी होणे, हृदयाच्या समस्या आणि कमकुवत स्नायूंचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या बालकांची रुग्णालयातच नाही तर घरी आल्यावरही अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला घरी घेऊन जाताना मातांनी डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे. बाळाला ऍलर्जी, इन्फेक्शन आणि विविध रोगांपासून दूर ठेवण्यासाठी आणि बाळाच्या विकासासाठी स्तनपान गरजेचे आहे, असे मेडिकव्हर रुग्णालयाचे नवजात बालकांच्या आजाराचे तज्ज्ञ डॉ. नरजॉन मेश्राम यांनी सांगितले. 

चाळीशीनंतर गर्भधारणा झाल्यास यामध्ये गुंतागुंत होण्यासह उच्च रक्तदाब, प्रीक्लेम्पसिया, गर्भावस्थेतील मधुमेह, थायरॉईड विकार, गुणसूत्रातील विकृती आणि बाळामध्ये संरचनात्मक दोष, वाढ प्रतिबंध आणि मुदतपूर्व जन्म याचा धोका असतो. अशा बाळांना जन्मानंतरही दीर्घकाळ काळजी घेण्याची आवश्यकता असते. अकाली जन्मलेली बाळांची फुफ्फुसे, पचनसंस्था, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचा यांचा विकास पूर्णपणे झालेला नसतो, असे डॉ. अनू विज यांनी स्पष्ट केले.

अकाली जन्मलेल्या बाळांना एसआयडीएस म्हणजे अचानक मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो. या बाळांचा शारीरिक विकास आणि वाढ होण्यास थोडा वेळ लागतो. काही बाळांना बराच काळ अतिरिक्त ऑक्सिजन किंवा ट्यूब फीडिंगवर ठेवावे लागते. त्यामुळे या बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबत पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे, असे ही डॉ. मेश्राम म्हणाले.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिलाdocterडॉक्टरNavi Mumbaiनवी मुंबई