शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
3
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
4
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
5
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
6
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
7
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
8
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
9
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
10
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
11
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
12
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
13
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
14
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
15
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
16
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
17
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
18
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
19
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
20
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट असते तर वाचला असता जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:25 IST

अकरा महिन्यांत ९९ अपघात : ८९ दुचाकीस्वारांचा मृत्यू

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : अकरा महिन्यांत नवी मुंबईसह पनवेल व उरण क्षेत्रात दुचाकींचे ९९ अपघात घडले आहेत. त्यामध्ये ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी अनेकांनी हेल्मेटचा वापर केलेला नसल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन प्राण गमावले आहेत. रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. दुचाकीस्वारांकडून हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, अपघात झाल्यास शरीराच्या इतर भागासह डोक्यालाही जखम होत आहे. अशा वेळी डोक्याला झालेली जखम अनेकांच्या जिवावर बेतत आहे. मात्र, हेल्मेट हे सुरक्षेचे साधन म्हणून पाहण्याऐवजी कायद्याची सक्ती म्हणून बघितले जात आहे. यामध्ये पळवाट म्हणून हेल्मेट न घालता पोलिसांना चकमा देण्यात दुचाकीस्वार पटाईत झाले आहेत, परंतु अपघातामध्ये मृत्यूला चकमा देऊ शकलेले नाहीत. परिणामी वेगापाई हे लोक मृत्यूला आमंत्रण देत आहेत. सायन-पनवेल मार्गावर सर्वाधिक अपघात सायन-पनवेल मार्गावर सर्वाधिक अपघात घडले आहेत. मुंबई-पुण्याला जोडणारा हा मार्ग असल्याने येथे सतत वर्दळ असते. अशा वेळी वाहतुकीच्या नियमांना बगल देणे अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसह वाहनांची गती त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. शिस्तीत वाहन चालविण्याऐवजी वेडीवाकडी वाहने पळवून एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा लागलेली असते. यामध्ये एखाद्या वाहनाची धडक लागून होणाऱ्या अपघातात चालकांना प्राण गमवावे लागत आहेत. शहरात घडलेल्या एखाद्या अपघाताच्या वेळी दुचाकीस्वाराने घातलेले हेल्मेट त्याला जीवदान देऊ शकते, परंतु जनजागृती व कारवाई करूनही हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बहुतांश अपघातामध्ये हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वार अथवा मागे बसल्याचा मृत्यू झालेला आहे. - पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त-वाहतूक