शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

हेल्मेट असते तर वाचला असता जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:25 IST

अकरा महिन्यांत ९९ अपघात : ८९ दुचाकीस्वारांचा मृत्यू

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : अकरा महिन्यांत नवी मुंबईसह पनवेल व उरण क्षेत्रात दुचाकींचे ९९ अपघात घडले आहेत. त्यामध्ये ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी अनेकांनी हेल्मेटचा वापर केलेला नसल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन प्राण गमावले आहेत. रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यात दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. दुचाकीस्वारांकडून हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी, अपघात झाल्यास शरीराच्या इतर भागासह डोक्यालाही जखम होत आहे. अशा वेळी डोक्याला झालेली जखम अनेकांच्या जिवावर बेतत आहे. मात्र, हेल्मेट हे सुरक्षेचे साधन म्हणून पाहण्याऐवजी कायद्याची सक्ती म्हणून बघितले जात आहे. यामध्ये पळवाट म्हणून हेल्मेट न घालता पोलिसांना चकमा देण्यात दुचाकीस्वार पटाईत झाले आहेत, परंतु अपघातामध्ये मृत्यूला चकमा देऊ शकलेले नाहीत. परिणामी वेगापाई हे लोक मृत्यूला आमंत्रण देत आहेत. सायन-पनवेल मार्गावर सर्वाधिक अपघात सायन-पनवेल मार्गावर सर्वाधिक अपघात घडले आहेत. मुंबई-पुण्याला जोडणारा हा मार्ग असल्याने येथे सतत वर्दळ असते. अशा वेळी वाहतुकीच्या नियमांना बगल देणे अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसह वाहनांची गती त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. शिस्तीत वाहन चालविण्याऐवजी वेडीवाकडी वाहने पळवून एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा लागलेली असते. यामध्ये एखाद्या वाहनाची धडक लागून होणाऱ्या अपघातात चालकांना प्राण गमवावे लागत आहेत. शहरात घडलेल्या एखाद्या अपघाताच्या वेळी दुचाकीस्वाराने घातलेले हेल्मेट त्याला जीवदान देऊ शकते, परंतु जनजागृती व कारवाई करूनही हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बहुतांश अपघातामध्ये हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वार अथवा मागे बसल्याचा मृत्यू झालेला आहे. - पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त-वाहतूक