शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शहरातील माथाडी वसाहतींना विविध समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 02:31 IST

पालिकेविषयी नाराजी : अंतर्गत कामांचा मुद्दा ऐरणीवर

नवी मुंबई : पालिकेकडून वसाहतीअंतर्गतची कामे होत नसल्याने घणसोलीसह कोपरखैरणेतील माथाडी कामगारांच्या वसाहतींना समस्यांनी ग्रासले आहे. त्यात गटारांच्या रखडलेल्या सफाईमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी सुविधाच मिळत नसल्याने कर का भरायचा ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.सिडको विकसित गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पालिकेने मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामध्ये माथाडी कामगारांसाठी तसेच इतर घटकांसाठी सिडकोने विकसित केलेल्या वसाहतींचा मोठा समावेश आहे. सद्यस्थितीला घणसोली व कोपरखैरणे परिसरात मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांच्या वसाहती आहेत, परंतु या वसाहतींमधील गटारांच्या दुरुस्ती, अंतर्गतच्या रस्त्यांची डागडुजी यावर मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. मात्र, या कामांवर होणाऱ्या खर्चाचा भार पेलण्यास अनेक वसाहती असमर्थ आहेत. त्यामध्ये सिम्लपेक्स वसाहतीचाही समावेश आहे. तिथल्या रहिवाशांकडून पालिकेला प्रतिवर्षी सुमारे २५ लाखांच्या कराचा भरणा केला जातो. त्यानुसार मागील पंधरा वर्षात साडेतीन कोटीहून अधिक कर या परिसरातून पालिकेने जमा केला आहे. मात्र, त्याच्या तुलनेत कसल्याही सुुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यातच गेली बारा वर्षे संपूर्ण घणसोली नोड पालिका व सिडकोच्या हस्तांतरण प्रक्रियेत रखडला होता. सद्यस्थितीला सिम्पलेक्स वसाहतीमधील सर्वच सोसायट्यांमध्ये गटारांसह मलनि:सारण वाहिन्यांच्या दुरुस्ती व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे, परंतु त्याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे सिडको विकसित माथाडी कामगारांच्या वसाहतींमधील रस्ते, गटारे, मलनि:सारण वाहिन्या यांची दुरुस्ती पालिकेने करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी सचिन शिरसाठ यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सिडको विकसित सोसायट्यांमध्ये जलवाहिन्या बदलण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु त्याबरोबरच वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यांची डागडुजी, गटारे व मलनि:सारण यांच्याही दुरुस्तीची कामे करण्याची गरज शिरसाठ यांनी व्यक्त केली आहे, अन्यथा सोसायट्यांवर खर्चाचा भार वाढून त्याचा भुर्दंड सर्वसामान्य कुटुंबांना बसेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.