शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जेएनपीटीला प्रदूषणाचा विळखा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:57 IST

जेएनपीटी परिसरातील रासायनिक प्रकल्प आणि ट्रकफार्ममधून सातत्याने होणा-या तेल आणि रासायनिक पदार्थांच्या गळतीमुळे परिसरातील वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे.

मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटी परिसरातील रासायनिक प्रकल्प आणि ट्रकफार्ममधून सातत्याने होणा-या तेल आणि रासायनिक पदार्थांच्या गळतीमुळे परिसरातील वातावरण मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. नाले, गटारे यांच्यामधून रासायनमिश्रीत दूषित पाण्यामुळे आणि अतिउग्रदर्पामुळे ये-जा करणाºया कामगारांना नाक मुठीत धरूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. सातत्याने नाले, गटारांतून वाहणारे रसायनमिश्रीत दूषित पाणी थेट समुद्रात मिसळत असल्याने जलप्रदूषणाबरोबरच मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषणही होत असल्याने येथील प्राणी, पक्षी आणि माशांसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.जेएनपीटी परिसरातील ५०० हेक्टर क्षेत्रात अनेक रासायनिक ट्रकफार्म उभारण्यात आले आहेत. जेएनपीटी बंदरात आलेले रॉकेल, डिझेल, नाफ्ता, क्रूड आॅइलसारखे रासायनिक द्रव पदार्थ पाइपलाइनद्वारे येथील विविध कंपन्यांच्या ट्रकफार्ममध्ये जमा केले जातात. त्यानंतर टँकर अथवा अन्य साधनांमार्फत इतरत्र पाठविले जातात. नामांकित रासायनिक कंपन्यांकडून सातत्याने निष्काळजीपणा दाखविला जात असल्याने अनेक वेळा ट्रकफार्ममधूनच तेलगळतीचे प्रकार होतात. तर काही वेळा तेलचोर माफियांकडून तेलवाहिन्यांनाच टॅप लावून, फोडून चोरीचे प्रकार घडतात. यामुळे मात्र होणाºया तेलगळतीमुळे रासायनिक मिश्रीत दूषित पाणी, रसायने थेट नाल्यात येऊन मिसळतात. गटारे, नाल्यामार्फत हे रासायनिक मिश्रीत दूषित सांडपाणी थेट येथील समुद्रात आणि नजीकच्या खाड्यात मिसळले जाते. ज्या समुद्र आणि खाड्यांत येथील स्थानिक मच्छीमार मासेमारी करून आपल्या कुटुंबीयांचा चरितार्थ चालवितात. दूषित पाण्यामुळे मात्र खाड्या आणि समुद्रात जलप्रदूषण होत असल्याने मासेमारीच धोक्यात येत आहे. त्याशिवाय वायुप्रदूषणामुळे प्राणी, पक्षी आणि माशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.चार-पाच दिवसांपासून जेएनपीटीतील ट्रकफार्म परिसरात पावसाने भरलेली गटारे, नाल्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात तेलतवंग दिसून आल्याची माहिती जेएनपीटी कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी दिली. न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याजवळील रस्ते ते जेएनपीटी परिसरात ट्रकफार्मजवळील पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहने जातात. तेलमिश्रीत पाणी सभोवार उडते. परिसरात दूषित रासायनिक तेलाचा मोठ्या प्रमाणात उग्र दर्प येत असल्याने कामगारांना या मार्गावरून ये-जा करणेही कठीण झाले आहे.