शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

शेकडो समाजदूत मंत्रालयावर धडकणार! पुणे-मुंबई लाँच मार्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2023 18:42 IST

राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत.

पनवेल : मागील 9 वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे याठिकाणी समाजदूत म्हणून कार्यरत असणाऱ्या शेकडो समजदूतांनी आपल्या समावेशनासाठी पुणे ते मुंबई (मंत्रालय ) असा लाँच  मार्च दि.9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त सुरु केला आहे. दि.15 रोजी शेकडो समाजदुतांचा लाँच मार्च पनवेलमध्ये दाखल झाला होता.

राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत. महागाई गगनाला भिडत असताना मागील 9 वर्षात एकही रुपयाची पगारवाढ या समजदूतांना मिळाली नाही.शासनाने मागविलेल्या अहवालात या समजदूतांचे कायमस्वरूपी सामावेश करण्यास हरकत नसल्याचा अहवाल सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाला आहे मात्र तरी देखील काहीच निर्णय होत नसल्याने संतप्त समजदूतांनी पुणे येथून लाँच मार्चला सुरुवात केली आहे. सहा दिवस उलटले तरी अद्याप शासनाच्या प्रतिनिधींनी या समजदूतांची भेट घेतलेली नाही.

या लाँच मार्चमध्ये जवळपास 175 समाजदूत सहभागी झाले आहेत.सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची देखील या समजदूतांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. मात्र केवळ आश्वासनावर समजदूतांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी आम्ही आझाद मैदानात देखील धरणे दिले होते, मात्र आमच्या मागणीची दखल घेतली नाही. याकरिताच शेवटचा पर्याय म्हणून आम्ही लॉंग मार्च काढून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले असल्याचे समजदूतांच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.

साडेबारा हजारात कसे जगायचे?समाजदूत म्हणून अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो. यामध्येच आमचा निम्मा पगार खर्ची होतो. त्यामुळे साडेबारा हजारात कसे जगायचे, हे तुम्हीच सांगा साहेब? असा प्रश्न हे समाजदूत उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई