शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

शेकडो समाजदूत मंत्रालयावर धडकणार! पुणे-मुंबई लाँच मार्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2023 18:42 IST

राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत.

पनवेल : मागील 9 वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे याठिकाणी समाजदूत म्हणून कार्यरत असणाऱ्या शेकडो समजदूतांनी आपल्या समावेशनासाठी पुणे ते मुंबई (मंत्रालय ) असा लाँच  मार्च दि.9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त सुरु केला आहे. दि.15 रोजी शेकडो समाजदुतांचा लाँच मार्च पनवेलमध्ये दाखल झाला होता.

राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत. महागाई गगनाला भिडत असताना मागील 9 वर्षात एकही रुपयाची पगारवाढ या समजदूतांना मिळाली नाही.शासनाने मागविलेल्या अहवालात या समजदूतांचे कायमस्वरूपी सामावेश करण्यास हरकत नसल्याचा अहवाल सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाला आहे मात्र तरी देखील काहीच निर्णय होत नसल्याने संतप्त समजदूतांनी पुणे येथून लाँच मार्चला सुरुवात केली आहे. सहा दिवस उलटले तरी अद्याप शासनाच्या प्रतिनिधींनी या समजदूतांची भेट घेतलेली नाही.

या लाँच मार्चमध्ये जवळपास 175 समाजदूत सहभागी झाले आहेत.सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची देखील या समजदूतांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. मात्र केवळ आश्वासनावर समजदूतांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी आम्ही आझाद मैदानात देखील धरणे दिले होते, मात्र आमच्या मागणीची दखल घेतली नाही. याकरिताच शेवटचा पर्याय म्हणून आम्ही लॉंग मार्च काढून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले असल्याचे समजदूतांच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.

साडेबारा हजारात कसे जगायचे?समाजदूत म्हणून अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो. यामध्येच आमचा निम्मा पगार खर्ची होतो. त्यामुळे साडेबारा हजारात कसे जगायचे, हे तुम्हीच सांगा साहेब? असा प्रश्न हे समाजदूत उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई