शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

शेकडो समाजदूत मंत्रालयावर धडकणार! पुणे-मुंबई लाँच मार्च 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2023 18:42 IST

राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत.

पनवेल : मागील 9 वर्षापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे याठिकाणी समाजदूत म्हणून कार्यरत असणाऱ्या शेकडो समजदूतांनी आपल्या समावेशनासाठी पुणे ते मुंबई (मंत्रालय ) असा लाँच  मार्च दि.9 ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त सुरु केला आहे. दि.15 रोजी शेकडो समाजदुतांचा लाँच मार्च पनवेलमध्ये दाखल झाला होता.

राज्यभरात 342 काम करणारे हे समाजदुत साडेबारा हजार या तुटपुंज्या पगारावर सामाजिक न्याय विभागात काम करीत आहेत. महागाई गगनाला भिडत असताना मागील 9 वर्षात एकही रुपयाची पगारवाढ या समजदूतांना मिळाली नाही.शासनाने मागविलेल्या अहवालात या समजदूतांचे कायमस्वरूपी सामावेश करण्यास हरकत नसल्याचा अहवाल सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाला आहे मात्र तरी देखील काहीच निर्णय होत नसल्याने संतप्त समजदूतांनी पुणे येथून लाँच मार्चला सुरुवात केली आहे. सहा दिवस उलटले तरी अद्याप शासनाच्या प्रतिनिधींनी या समजदूतांची भेट घेतलेली नाही.

या लाँच मार्चमध्ये जवळपास 175 समाजदूत सहभागी झाले आहेत.सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची देखील या समजदूतांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. मात्र केवळ आश्वासनावर समजदूतांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापूर्वी आम्ही आझाद मैदानात देखील धरणे दिले होते, मात्र आमच्या मागणीची दखल घेतली नाही. याकरिताच शेवटचा पर्याय म्हणून आम्ही लॉंग मार्च काढून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले असल्याचे समजदूतांच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी अंकुश चव्हाण यांनी सांगितले.

साडेबारा हजारात कसे जगायचे?समाजदूत म्हणून अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो. यामध्येच आमचा निम्मा पगार खर्ची होतो. त्यामुळे साडेबारा हजारात कसे जगायचे, हे तुम्हीच सांगा साहेब? असा प्रश्न हे समाजदूत उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई