शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बारावीची परीक्षा सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 02:38 IST

विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखला जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला आहे.

नवी मुंबई : विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखला जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला आहे. मुंबई विभागातील ५१८ केंद्रावर ३ लाख २० हजार ७७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे तर ठाणे जिल्ह्यातील १३६ केंद्रावर २६ हजार २१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सहा भरारी पथके व दक्षता समिती नेमण्यात आली असून यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पथक, दुसरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, तिसरे शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य यांचे चौथे पथक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण यांचे पाचवे पथक तर सहावे महिलांच्या पथकाचा समावेश आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रतिबंधित क्षेत्र व या क्षेत्रातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवले होते. इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. परीक्षेच्या अर्ध्या तास आधीच विद्यार्थ्यांबरोबरच पालकही याठिकाणी उपस्थित होते. (प्रतिनिधी)१महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांच्या मदतीला यंदाही बोर्डाची हेल्पलाइन उपयोगी ठरली आहे. मुंबई विभागातल्या १५० विद्यार्थ्यांनी ऐनवेळी या हेल्पलाइनचा वापर केला असून परीक्षेच्या सेंटर बरोबरच, मनातील परीक्षेविषयीची भीती, तणाव यावरही विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही मार्गदर्शन करण्यात आले.२परीक्षेच्या सुरवातीला अगदी एक दिवसावर येऊन ठेपलेल्या वेळी निराशा तसेच अभ्यासाबाबत तक्रारींविषयीच्या समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. लक्षात राहत नाही, घाबरगुंडी उडाली आहे, पोटात गोळा आला, परीक्षेत कमी गुण मिळाले तर अशा चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांनी समुपदेशकही हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही तितकेच त्रस्त असून पाल्याच्या अभ्यासाविषयी तक्रारी, परीक्षेच्या वेळापत्रकाविषयी खात्री करण्यासाठी पालकांनीही या हेल्पलाइनचा आधार घेतला आहे. ३मुंबई विभागातील समुपदेशक श्रीकांत शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी परीक्षेला जाण्याअगोदर काहीच तासापूर्वी देखील ३० विद्यार्थ्यांनी या हेल्पलाइनच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा केंद्र आणि ठिकाणाची खात्री करुन घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांकडून पुरेपूर खात्री करून घेतली जाते. > पनवेल तालुक्यात एकूण ९,४५७ परीक्षार्थीच्पनवेल : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारी सुरुवात झाली. पनवेल तालुक्यात एकूण ८ परीक्षा कें द्रावर ही परीक्षा होणार आहे. तालुक्यातील एकूण ९,४५७ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. २८ मार्चपर्यंत चालणाऱ्या परीक्षेचे शिक्षण विभागाने नियोजन केले असून कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या आतमध्ये बुुट घालण्यास बंदी घातली आहे. च्कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात एकूण ५ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विविध परीक्षा केंद्रावर भेट देवून भरारी पथक कॉपी बहाद्दरांना आळा घालणार आहेत. खारघरमध्ये यावेळी प्रथमच सीजीएम शाळेत नवीन केंद्र सुरु करण्यात आले आहे.