शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

बारावीची परीक्षा सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 02:38 IST

विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखला जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला आहे.

नवी मुंबई : विद्यार्थी जीवनातील टर्निंग पॉइंट म्हणून ओळखला जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिला दिवस सुरळीतपणे पार पडला आहे. मुंबई विभागातील ५१८ केंद्रावर ३ लाख २० हजार ७७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे तर ठाणे जिल्ह्यातील १३६ केंद्रावर २६ हजार २१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सहा भरारी पथके व दक्षता समिती नेमण्यात आली असून यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे एक पथक, दुसरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, तिसरे शिक्षणाधिकारी प्राथमिक, डायट प्राचार्य यांचे चौथे पथक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण यांचे पाचवे पथक तर सहावे महिलांच्या पथकाचा समावेश आहे. परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या आत प्रतिबंधित क्षेत्र व या क्षेत्रातील झेरॉक्स केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवले होते. इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. परीक्षेच्या अर्ध्या तास आधीच विद्यार्थ्यांबरोबरच पालकही याठिकाणी उपस्थित होते. (प्रतिनिधी)१महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांच्या मदतीला यंदाही बोर्डाची हेल्पलाइन उपयोगी ठरली आहे. मुंबई विभागातल्या १५० विद्यार्थ्यांनी ऐनवेळी या हेल्पलाइनचा वापर केला असून परीक्षेच्या सेंटर बरोबरच, मनातील परीक्षेविषयीची भीती, तणाव यावरही विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही मार्गदर्शन करण्यात आले.२परीक्षेच्या सुरवातीला अगदी एक दिवसावर येऊन ठेपलेल्या वेळी निराशा तसेच अभ्यासाबाबत तक्रारींविषयीच्या समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. लक्षात राहत नाही, घाबरगुंडी उडाली आहे, पोटात गोळा आला, परीक्षेत कमी गुण मिळाले तर अशा चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांनी समुपदेशकही हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही तितकेच त्रस्त असून पाल्याच्या अभ्यासाविषयी तक्रारी, परीक्षेच्या वेळापत्रकाविषयी खात्री करण्यासाठी पालकांनीही या हेल्पलाइनचा आधार घेतला आहे. ३मुंबई विभागातील समुपदेशक श्रीकांत शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी परीक्षेला जाण्याअगोदर काहीच तासापूर्वी देखील ३० विद्यार्थ्यांनी या हेल्पलाइनच्या माध्यमातून पुन्हा परीक्षा केंद्र आणि ठिकाणाची खात्री करुन घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान व्हावे यासाठी समुपदेशकांकडून पुरेपूर खात्री करून घेतली जाते. > पनवेल तालुक्यात एकूण ९,४५७ परीक्षार्थीच्पनवेल : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारी सुरुवात झाली. पनवेल तालुक्यात एकूण ८ परीक्षा कें द्रावर ही परीक्षा होणार आहे. तालुक्यातील एकूण ९,४५७ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. २८ मार्चपर्यंत चालणाऱ्या परीक्षेचे शिक्षण विभागाने नियोजन केले असून कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या आतमध्ये बुुट घालण्यास बंदी घातली आहे. च्कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात एकूण ५ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. विविध परीक्षा केंद्रावर भेट देवून भरारी पथक कॉपी बहाद्दरांना आळा घालणार आहेत. खारघरमध्ये यावेळी प्रथमच सीजीएम शाळेत नवीन केंद्र सुरु करण्यात आले आहे.