शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

बँकेच्या लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:39 IST

नवी मुंबई : बडोदा बँक लुटल्याची घटना गंभीर असून, लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे याचे आश्चर्य सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई : बडोदा बँक लुटल्याची घटना गंभीर असून, लॉकरपर्यंत गुन्हेगार पोहोचलेच कसे याचे आश्चर्य सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी व्यक्त केले आहे. लॉकर फोडण्याच्या घटना तुरळक असून, पोलीस अत्यंत वेगाने तपास करत असल्याचेही ते म्हणाले. वर्षभरात उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमधील जप्तीचा ऐवज संबंधितांना वाटप करण्याच्या कार्यक्रमास ते वाशी येथे उपस्थित होते.घडलेल्या विविध प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागत असते. अशावेळी तपासकौशल्य व तांत्रिक बाबींचा वापर करून गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांची कसोटी लागलेली असते. या सर्व आव्हानांवर मात करत वर्षभरात उघड केलेल्या ८७ गुन्ह्यांमध्ये १ कोटी ९३ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामध्ये २००७ पासून ते २०१७ दरम्यान घडलेल्या घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, लूट अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हे शाखा, परिमंडळ एक व दोन या पोलिसांंनी उघडकीस आणलेले हे गुन्हे आहेत. या गुन्ह्यांची तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांकडून संबंधितांना त्यांचा ऐवज परत करण्यात आला. याकरिता वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित सेवानिवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी गत आठवड्यात घडलेल्या बडोदा बँक लुटीच्या घटनेचे गांभीर्य व्यक्त केले. लॉकर लुटण्याच्या घटना कमी आहेत, मात्र गुन्हेगार लॉकरपर्यंत पोचलेच कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.नवी मुंबई पोलिसांनी गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याची परंपरा जोपासली असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी ऐरोली येथील बँकेवर दरोडा टाकणाºयांसोबत झालेल्या झटापटीत शहीद झालेल्या बाबासाहेब आढाव यांच्या स्मृतींना देखील त्यांनी उजाळा दिला. राज्यातच लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने, गुणवत्तापूर्ण काम दाखवण्याचे अवघड होत आहे. त्यानंतरही चोरीला गेलेला ऐवज परत मिळवून तो संबंधितांना परत करण्यातच पोलिसांचे सुख असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह आयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त प्रवीण पवार, तुषार दोषी, नितीन पवार, राजेंद्र माने यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी चोरीचा ऐवज परत मिळेल याची आशा नसतानाही, पोलिसांनी तो मिळवून दिल्याचा आनंद नागरिकांनी व्यक्त केला.>नवी मुंबई पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्याची परंपरा जपलेली आहे. यामुळे उच्च स्तरावर त्यांची प्रतिमा उजळ झालेली आहे. याच गोपनीय अहवालानुसार राज्यात प्रथमच ‘लोकमत’ने एप्रिल महिन्यात नवी मुंबई पोलीस दलातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाºयांना सन्मानित केले होते. या कार्यक्रमाचा देखील उल्लेख निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी आवर्जून केला.घडलेल्या गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी गुन्हेगारांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. तक्रारदाराला त्यांचा मुद्देमाल परत करताना पोलीस अधिकारी.