शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

उद्योगांच्या भरभराटीतून बागायती शेती भुईसपाट

By admin | Updated: November 15, 2014 23:00 IST

कामगारांना येण्याजाण्यासाठी कारखानेदारांकडून घरपोच वाहन सुविधा असल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील कुशल अकुशल पुरूष, महिला, रोजगार प्राप्तीसाठी गुजरात राज्यात जात आहेत.

शौकत शेख ल्ल डहाणू
डहाणूपासून केवळ 25 कि. मी. अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव औद्योगिक वसाहतीतील वाढते उद्योग रोजगार निर्मितीसाठी पर्वणी ठरत असल्याने शिवाय कामगारांना येण्याजाण्यासाठी कारखानेदारांकडून घरपोच वाहन सुविधा असल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील कुशल अकुशल पुरूष, महिला, रोजगार प्राप्तीसाठी गुजरात राज्यात जात आहेत. त्यामुळे या परिसरातील शेती बागायतीसाठी मजुरांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी उद्योगधंद्याची भरभराट होत असून शेती, बागायती व्यवसाय भुईसपाट होण्याची वेळ आली असल्याचे मत वाढवण येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
डहाणू तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे सांगुन केंद्र शासनाने सन 1991 ला या परिसरात उद्योगबंदी लादली. या उद्योगबंदीमुळे सुशिक्षितबेकार तरूणांना रोजगार मिळू शकत नाही. तर लघु उद्योगांना पुर्णत: बंदी असल्यामुळे मोलमजुरी करणा:या आदिवासी कामगारांच्या कुटूंबाची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे दरवर्षी रोजगारासाठी हजारो आदिवासी स्थलांतर करीत असत. परंतु गेल्या एक वर्षापासून डहाणूच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव येथे कापड, पेन्सिल, पेन, होजियरी चे शेकडो कारखाने सुरू झाल्याने डहाणू, तलासरी, तालुक्यातील हजारोंच्या संख्येने कामगार तेथे जाऊ लागले आहे. 
विशेष म्हणजे येथील कारखानदार कामगारांना येण्याजाण्यासाठी डहाणू, तलासरीसाठी वाहन उपलब्ध करून देत असल्याने शेती, बागायती, विटभट्टी तसेच बोटीत जाणारे मजुर दररोज उंबरगाव येथील कारखान्यात जाताना दिसत आहे. दररोज उंबरगाव येथून पंधरा ते वीस आरामबस डहाणूच्या विविध भागात महिला तसेच पुरूषांना कामावर घेऊन जात असल्याने या भागातील शेती, बागायती करणो हा चिंतेचा विषय बनू लागला आहे.
दरम्यान डहाणूच्या पश्चिम भागातील चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, तणासी, वानगांव, डेहणो, साखरे, आसनगांव, चंडिगाव, डहाणू इ. भागात मोठ मोठय़ा बागायती असून या परिसरात पावसाळ्यात शेती तर त्यानंतर मिरची, भोपली, वांगी, भेंडी, दुधीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात या भागाचा पहिला नंबर आहे. दररोज येथून शेकडो टन भाजीपाला मुंबईच्या मुख्य बाजारपेठेत जात असतो. परंतु दिवसेंदिवस मजुर टंचाईमुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.