शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांच्या भरभराटीतून बागायती शेती भुईसपाट

By admin | Updated: November 15, 2014 23:00 IST

कामगारांना येण्याजाण्यासाठी कारखानेदारांकडून घरपोच वाहन सुविधा असल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील कुशल अकुशल पुरूष, महिला, रोजगार प्राप्तीसाठी गुजरात राज्यात जात आहेत.

शौकत शेख ल्ल डहाणू
डहाणूपासून केवळ 25 कि. मी. अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव औद्योगिक वसाहतीतील वाढते उद्योग रोजगार निर्मितीसाठी पर्वणी ठरत असल्याने शिवाय कामगारांना येण्याजाण्यासाठी कारखानेदारांकडून घरपोच वाहन सुविधा असल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील कुशल अकुशल पुरूष, महिला, रोजगार प्राप्तीसाठी गुजरात राज्यात जात आहेत. त्यामुळे या परिसरातील शेती बागायतीसाठी मजुरांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी उद्योगधंद्याची भरभराट होत असून शेती, बागायती व्यवसाय भुईसपाट होण्याची वेळ आली असल्याचे मत वाढवण येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
डहाणू तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे सांगुन केंद्र शासनाने सन 1991 ला या परिसरात उद्योगबंदी लादली. या उद्योगबंदीमुळे सुशिक्षितबेकार तरूणांना रोजगार मिळू शकत नाही. तर लघु उद्योगांना पुर्णत: बंदी असल्यामुळे मोलमजुरी करणा:या आदिवासी कामगारांच्या कुटूंबाची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे दरवर्षी रोजगारासाठी हजारो आदिवासी स्थलांतर करीत असत. परंतु गेल्या एक वर्षापासून डहाणूच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव येथे कापड, पेन्सिल, पेन, होजियरी चे शेकडो कारखाने सुरू झाल्याने डहाणू, तलासरी, तालुक्यातील हजारोंच्या संख्येने कामगार तेथे जाऊ लागले आहे. 
विशेष म्हणजे येथील कारखानदार कामगारांना येण्याजाण्यासाठी डहाणू, तलासरीसाठी वाहन उपलब्ध करून देत असल्याने शेती, बागायती, विटभट्टी तसेच बोटीत जाणारे मजुर दररोज उंबरगाव येथील कारखान्यात जाताना दिसत आहे. दररोज उंबरगाव येथून पंधरा ते वीस आरामबस डहाणूच्या विविध भागात महिला तसेच पुरूषांना कामावर घेऊन जात असल्याने या भागातील शेती, बागायती करणो हा चिंतेचा विषय बनू लागला आहे.
दरम्यान डहाणूच्या पश्चिम भागातील चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, तणासी, वानगांव, डेहणो, साखरे, आसनगांव, चंडिगाव, डहाणू इ. भागात मोठ मोठय़ा बागायती असून या परिसरात पावसाळ्यात शेती तर त्यानंतर मिरची, भोपली, वांगी, भेंडी, दुधीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात या भागाचा पहिला नंबर आहे. दररोज येथून शेकडो टन भाजीपाला मुंबईच्या मुख्य बाजारपेठेत जात असतो. परंतु दिवसेंदिवस मजुर टंचाईमुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.