शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शहरात गृहविलगीकरणामुळे रुग्णालयांवर भार झाला कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 23:47 IST

१५,०५१ रुग्णांनी घेतला लाभ : कोरोनाची भीती कमी करण्यास मदत

नामदेव मोरे     लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेने रुग्णालयांमधील बेडची क्षमता वाढविण्याबरोबर गृहविलगीकरणासही प्राधान्य दिले आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्यांना व घरामध्ये नियमांचे पालन करणे शक्य असणाऱ्यांवर घरातच उपचार केले जात आहेत. 

आतापर्यंत १५,०५१ जणांवर घरातच उपचार करण्यात आले असून, सद्य:स्थितीमध्ये ३१३ जण घरी उपचार घेत आहेत. नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. ब्रेक द चेन, शून्य मृत्युदर, मास्क नाही तर प्रवेश नाही व इतर अभियान राबविण्यात आले आहेत. प्रत्येक रुग्णाला चांगल्या सुविधा देता याव्यात यासाठी मनपाने जम्बो रुग्णालये उभारली व खासगी रुग्णालयांमध्येही उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली. याचबरोबर गृहविलगीकरणासही प्राधान्य देण्यात आले. ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत व ज्यांच्यामध्ये सहव्याधी नाही. ज्यांच्या घरामध्ये स्वतंत्र खोली आहे, देखभाल करण्यासाठी दुसरी व्यक्ती आहे अशांना गृहविलगीकरणाची परवानगी दिली जाते. यामुळे रुग्णालयांवरील ताण कमी झाला व घरात उपचार घेऊनही कोरोनामुक्त होता येते याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला.

सुरुवातीला कोरोना झालेल्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांनाही चुकीची वागणूक मिळत असल्याचे देशभर अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले. नवी मुंबईमध्ये असे होणार नाही याकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले होते. शासन नियमावलीचे पालन करून घरामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. आतापर्यंत तब्बल ३२ टक्के रुग्णांना या योजनेचा लाभ झाला आहे. १५ हजार ५१ रुग्ण घरामध्ये उपचार घेऊन बरे झाले आहेत. यामध्ये ८,५४७ पुरुष व ६,५०३ महिला व एका तृतीयपंथी नागरिकाचा समावेश आहे. सद्य:स्थितीमध्ये १२० महिला व १९३ पुरुष घरी उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणामुळे रुग्णालयांवरील व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करणेही शक्य झाले. याशिवाय घरामध्ये पुरेशी जागा असेल तर घरामध्ये उपचार घेऊन बरे होता येते हेही यामुळे नागरिकांच्या लक्षात आले. कोरोना रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला.

 

सौम्य लक्षणे व सहव्याधी नसलेल्या कोरोना रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी दिली जाते. जे रुग्ण घरामध्ये उपचार घेतात त्यांच्यावर महानगरपालिका प्रशासन विशेष लक्ष देत आहे. आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून कॉल सेंटर सुरू करण्यात आले असून, प्रतिदिन या रुग्णांना फोन करून त्यांची चौकशी करण्यात येते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या