शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

महामार्ग अंधारातच, फक्त ‘फिफा’साठी लावले होते दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:13 IST

सायन - पनवेल महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एक महिन्यापासून खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एक महिन्यापासून खड्ड्यांमुळे रोज चक्काजाम होत आहे. अनेक महिन्यांपासून वाशी ते पनवेल दरम्यानचे पथदिवेही बंद असून, त्यामुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे. मागणी करूनही पथदिवे सुरू केले जात नसल्याने प्रवाशांसह वाहतूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गोवासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईत येण्यासाठी सायन - पनवेल हाच प्रमुख मार्ग आहे. या रोडवरून रोज दोन लाख वाहनांची ये - जा सुरू असते. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने १२२० कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरण केले. विस्तारीकरणासाठी ठेकेदाराने केलेला खर्च भरून काढण्यासाठी खारघरमध्ये ६ जून २०१५मध्ये टोलनाकाही सुरू केला आहे; परंतु ठेकेदाराने कामे पूर्ण केली नाहीत व नवीन रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे महामार्गाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. दीड वर्षामध्ये महामार्गाने १०५ बळी घेतले आहेत. वाशी ते कळंबोली दरम्यान २० किलोमीटर रोडवरील पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. महामार्गावरील विजेच्या पोलवर फुलपाखरांची नक्षी बसविण्यात आली होती. महामार्गावर बटरफ्लाय दिवे असा गवगवा करण्यात आला होता; पंरतु प्रत्यक्षात हे दिवे कधी पेटलेच नाहीत. ‘फिफा’ वर्ल्डकपदरम्यान गतवर्षी महामार्गावरील दिवे सुरू करण्यात आले होते; परंतु ‘फिफा’चे सामने संपताच दिवे पुन्हा बंद झाले आहेत. महामार्ग अंधारात असल्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. दीड वर्षामध्ये २५०पेक्षा जास्त अपघात होऊन १०५ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामधील अनेक अपघात रात्री अपुऱ्या प्रकाशामुळे झाले आहेत. उरण फाटा येथे ९ जुलैला अंधारामुळे टँकर १०० फूट दरीत कोसळल्याची घटना घडली होती. तुर्भे शरयू हुंदाई शोरूमजवळ अंधारामुळे गटार दिसत नसल्यामुळे वारंवार अपघात होऊ लागले आहेत.सानपाडा उड्डाणपुलाजवळ अंधारामुळे आठवड्याला एकतरी अपघात होत आहे. महामार्गावरील पथदिवे सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. खड्डे व विजेच्या समस्यांसाठी आंदोलनही केले आहे; परंतु यानंतरही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. महामार्गावरील पथदिव्यांची नक्की जबाबदारी कोणाची यावरून टोलवा टोलवी सुरू आहे. वाहतूक पोलिसांनीही वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.>पालकमंत्र्यांनी दिले आदेशसायन - पनवेल महामार्गावर अंधार असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या विषयी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनाही याविषयी माहिती नव्हती. अधिकाºयांना विचारणा केल्यानंतर त्यांनाही या विषयी माहिती देता आली नाही. शिंदे यांनी या विषयी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले आहेत.>अंधारामुळे अपघात होणारी ठिकाणेसानपाडा उड्डाणपूल, तुर्भे शरयू हुंडाई शोरूम समोरील रस्ता, शिरवणे पूल, उरण फाटा, बेलापूर उड्डाणपूल, कळंबोली या ठिकाणी अंधारामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.>दीड वर्षातील अपघातांचा तपशीलठिकाणी अपघात मृतपनवेल ३९ १४कळंबोली १८ ०९खारघर ५० २५बेलापूर १८ ०७नेरु ळ ३५ १५सानपाडा ०८ १२वाशी ७६ १३>सायन - पनवेल महामार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, वारंवार अपघात होत आहेत. खड्ड्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला होता. पथदिवे लवकर सुरू केले नाहीत, तर पुन्हा आंदोलन केले जाईल.- गजानन काळे,शहर अध्यक्ष,मनसे