शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये हाय अ‍ॅलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:00 IST

बंदोबस्तामध्ये वाढ; नागरिकांनीही सावध राहण्याची गरज

- नामदेव मोरे नवी मुंबई : उलवेमधील पुलावर लिहिलेला मजकूर व कळंबोलीमध्ये सापडलेली बॉम्बसदृश वस्तूमुळे नवी मुंबईच्या सुरक्षेविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यापूर्वी दहशतवादी घटनांमधील व्यक्तींना झालेली अटक, ई-मेल हॅक प्रकरण व स्फोटांसाठी येथील वाहनांचा वापर झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढविला आहे. नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईलाही दहशतवादी हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी उरणमधील खोपटा पुलावर धमकीचा मजकूर लिहिण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला अटक केली असली तरी त्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. खोपटा पुलाची घटना ताजी असताना कळंबोलीमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामधील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये अद्याप गंभीर दहशतवादी कारवाई झाली नसली तरी या कारवाईशी संंबंधित अनेक घटना या परिसरात घडल्याचे समोर आले होते. मुंबई गुन्हे शाखेने २०१६ मध्ये मुंबईमध्ये फारुख नायकू व मोहम्मद तालुकदार या दोन संशयित अतिरेक्यांना अटक केली होती. त्यांच्या पैकी नायकूने एपीएमसीमध्ये आश्रय घेतल्याचे स्पष्ट झाले होते. बाजार समितीमध्ये बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेटही सक्रिय झाले होते. मुंबई पोलिसांनी यामधील आरोपींना अटक केली होती.गुजरातमध्ये २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्या स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या दोन वॅगन आर कार नवी मुंबईमधून चोरी केलेल्या होत्या. यामुळे त्या स्फोटाचे कनेक्शन नवी मुंबईशी जोडले गेले होते. २०१६ मध्येही केरळ पोलिसांनी एक संशयित व्यक्तीला नवी मुंबईमधून अटक केली होती. २००८ मध्ये एक बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर पामबीच रोडवरील गुनिना बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या विदेशी नागरिकाचे अकाऊंट हॅक करून धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला होता. वाशी सेक्टर १७ मधूनही अशाचप्रकारे ई-मेल हॅकिंगची घटना घडली होती. मार्च २०१८ मध्ये पोलिसांनी एबीटीच्या पाच संशयित दहशतवाद्यांना पनवेलमधून अटक केली होती. त्यांच्याकडे बनावट पॅनकार्ड व इतर साहित्य आढळून आले होते. एबीटीच्या संशयित दहशतवाद्यांना पॅनकार्ड काढून देणाºया टोळीलाही खारघरमधून अटक केली होती. या सर्व घटना व कळंबोलीमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे नवी मुंबई, पनवेल व उरण परिसराच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. पोलिसांनीही शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.दक्षतेचे आवाहनदहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस वर्षभर जनजागृती करत असतात. कुठेही संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात यावी. एखाद्या व्यक्तीच्या हालचालींवर शंका वाटल्यास त्याचीही माहिती देण्यात यावी. घर भाडेतत्त्वावर देताना व नोकरी देतानाही संबंधितांची पुरेशी माहिती घ्यावी. भाडेकरूंची नोंद पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.सुरक्षेत वाढनवी मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ केली आहे. सर्व पोलीस स्टेशनलाही दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. शहरातील गस्तही वाढविण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरू करण्यात आली आहे.