शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये हाय अ‍ॅलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:00 IST

बंदोबस्तामध्ये वाढ; नागरिकांनीही सावध राहण्याची गरज

- नामदेव मोरे नवी मुंबई : उलवेमधील पुलावर लिहिलेला मजकूर व कळंबोलीमध्ये सापडलेली बॉम्बसदृश वस्तूमुळे नवी मुंबईच्या सुरक्षेविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यापूर्वी दहशतवादी घटनांमधील व्यक्तींना झालेली अटक, ई-मेल हॅक प्रकरण व स्फोटांसाठी येथील वाहनांचा वापर झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे पोलिसांनी शहरातील बंदोबस्त वाढविला आहे. नागरिकांनीही दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईलाही दहशतवादी हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी उरणमधील खोपटा पुलावर धमकीचा मजकूर लिहिण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीला अटक केली असली तरी त्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. खोपटा पुलाची घटना ताजी असताना कळंबोलीमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामधील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये अद्याप गंभीर दहशतवादी कारवाई झाली नसली तरी या कारवाईशी संंबंधित अनेक घटना या परिसरात घडल्याचे समोर आले होते. मुंबई गुन्हे शाखेने २०१६ मध्ये मुंबईमध्ये फारुख नायकू व मोहम्मद तालुकदार या दोन संशयित अतिरेक्यांना अटक केली होती. त्यांच्या पैकी नायकूने एपीएमसीमध्ये आश्रय घेतल्याचे स्पष्ट झाले होते. बाजार समितीमध्ये बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेटही सक्रिय झाले होते. मुंबई पोलिसांनी यामधील आरोपींना अटक केली होती.गुजरातमध्ये २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्या स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या दोन वॅगन आर कार नवी मुंबईमधून चोरी केलेल्या होत्या. यामुळे त्या स्फोटाचे कनेक्शन नवी मुंबईशी जोडले गेले होते. २०१६ मध्येही केरळ पोलिसांनी एक संशयित व्यक्तीला नवी मुंबईमधून अटक केली होती. २००८ मध्ये एक बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर पामबीच रोडवरील गुनिना बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या विदेशी नागरिकाचे अकाऊंट हॅक करून धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला होता. वाशी सेक्टर १७ मधूनही अशाचप्रकारे ई-मेल हॅकिंगची घटना घडली होती. मार्च २०१८ मध्ये पोलिसांनी एबीटीच्या पाच संशयित दहशतवाद्यांना पनवेलमधून अटक केली होती. त्यांच्याकडे बनावट पॅनकार्ड व इतर साहित्य आढळून आले होते. एबीटीच्या संशयित दहशतवाद्यांना पॅनकार्ड काढून देणाºया टोळीलाही खारघरमधून अटक केली होती. या सर्व घटना व कळंबोलीमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे नवी मुंबई, पनवेल व उरण परिसराच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. पोलिसांनीही शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.दक्षतेचे आवाहनदहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस वर्षभर जनजागृती करत असतात. कुठेही संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात यावी. एखाद्या व्यक्तीच्या हालचालींवर शंका वाटल्यास त्याचीही माहिती देण्यात यावी. घर भाडेतत्त्वावर देताना व नोकरी देतानाही संबंधितांची पुरेशी माहिती घ्यावी. भाडेकरूंची नोंद पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.सुरक्षेत वाढनवी मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ केली आहे. सर्व पोलीस स्टेशनलाही दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. शहरातील गस्तही वाढविण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरू करण्यात आली आहे.