शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मिठागरांमुळे वाढतोय ‘ताप’

By admin | Updated: November 9, 2015 02:51 IST

ऐरोलीजवळ मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास ४०० एकर जमिनीवर मिठागरे आहेत. याठिकाणी साठविण्यात येणाऱ्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून त्याचा त्रास नवी मुंबईकरांना होत आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईऐरोलीजवळ मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास ४०० एकर जमिनीवर मिठागरे आहेत. याठिकाणी साठविण्यात येणाऱ्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून त्याचा त्रास नवी मुंबईकरांना होत आहे. आरोग्य विभाग २००६ पासून संबंधित विभागाकडे योग्य उपाययोजना करण्याची मागणी करत आहे. डासांच्या उत्पत्तीचे पुरावेही दिले असून मिठागर विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. नवी मुंबईमध्ये मागील काही महिन्यांपासून तापाची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महापालिकेने शहरात जनजागृती मोहीम राबवून नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याची माहिती दिली आहे. घर व परिसरात कुठेही पाणी साचून देवू नये, असे आवाहन केले आहे. डासांची उत्पत्ती स्थळे शोधून त्यावर योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. मिठागरांमध्ये पाणी साचविण्यात येते. या परिसरात अनेक वस्तू पडल्या असून त्यामध्येही पाणी साचत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेला २००६ मध्येच हा प्रश्न निदर्शनास आला होता. तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी आरोग्य विभाग मिठागर विभागाकडे पाठपुरावा करून उपाययोजना करण्याची मागणी करीत आहे. मुख्य आरोग्य अधिकारी दीपक परोपकारी, हिवताप अधिकारी उज्ज्वला ओतूरकर नियमितपणे पाठपुरावा करीत आहेत.मिठागरांमुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. ऐरोली परिसरातील नागरिकांना खूपच त्रास होवू लागला आहे. या परिसरात औषध फवारणी व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहे. आम्ही याविषयी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. याविषयी योग्य कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे. - संगीता अशोक पाटील, नगरसेविका, प्रभाग १५ ऐरोली