शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणा कोलमडली

By admin | Updated: April 7, 2016 01:20 IST

जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था नवी मुंबईमध्ये असल्याचा दावा सिडकोने केला आहे. सिडको क्षेत्रामध्ये तब्बल १७६ हॉस्पिटल्स व १,१७७ खासगी क्लिनिक असल्याचे सांगितले जा

प्रशांत शेडगे , पनवेलजगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था नवी मुंबईमध्ये असल्याचा दावा सिडकोने केला आहे. सिडको क्षेत्रामध्ये तब्बल १७६ हॉस्पिटल्स व १,१७७ खासगी क्लिनिक असल्याचे सांगितले जात असून, पाच नवीन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स बांधली जाणार आहेत. कागदावर आरोग्य यंत्रणा बळकट असली तरी प्रत्यक्षात प्रस्तावित स्मार्ट दक्षिण नवी मुुंबईमधील नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा मिळत नाहीत. खासगी रुग्णालयांमधील उपचार परवडत नाहीत व शासकीय रुग्णालयेच नसल्याने पनवेल तालुक्यातील नागरिकांना नवी मुंबई व मुंबई पालिकेच्या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा सिडकोने केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मार्ट सिटी उभारण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. पनवेल व उरण तालुक्यामधील सिडकोचे कार्यक्षेत्रामध्ये सर्वोत्तम नागरी सुविधा दिल्या जाणार असल्याचा दावा केला आहे. सिडकोने पूर्ण नवी मुंबईमध्ये एकूण १७६ हॉस्पिटल, ११७७ खासगी क्लिनिक, ८७ पॅथॉलॉजी लॅब असल्याचा दावा केला आहे. सर्व हॉस्पिटल्समध्ये मिळून ६,०३६ बेड्सची क्षमता आहे. जगातील सर्व देशांपेक्षा प्रती हजार लोकसंख्येमागे सर्वाधिक बेडसंख्या या परिसरात आहे. वास्तव वेगळे आहे. पनवेल शहरासह पूर्ण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अद्याप जि. परिषदेच्या भरवशावर आहे. जिल्हा परिषदेचे आपटे, वावंजे, नेरे, अजिवली, गव्हाणमध्ये एकूण पाच नागरी आरोग्य केंद्रे व ३२ उपकेंद्रे आहेत. शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु ही सर्व यंत्रणा फक्त कागदावर व प्राथमिक उपचार करण्यापुरतीच मर्यादित आहे. आरोग्य विभागासाठी १६६ पदे मंजूर आहेत, परंतु त्यामधील २५ पदे रिक्त आहेत. १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामधील पाच जण उच्च शिक्षणासाठी दीर्घ मुदतीच्या सुटीवर आहेत. १४ वर्षे झाल्यानंतरही रुग्णालयाचे काम अपूर्ण आहे.पनवेलमधील ग्रामीण रुग्णालयाचे काम २००१ मध्ये सुरू करण्यात आले. सुरुवातीला ३० बेड्सचे रुग्णालय बांधले जाणार होते, परंतु नंतर ही संख्या १२० पर्यंत नेण्यात आली. शासनाकडून वेळेत निधी न मिळाल्यामुळे जवळपास १४ वर्षे झाल्यानंतरही अद्याप रुग्णालये सुरू झाली नाहीत.