शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

आरोग्य यंत्रणा कोलमडली

By admin | Updated: April 7, 2016 01:20 IST

जगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था नवी मुंबईमध्ये असल्याचा दावा सिडकोने केला आहे. सिडको क्षेत्रामध्ये तब्बल १७६ हॉस्पिटल्स व १,१७७ खासगी क्लिनिक असल्याचे सांगितले जा

प्रशांत शेडगे , पनवेलजगातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था नवी मुंबईमध्ये असल्याचा दावा सिडकोने केला आहे. सिडको क्षेत्रामध्ये तब्बल १७६ हॉस्पिटल्स व १,१७७ खासगी क्लिनिक असल्याचे सांगितले जात असून, पाच नवीन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स बांधली जाणार आहेत. कागदावर आरोग्य यंत्रणा बळकट असली तरी प्रत्यक्षात प्रस्तावित स्मार्ट दक्षिण नवी मुुंबईमधील नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा मिळत नाहीत. खासगी रुग्णालयांमधील उपचार परवडत नाहीत व शासकीय रुग्णालयेच नसल्याने पनवेल तालुक्यातील नागरिकांना नवी मुंबई व मुंबई पालिकेच्या रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा सिडकोने केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मार्ट सिटी उभारण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. पनवेल व उरण तालुक्यामधील सिडकोचे कार्यक्षेत्रामध्ये सर्वोत्तम नागरी सुविधा दिल्या जाणार असल्याचा दावा केला आहे. सिडकोने पूर्ण नवी मुंबईमध्ये एकूण १७६ हॉस्पिटल, ११७७ खासगी क्लिनिक, ८७ पॅथॉलॉजी लॅब असल्याचा दावा केला आहे. सर्व हॉस्पिटल्समध्ये मिळून ६,०३६ बेड्सची क्षमता आहे. जगातील सर्व देशांपेक्षा प्रती हजार लोकसंख्येमागे सर्वाधिक बेडसंख्या या परिसरात आहे. वास्तव वेगळे आहे. पनवेल शहरासह पूर्ण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अद्याप जि. परिषदेच्या भरवशावर आहे. जिल्हा परिषदेचे आपटे, वावंजे, नेरे, अजिवली, गव्हाणमध्ये एकूण पाच नागरी आरोग्य केंद्रे व ३२ उपकेंद्रे आहेत. शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे. परंतु ही सर्व यंत्रणा फक्त कागदावर व प्राथमिक उपचार करण्यापुरतीच मर्यादित आहे. आरोग्य विभागासाठी १६६ पदे मंजूर आहेत, परंतु त्यामधील २५ पदे रिक्त आहेत. १२ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामधील पाच जण उच्च शिक्षणासाठी दीर्घ मुदतीच्या सुटीवर आहेत. १४ वर्षे झाल्यानंतरही रुग्णालयाचे काम अपूर्ण आहे.पनवेलमधील ग्रामीण रुग्णालयाचे काम २००१ मध्ये सुरू करण्यात आले. सुरुवातीला ३० बेड्सचे रुग्णालय बांधले जाणार होते, परंतु नंतर ही संख्या १२० पर्यंत नेण्यात आली. शासनाकडून वेळेत निधी न मिळाल्यामुळे जवळपास १४ वर्षे झाल्यानंतरही अद्याप रुग्णालये सुरू झाली नाहीत.