शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जुईनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: April 4, 2016 02:17 IST

रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कॉलनीमधील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असणारे रुग्णालयही बंद अवस्थेत आहे

नामदेव मोरे,  नवी मुंबईरेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कॉलनीमधील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असणारे रुग्णालयही बंद अवस्थेत आहे. उघडी गटारे, साचलेले पाणी, बंद इमारतींमधील घाणीचे साम्राज्यामुळे पूर्ण जुईनगर परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरू लागली असून, परिसरातील रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सर्वाधिक घाणीचे साम्राज्य असणारी वसाहत म्हणून जुईनगर सेक्टर २२ मधील रेल्वे कॉलनीकडे पाहिले जाऊ लागले आहे. मध्ये रेल्वे प्रशासनाने १९९५ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी वसाहत उभी केली आहे. परंतु योग्य देखभाल न केल्यामुळे वसाहतीला समस्यांचा विळखा पडला आहे. अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या परिसरात साफसफाई केली जात आहे. परंतु कर्मचाऱ्यांसाठीच्या इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उघड्या गटारांमुळे व साठलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. सांडपाण्यासाठीच्या गटारावर व सेप्टिक टँकवर झाकणे नसल्याने तेथेही डासांची उत्पत्ती होत आहे. मोडकळीस आलेल्या व अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये कचरा टाकला जात आहे. यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. सिव्हरेज लाइनमधील मल व पाणी परिसरात पसरत आहे. इमारतीजवळून जाताना नाक मुठीत धरावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने येथील देखभाल व दुरुस्ती व साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे वर्षभर वारंवार डेंग्यू, मलेरियाची साथ पसरत आहे. पावसाळ्यात प्रत्येक घरामध्ये तापाचे रुग्ण आढळत आहेत. लहान मुलांना वर्षभर सातत्याने वेगवेगळे आजार होत आहेत. कॉलनीमधील कचऱ्यामुळे येथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहेच, त्याचबरोबर परिसरातील सिडको नोडवासीयांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. वारंवार साथ पसरू लागल्यामुळे रेल्वे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. रेल्वेने या ठिकाणी वसाहत उभी केल्यानंतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी २० बेड क्षमतेचे स्वतंत्र रुग्णालय बांधले आहे. ५ जानेवारी १९९८ मध्ये मध्य रेल्वेचे तत्कालीन महाप्रबंधक श्री. के. बालाकेसरी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु काही दिवसांमध्येच हे रुग्णालय बंद करण्यात आले. सद्य:स्थितीमध्ये कधी तरी एक डॉक्टर या ठिकाणी येत असतात. डॉक्टर कधी येतात व कधी जातात, हेही रहिवाशांना कळत नाही. आंतररुग्ण विभाग बंदच आहे. फक्त दाखविण्यासाठी काही बेड ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना सर्दी, डोकेदुखी व इतर किरकोळ आजारांवरच उपचार होत असतात. डॉक्टर येण्याची वाट पाहण्यापेक्षा कर्मचारी खासगी रुग्णालयात जाण्यास पसंती देत आहेत. १ एप्रिलला रेल्वे वसाहतीमध्ये सेप्टिक टँकमध्ये पडल्याने महिलेचा पाय मोडला. सदर महिलेवर प्राथमिक उपचार करण्याचीही सुविधा नव्हती. रुग्णालय सुरूच करायचे नव्हते तर इमारत बांधण्यावर लाखो रुपये खर्च का केले, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहेत.