शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

जुईनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: April 4, 2016 02:17 IST

रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कॉलनीमधील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असणारे रुग्णालयही बंद अवस्थेत आहे

नामदेव मोरे,  नवी मुंबईरेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कॉलनीमधील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असणारे रुग्णालयही बंद अवस्थेत आहे. उघडी गटारे, साचलेले पाणी, बंद इमारतींमधील घाणीचे साम्राज्यामुळे पूर्ण जुईनगर परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरू लागली असून, परिसरातील रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सर्वाधिक घाणीचे साम्राज्य असणारी वसाहत म्हणून जुईनगर सेक्टर २२ मधील रेल्वे कॉलनीकडे पाहिले जाऊ लागले आहे. मध्ये रेल्वे प्रशासनाने १९९५ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी वसाहत उभी केली आहे. परंतु योग्य देखभाल न केल्यामुळे वसाहतीला समस्यांचा विळखा पडला आहे. अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेल्या इमारतीच्या परिसरात साफसफाई केली जात आहे. परंतु कर्मचाऱ्यांसाठीच्या इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उघड्या गटारांमुळे व साठलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. सांडपाण्यासाठीच्या गटारावर व सेप्टिक टँकवर झाकणे नसल्याने तेथेही डासांची उत्पत्ती होत आहे. मोडकळीस आलेल्या व अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये कचरा टाकला जात आहे. यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. सिव्हरेज लाइनमधील मल व पाणी परिसरात पसरत आहे. इमारतीजवळून जाताना नाक मुठीत धरावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने येथील देखभाल व दुरुस्ती व साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यामुळे वर्षभर वारंवार डेंग्यू, मलेरियाची साथ पसरत आहे. पावसाळ्यात प्रत्येक घरामध्ये तापाचे रुग्ण आढळत आहेत. लहान मुलांना वर्षभर सातत्याने वेगवेगळे आजार होत आहेत. कॉलनीमधील कचऱ्यामुळे येथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहेच, त्याचबरोबर परिसरातील सिडको नोडवासीयांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. वारंवार साथ पसरू लागल्यामुळे रेल्वे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. रेल्वेने या ठिकाणी वसाहत उभी केल्यानंतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी २० बेड क्षमतेचे स्वतंत्र रुग्णालय बांधले आहे. ५ जानेवारी १९९८ मध्ये मध्य रेल्वेचे तत्कालीन महाप्रबंधक श्री. के. बालाकेसरी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु काही दिवसांमध्येच हे रुग्णालय बंद करण्यात आले. सद्य:स्थितीमध्ये कधी तरी एक डॉक्टर या ठिकाणी येत असतात. डॉक्टर कधी येतात व कधी जातात, हेही रहिवाशांना कळत नाही. आंतररुग्ण विभाग बंदच आहे. फक्त दाखविण्यासाठी काही बेड ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना सर्दी, डोकेदुखी व इतर किरकोळ आजारांवरच उपचार होत असतात. डॉक्टर येण्याची वाट पाहण्यापेक्षा कर्मचारी खासगी रुग्णालयात जाण्यास पसंती देत आहेत. १ एप्रिलला रेल्वे वसाहतीमध्ये सेप्टिक टँकमध्ये पडल्याने महिलेचा पाय मोडला. सदर महिलेवर प्राथमिक उपचार करण्याचीही सुविधा नव्हती. रुग्णालय सुरूच करायचे नव्हते तर इमारत बांधण्यावर लाखो रुपये खर्च का केले, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहेत.