शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

तुर्भे हनुमाननगरमध्ये तुंबलेल्या गटारामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 23:35 IST

घाणीचे साम्राज्य : स्वच्छता अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष

नवी मुंबई : केवळ शहरात आणि राज्यात नव्हे, तर संपूर्ण देशात स्वच्छतेचे शहर म्हणून तिसरा क्रमांक मिळविणारी नवी मुंबई महापालिका आहे. मात्र, या स्मार्ट सिटीत तुर्भे परिसरातील हनुमाननगरची पार दुरवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे साचले आहेत. संपूर्ण कचरा रस्त्यावर येऊनही तुर्भे विभागाच्या स्वच्छता अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नाक-तोंड दाबून घाणीच्या साम्राज्यातून जावे लागत आहे. त्यामुळे स्वच्छता विभागाचे तीनतेरा वाजले आहेत. विद्युत केबलची गंभीर समस्या असल्याने, नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तुर्भे नाका येथील हनुमाननगरमधील अनेक ठिकाणी उघडी गटारे असल्यामुळे, या गटारातील दूषित सांडपाणी अनेकदा नागरिकांच्या घरात शिरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. गटारांची वेळच्या वेळी साफसफाई होत नसल्याने, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे यांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली नसल्याचे खोपडे यांनी सांगितले. विद्युत खांबावरील उघड्या विजेच्या तारांनी अक्षरश: झाडांच्या वेलींप्रमाणे विळखा घातलेला आहे. त्यामुळे रहिवाशांना रात्री अपरात्री जीव मुठीत धरून येथून चालावे लागते.

पालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे झोपडपट्टी परिसर म्हणजे अत्यंत दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य. अनेक ठिकाणी गवत वाढलेले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक पटकावलेल्या या महापालिकेच्या संबंधित अधिकाºयांनी प्रत्यक्षात या नगरची पाहणी केल्यास स्वच्छता विभागाचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कचराकुंडी भरून कचरा बाहेर पडूनही उचलण्यात आला नसल्याची तक्रार असून, या कुंडीबाहेर मेलेली कुत्री आणि डुकरांचा वावर दिसून येत आहे. येथील नियोजित उद्यानाच्या मोकळ्या भूखंडासमोर अक्षरश: कचºयाचे डम्पिंग झाले आहे. त्यामुळे या परिसराची दयनीय अवस्था झाली आहे.तुर्भे परिसरातील हनुमाननगरात कचरा, दूषित सांडपाणी, गटारे याबाबत त्वरित पाहणी करण्यात येईल. त्या संदर्भात संबंधित अधिकाºयांना सूचित करण्यात येईल आणि कचरा उचलून साफसफाई करण्यात येईल.- डॉ.बाबासाहेब राजळे,उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, मुख्यालय

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई