शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा, शवविच्छेदन विभाग कंत्राटी कामगारांच्या भरवशावर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 06:49 IST

पालिकेच्या शवविच्छेदन विभागाची १०० टक्के जबाबदारी कंत्राटी कामगारांवर सोपविण्यात आली आहे. कामगारांच्या संपामुळे शवविच्छेदन रखडल्याने पालिकेची राज्यभर बदनामी झाली. स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नवी मुंबई : पालिकेच्या शवविच्छेदन विभागाची १०० टक्के जबाबदारी कंत्राटी कामगारांवर सोपविण्यात आली आहे. कामगारांच्या संपामुळे शवविच्छेदन रखडल्याने पालिकेची राज्यभर बदनामी झाली. स्थायी समितीमध्ये नगरसेवकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून याची चौकशी करण्यात यावी. संप घडवून यंत्रणेला वेठीस धरणाºयांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या शवविच्छेदन विभागामध्ये काम करणाºया कंत्राटी कामगारांनी ११ सप्टेंबरला अचानक आंदोलन केले. यामुळे रूग्णालयामधील शवविच्छेदनाचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली होती. शवविच्छेदन वेळेत न झाल्याने मृतदेह ताब्यात मिळण्यास विलंब झाला. नागरिकांनी स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते व इतर सर्वच नगरसेवकांना फोन करून शवविच्छेदनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून देण्याची मागणी केली होती. परंतु काहीही उपयोग झाला नव्हता. या विषयामुळे राज्यभर महापालिकेची बदनामी झाली. या विषयाचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीमध्येही उमटले. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी या विषयावर लक्ष केंद्रित केले. शवविच्छेदन विभागातील कर्मचाºयांनी संप करून यंत्रणा वेठीस धरल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशाप्रकारे मनमानी करणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.शिवसेनेच्या नामदेव भगत यांनीही महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. शवविच्छेदनसारख्या महत्त्वाच्या विभागाची सर्व जबाबदारी कंत्राटी कामगारांवर सोपविणे योग्य नाही. पर्यायी कामगार उपलब्ध करून किंवा रूग्णालयातील इतर कर्मचाºयांकडून हे काम करून घेणे आवश्यक होते अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. मृतदेहांचे वेळेत शवविच्छेदन झाले नसल्याने रूग्णालयात दिवसभर मृताच्या नातेवाइकांना ताटकळत बसावे लागले. अनेकांना मृतदेह त्यांच्या गावीही घेवून जायचे होते. त्या सर्वांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. अत्यावश्यक सुविधा पूर्णपणे कंत्राटी कामगारांच्या ताब्यात नसाव्या. प्रत्येक ठिकाणी काही प्रमाणात कायम कर्मचाºयांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. भविष्यात पाणीपुरवठा, मलनि:सारण, आरोग्य व इतर विभागातील कर्मचारीही अचानक संपावर जातील. त्याचा परिणाम शहरवासीयांवर होण्याची शक्यता आहे. यापुढे अशाप्रकारच्या घटना होणार नाहीत याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. कामगारांनी मनमानी करून संप घडवून आणला असेल तर त्यांच्यावर, ठेकेदार व युनियनच्या पदाधिकाºयांवरही कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.डॉक्टर शवविच्छेदन करत नाहीत1शवविच्छेदन गृहातील कर्मचा-यांनी केलेल्या संपावरून नगरसेवकांनी आरोग्य विभागावर जोरदार टीका केली. शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांनी स्वत: शवविच्छेदन का केले नाही असा प्रश्नही उपस्थित केला. नक्की शवविच्छेदन कोण करते अशी विचारणा केली. यावर मुख्य आरोग्य अधिकारी दीपक परोपकारी यांनी सांगितले की, डॉक्टर शवविच्छेदन करत नाहीत.2या माहितीमुळे सगळेच चक्रावून गेले. कंत्राटी कामगार शवविच्छेदन तज्ज्ञ आहेत का असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. अखेर शिवसेनेच्या नामदेव भगत यांनी एक दिवस संबंधित अधिकाºयांना स्थायी समितीमध्ये उपस्थित राहण्यास सांगून नक्की कशी प्रक्रिया असते त्याविषयी माहिती द्या, अशी मागणी केली.कर्मचाºयांच्या संपामुळे शवविच्छेदनाचे काम रखडले हे वास्तव आहे. या प्रकरणी दोषी असणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याशिवाय भविष्यात अशाप्रकारच्या घटना होवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर लक्ष देण्यात येत आहे.- अंकुश चव्हाण,अतिरिक्त आयुक्त, महापालिकासंप करून शवविच्छेदन विभागाचे कामकाज बंद पाडणाºया कामगारांवर व त्यांच्या नेत्यांवर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशाप्रकारे महापालिकेला व जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी.- विजय चौगुले, विरोधी पक्षनेतेप्रशासनाने पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून शवविच्छेदनाचे काम सुरू ठेवणे आवश्यक होते. मृतांच्या नातेवाइकांना दिवसभर ताटकळत बसावे लागल्याने पालिकेची प्रतिमा मलिन झाली. भविष्यात अशाप्रकारच्या घटना होवू नये यासाठी कायम कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात यावी.- नामदेव भगत, शिवसेना नगरसेवकरूग्णालयामध्ये झालेला प्रकार दुर्दैवी आहे. प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावर आहे. परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला अपयश आले असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत.- शुभांगी पाटील, सभापती, स्थायी समिती

टॅग्स :hospitalहॉस्पिटल