शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

बेवारस वाहनांची डोकेदुखी, वाहतुकीला अडथळा, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 04:00 IST

पनवेल परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे शेकडो बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णवाहिका, स्कूलबसेस व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे शेकडो बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णवाहिका, स्कूलबसेस व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या बेवारस वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी पनवेलकरांकडून करण्यात येत आहे.सध्या शहरात वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन भागांत सामावलेल्या या शहरात वाहनतळाचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. विशेष म्हणजे, वाढत्या शहरीकरणाबरोबर येथे वाहनांची संख्याही वाढत आहे. दुचाकी वाहनांचे यात प्रमाण मोठे आहे. बहुतांशी सोसायट्यांत पार्किंगसाठी जागा नसल्याने दुचाकीसह चारचाकी वाहने सर्रासपणे रस्त्यावर पार्क केली जातात. रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केलेल्या या वाहनांत बेवारस वाहनांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे पडून आहेत. या वाहनांचा गैरवापर समाजकंटकांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनांवर वाहतूक पोलीस, महापालिकेने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र, कारवाई तर दूरच, या वाहनांकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या वाहनांमुळे रस्त्यावरील इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. शहराच्या प्रत्येक भागात रस्त्याच्या बाजूला भंगार वाहने दिसून येत आहेत. प्रशासनाने दखल घेऊन वाहने लवकरात लवकर हलवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.पनवेल परिसरात हजारोंच्या संख्येने गॅरेजेस असून, तेथेही मोठ्या संख्येने नादुरु स्त वाहने उभी आहेत. नादुरु स्त वाहनांचे सुटे भाग अन्य वाहनात वापरण्यासाठी गॅरेजमालक त्यांची खरेदी करतात; परंतु सुटा भाग वापरला तरी ही वाहने वर्षांनुवर्षे गॅरेजमधील जागा अडवून बसतात. शहरातील काही रस्त्यांवर कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता, सर्रासपणे नादुरु स्त, अपघातग्रस्त वाहने उभी करण्यात आली आहेत. या प्रकारामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन रस्तेही मर्यादित झाले आहेत, तसेच शहराच्या विद्रूपीकरणातही भर पडत आहे. या बेवारस वाहनांचा दैनंदिन स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे.यासंदर्भात ठोस कार्यवाही करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.- रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असे पनवेल महापालिकेने २८ जानेवारी २०१८ रोजी जाहीर केले होते; परंतु अडीच महिने उलटून गेले, तरी यासंदर्भात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.पनवेल वाहतूक शाखा व आरटीओला या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मागच्या आठवड्यात कळवले आहे. जसजशी यादी आली, तसतशी ती त्यांना कळविण्यात आली आहे.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका

टॅग्स :panvelपनवेल