शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बेवारस वाहनांची डोकेदुखी, वाहतुकीला अडथळा, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 04:00 IST

पनवेल परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे शेकडो बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णवाहिका, स्कूलबसेस व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे शेकडो बेवारस वाहने उभी आहेत. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रुग्णवाहिका, स्कूलबसेस व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या बेवारस वाहनांचा बंदोबस्त करण्याची मागणी पनवेलकरांकडून करण्यात येत आहे.सध्या शहरात वाहतूककोंडी आणि पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन भागांत सामावलेल्या या शहरात वाहनतळाचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जात आहेत. विशेष म्हणजे, वाढत्या शहरीकरणाबरोबर येथे वाहनांची संख्याही वाढत आहे. दुचाकी वाहनांचे यात प्रमाण मोठे आहे. बहुतांशी सोसायट्यांत पार्किंगसाठी जागा नसल्याने दुचाकीसह चारचाकी वाहने सर्रासपणे रस्त्यावर पार्क केली जातात. रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केलेल्या या वाहनांत बेवारस वाहनांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे पडून आहेत. या वाहनांचा गैरवापर समाजकंटकांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वाहनांवर वाहतूक पोलीस, महापालिकेने तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र, कारवाई तर दूरच, या वाहनांकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या वाहनांमुळे रस्त्यावरील इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. शहराच्या प्रत्येक भागात रस्त्याच्या बाजूला भंगार वाहने दिसून येत आहेत. प्रशासनाने दखल घेऊन वाहने लवकरात लवकर हलवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.पनवेल परिसरात हजारोंच्या संख्येने गॅरेजेस असून, तेथेही मोठ्या संख्येने नादुरु स्त वाहने उभी आहेत. नादुरु स्त वाहनांचे सुटे भाग अन्य वाहनात वापरण्यासाठी गॅरेजमालक त्यांची खरेदी करतात; परंतु सुटा भाग वापरला तरी ही वाहने वर्षांनुवर्षे गॅरेजमधील जागा अडवून बसतात. शहरातील काही रस्त्यांवर कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता, सर्रासपणे नादुरु स्त, अपघातग्रस्त वाहने उभी करण्यात आली आहेत. या प्रकारामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन रस्तेही मर्यादित झाले आहेत, तसेच शहराच्या विद्रूपीकरणातही भर पडत आहे. या बेवारस वाहनांचा दैनंदिन स्वच्छतेला अडथळा निर्माण होत आहे.यासंदर्भात ठोस कार्यवाही करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.- रस्त्यावर उभ्या असलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असे पनवेल महापालिकेने २८ जानेवारी २०१८ रोजी जाहीर केले होते; परंतु अडीच महिने उलटून गेले, तरी यासंदर्भात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.पनवेल वाहतूक शाखा व आरटीओला या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मागच्या आठवड्यात कळवले आहे. जसजशी यादी आली, तसतशी ती त्यांना कळविण्यात आली आहे.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका

टॅग्स :panvelपनवेल