शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

वाहनचोर बनले पोलिसांची डोकेदुखी

By admin | Updated: April 9, 2017 02:52 IST

तीन महिन्यांत शहरातून १०९ वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक दुचाकींचा समावेश आहे. तर वाहनचोरीच्या घडलेल्या गुन्ह्यांपैकी उकल झालेल्या गुन्ह्यांचे

नवी मुंबई : तीन महिन्यांत शहरातून १०९ वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक दुचाकींचा समावेश आहे. तर वाहनचोरीच्या घडलेल्या गुन्ह्यांपैकी उकल झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण अल्प असल्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान वाढले आहे.शहरात वाहनचोरीच्या घटना वाढतच असून त्यास आवर घालण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. नाकाबंदी, गस्त, जनजागृती यांसह इतरही अनेक पर्याय वापरूनही वाहनचोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. सन २०१५मध्ये शहरातून एकूण ५९४ वाहने चोरीला गेलेली. त्यापैकी अवघ्या १४२ वाहनांचा शोध लागला होता. वाहनचोरीच्या या गुन्ह्यात गतवर्षी ८२ गुन्ह्यांनी वाढ होऊन २०१६मध्ये ६७६ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अशातच चालू वर्षाच्या अवघ्या तीन महिन्यांत शहरातून १०९ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात कार, ट्रक यांसह दुचाकींचा सर्वाधिक समावेश आहे. त्यापैकी काही गुन्ह्यांची वेळीच उकलही झालेली आहे. शहरात घडणाऱ्या इतर गुन्ह्यांच्या तुलनेत वाहनचोरीचे गुन्हे सर्वाधिक आहेत. चोरीच्या वाहनांची शहराबाहेर सहज विल्हेवाट लावणे शक्य असल्याने या गुन्ह्यात परराज्यातील टोळ्या सक्रिय असल्याचे काही प्रकरणांमध्ये दिसूनही आलेले आहे. मात्र, अद्यापही या टोळ्यांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यात व घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना फारसे यश आलेले नाही.वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये सराईत टोळ्यांसह काही बालगुन्हेगारांचाही समावेश आहे. ज्या बालगुन्हेगारांनी हौसेपोटी दुचाकी चोरल्या होत्या, अशांचा तपास लागला आहे; परंतु सराईत टोळ्यांना अटकाव घालण्यात पोलिसांना फारसे यश आल्याचे दिसत नाही. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदीच्या माध्यमातून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही या वाहनचोर टोळ्या चकमा देत आहेत. त्यामुळे चोरीची वाहने नेमकी जातात कुठे? असा प्रश्न वाहनमालकांसह पोलिसांना सतावत आहे. अशातच वाहनचोरांवर कायद्याची धाक निर्माण होत नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम पोलिसांनी राबवली. हा उपक्रम स्तुत्य असला तरीही नागरिकांकडून मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आजही रहदारीच्या मार्गावर अथवा मोकळी जागा भेटेल त्या ठिकाणी वाहने उभी केल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अधिकृत पार्किंगस्थळ ओस पडत असून रस्त्यांवर मात्र कोंडी होत आहे. याच संधीचा फायदा वाहनचोरांकडून घेतला जात असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे.चोरीचे वाहन एखाद्या गुन्ह्यासाठी वापरले गेल्यासही पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण होऊ शकते. सोनसाखळी चोरी, दरोडे अशा गुन्ह्यांसाठी चोरीची वाहने वापरली जात आहेत. त्यामुळे घटनास्थळी सीसीटीव्हीमध्ये जरी गुन्ह्याचा प्रकार चित्रित झाला, तरीही वापरलेले वाहन चोरीचे असल्यामुळे पोलिसांना तपासात अडथळा निर्माण होतो. सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर पडलेल्या दरोड्यातही चोरीची कार वापरण्यात आली होती. यामुळे सुरुवातीचे काही दिवस पोलीस तपासकाम दिशाहीन झाले होते.वाहनचोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांचे अ‍ॅनेलेसेस पथकही कार्यरत आहे. त्यांच्याद्वारे वाहनचोरांची ओळख पटवून त्यांना पकडण्याच्या दृष्टीने तपास केला जातो. त्यांच्याकडून सीसीटीव्हीच्या तपासाद्वारे काही गुन्हेगारांना अटकही करण्यात आलेली आहे. त्यानंतरही शहरात वाहनचोरीच्या घटना सुरूच आहेत.