शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

वाहनचोर बनले पोलिसांची डोकेदुखी

By admin | Updated: April 9, 2017 02:52 IST

तीन महिन्यांत शहरातून १०९ वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक दुचाकींचा समावेश आहे. तर वाहनचोरीच्या घडलेल्या गुन्ह्यांपैकी उकल झालेल्या गुन्ह्यांचे

नवी मुंबई : तीन महिन्यांत शहरातून १०९ वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक दुचाकींचा समावेश आहे. तर वाहनचोरीच्या घडलेल्या गुन्ह्यांपैकी उकल झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण अल्प असल्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान वाढले आहे.शहरात वाहनचोरीच्या घटना वाढतच असून त्यास आवर घालण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. नाकाबंदी, गस्त, जनजागृती यांसह इतरही अनेक पर्याय वापरूनही वाहनचोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. सन २०१५मध्ये शहरातून एकूण ५९४ वाहने चोरीला गेलेली. त्यापैकी अवघ्या १४२ वाहनांचा शोध लागला होता. वाहनचोरीच्या या गुन्ह्यात गतवर्षी ८२ गुन्ह्यांनी वाढ होऊन २०१६मध्ये ६७६ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अशातच चालू वर्षाच्या अवघ्या तीन महिन्यांत शहरातून १०९ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात कार, ट्रक यांसह दुचाकींचा सर्वाधिक समावेश आहे. त्यापैकी काही गुन्ह्यांची वेळीच उकलही झालेली आहे. शहरात घडणाऱ्या इतर गुन्ह्यांच्या तुलनेत वाहनचोरीचे गुन्हे सर्वाधिक आहेत. चोरीच्या वाहनांची शहराबाहेर सहज विल्हेवाट लावणे शक्य असल्याने या गुन्ह्यात परराज्यातील टोळ्या सक्रिय असल्याचे काही प्रकरणांमध्ये दिसूनही आलेले आहे. मात्र, अद्यापही या टोळ्यांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यात व घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना फारसे यश आलेले नाही.वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये सराईत टोळ्यांसह काही बालगुन्हेगारांचाही समावेश आहे. ज्या बालगुन्हेगारांनी हौसेपोटी दुचाकी चोरल्या होत्या, अशांचा तपास लागला आहे; परंतु सराईत टोळ्यांना अटकाव घालण्यात पोलिसांना फारसे यश आल्याचे दिसत नाही. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदीच्या माध्यमातून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही या वाहनचोर टोळ्या चकमा देत आहेत. त्यामुळे चोरीची वाहने नेमकी जातात कुठे? असा प्रश्न वाहनमालकांसह पोलिसांना सतावत आहे. अशातच वाहनचोरांवर कायद्याची धाक निर्माण होत नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याची मोहीम पोलिसांनी राबवली. हा उपक्रम स्तुत्य असला तरीही नागरिकांकडून मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आजही रहदारीच्या मार्गावर अथवा मोकळी जागा भेटेल त्या ठिकाणी वाहने उभी केल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अधिकृत पार्किंगस्थळ ओस पडत असून रस्त्यांवर मात्र कोंडी होत आहे. याच संधीचा फायदा वाहनचोरांकडून घेतला जात असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे.चोरीचे वाहन एखाद्या गुन्ह्यासाठी वापरले गेल्यासही पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण होऊ शकते. सोनसाखळी चोरी, दरोडे अशा गुन्ह्यांसाठी चोरीची वाहने वापरली जात आहेत. त्यामुळे घटनास्थळी सीसीटीव्हीमध्ये जरी गुन्ह्याचा प्रकार चित्रित झाला, तरीही वापरलेले वाहन चोरीचे असल्यामुळे पोलिसांना तपासात अडथळा निर्माण होतो. सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर पडलेल्या दरोड्यातही चोरीची कार वापरण्यात आली होती. यामुळे सुरुवातीचे काही दिवस पोलीस तपासकाम दिशाहीन झाले होते.वाहनचोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांचे अ‍ॅनेलेसेस पथकही कार्यरत आहे. त्यांच्याद्वारे वाहनचोरांची ओळख पटवून त्यांना पकडण्याच्या दृष्टीने तपास केला जातो. त्यांच्याकडून सीसीटीव्हीच्या तपासाद्वारे काही गुन्हेगारांना अटकही करण्यात आलेली आहे. त्यानंतरही शहरात वाहनचोरीच्या घटना सुरूच आहेत.