शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरीचे लायसन्स मिळण्यासोबतच कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 02:11 IST

रजनी पंडित यांचा ऑनलाइन संवाद

नवी मुंबई :  नागरिकांना समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी किंवा इतर बाबतीत माहिती काढण्यासाठी हेरगिरी काळाची गरज असल्याचे मत पहिल्या महिला डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांनी व्यक्त केले. यासाठी आजवर कायदा होऊ न शकल्याची खंतही व्यक्त केली.रविवारी ७ फेब्रुवारी रोजी मिती ग्रुपच्या उत्तरा मोने आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रकाश बाविस्कर यांनी पंडित यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. या कार्यक्रमात पंडित यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना आलेली आव्हाने आणि त्यावर मात करत त्यांनी मिळवलेल्या यशाविषयी चर्चा करण्यात आली.डिटेक्टिव्हसाठी परदेशात लायसन्स दिले जातात. त्यामुळे ते पोलिसांप्रमाणे काम करू शकतात. आपल्या देशात डिटेक्टिव्हसाठी लायसन्स दिले जात नाही. त्यामुळे अनेक वेळा अडचणी येत असल्याचे सांगत डिटेक्टिव्ह काळाची गरज असून, याबाबत कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे पंडित म्हणाल्या. आलेल्या प्रसंगाशी दोन हात कसे करायचे, याचे ज्ञान लहानपणापासून असल्याने कधीच कोणत्याच गोष्टीची भीती वाटली नसल्याचे त्यांनी सांगितले. हेरगिरी करताना घडलेले अनेक किस्सेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वीची लोक अन्याय सहन करायचेे. आता मोहासाठी अनैतिक गोष्टींचे आकर्षण वाटले की ते वाहत जातात. गैरफायदा घेणे, ब्लॅकमेल करणे, अशा गोष्टीही घडतात. त्यामध्ये आत्महत्या हा पर्याय नसून, झालेली चूक सावरण्यासाठी कोणाची तरी मदत घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. समस्येतून संधी शोधली पाहिजे आणि त्यातून आपले पुढचे आयुष्य घडवले पाहिजे, असा सल्ला देत लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच ऐश्वर्य असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कामाची नोंद अनेकांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असून, तो आमचा हेतू साध्य झाल्याचे मिती ग्रुपच्या उत्तरा मोने यांनी सांगितले. बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रकाश बाविस्कर यांनी पंडित यांच्या कार्याचे कौतुक करत पंडित या फक्त महाराष्ट्राचा अभिमान नसून रणरागिणी असल्याचे म्हटले.मुलांना वेळ देणे गरजेचेपालक कामांमुळे त्रासलेले असतात. त्यामुळे पालक आणि मुलांमधील संवाद फार कमी झाला आहे. आपली मुले बाहेर काय करतात, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे असून मुलांच्या मनात चांगले विचार रुजविणे, मुलांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना वेळ देणे तितकेच गरजेचे आहे, अनेकदा मुले व्यसनांकडे वळत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.