शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

हेरगिरीचे लायसन्स मिळण्यासोबतच कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 02:11 IST

रजनी पंडित यांचा ऑनलाइन संवाद

नवी मुंबई :  नागरिकांना समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी किंवा इतर बाबतीत माहिती काढण्यासाठी हेरगिरी काळाची गरज असल्याचे मत पहिल्या महिला डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांनी व्यक्त केले. यासाठी आजवर कायदा होऊ न शकल्याची खंतही व्यक्त केली.रविवारी ७ फेब्रुवारी रोजी मिती ग्रुपच्या उत्तरा मोने आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रकाश बाविस्कर यांनी पंडित यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. या कार्यक्रमात पंडित यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना आलेली आव्हाने आणि त्यावर मात करत त्यांनी मिळवलेल्या यशाविषयी चर्चा करण्यात आली.डिटेक्टिव्हसाठी परदेशात लायसन्स दिले जातात. त्यामुळे ते पोलिसांप्रमाणे काम करू शकतात. आपल्या देशात डिटेक्टिव्हसाठी लायसन्स दिले जात नाही. त्यामुळे अनेक वेळा अडचणी येत असल्याचे सांगत डिटेक्टिव्ह काळाची गरज असून, याबाबत कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे पंडित म्हणाल्या. आलेल्या प्रसंगाशी दोन हात कसे करायचे, याचे ज्ञान लहानपणापासून असल्याने कधीच कोणत्याच गोष्टीची भीती वाटली नसल्याचे त्यांनी सांगितले. हेरगिरी करताना घडलेले अनेक किस्सेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वीची लोक अन्याय सहन करायचेे. आता मोहासाठी अनैतिक गोष्टींचे आकर्षण वाटले की ते वाहत जातात. गैरफायदा घेणे, ब्लॅकमेल करणे, अशा गोष्टीही घडतात. त्यामध्ये आत्महत्या हा पर्याय नसून, झालेली चूक सावरण्यासाठी कोणाची तरी मदत घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. समस्येतून संधी शोधली पाहिजे आणि त्यातून आपले पुढचे आयुष्य घडवले पाहिजे, असा सल्ला देत लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच ऐश्वर्य असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या कामाची नोंद अनेकांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असून, तो आमचा हेतू साध्य झाल्याचे मिती ग्रुपच्या उत्तरा मोने यांनी सांगितले. बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रकाश बाविस्कर यांनी पंडित यांच्या कार्याचे कौतुक करत पंडित या फक्त महाराष्ट्राचा अभिमान नसून रणरागिणी असल्याचे म्हटले.मुलांना वेळ देणे गरजेचेपालक कामांमुळे त्रासलेले असतात. त्यामुळे पालक आणि मुलांमधील संवाद फार कमी झाला आहे. आपली मुले बाहेर काय करतात, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे असून मुलांच्या मनात चांगले विचार रुजविणे, मुलांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना वेळ देणे तितकेच गरजेचे आहे, अनेकदा मुले व्यसनांकडे वळत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.