शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोकणचा हापूस थेट ग्राहकांच्या दारात, मध्यस्थांची साखळी खंडित

By नामदेव मोरे | Updated: May 2, 2024 20:01 IST

ग्राहकांची फसवणूक थांबविण्यातही यश

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोकणचा हापूस विक्रीसाठी फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीवर विसंबून न राहता आता शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. मुंबईस्थित कोकणवासीयांच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्यात येत असून, या उपक्रमास ग्राहकांचाही प्रतिसाद वाढत आहे. मध्यस्थांची साखळी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो व ग्राहकांनाही स्वस्त व उत्तम दर्जाचा हापूस मिळू लागला आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे ही हापूस आंब्याची देशातील सर्वांत प्रमुख बाजारपेठ आहे. सर्वाधिक आंबा याच परिसरात विकला जातो. यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती हा आंबा विक्रीसाठी एकमेव पर्याय होता; परंतु मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक वर्षी या उपक्रमास प्रतिसाद वाढत आहे. मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून स्थिरावलेले कोकणवासीय नागरिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यंत आंबा पाेहोचविला जात आहे. या उपक्रमाशी अनेक मुंबईकर जोडले जात आहेत. आपल्या संपर्कामधील नागरिकांकडून आंब्याची ऑर्डर नोंदविली जाते. शेतकऱ्यांना किती आंबे लागणार हे कळविले जाते. या मागणीप्रमाणे शेतकरी ट्रकमधून आंबे पाठवून देतात. प्रत्येक विभागात तो पाठविला जातो.

नवी मुंबईमध्ये सीवूड, वाशीसह शहरातील अनेक भागांत अशाप्रकारे कोकणातून थेट आंबा विक्रीसाठी येत आहे. मुंबईमध्येही आंबा महोत्सवाच्या माध्यमातून थेट आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे.

ग्राहकांना खात्रीशीर कोकणचा हापूस- सद्य:स्थितीमध्ये मार्केटमध्ये कोकणच्या हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस देण्याचे प्रकारही वाढले आहेत. प्रत्येक आंब्याला देवगडचा हापूस असल्याचे दाखविले जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असते. आंबा महोत्सव व थेट शेतकरी ते ग्राहक योजनेमध्ये ग्राहकांना खात्रीने कोकणचा हापूस उपलब्ध होत आहे.

कोरोना काळापासून आम्ही देवगडचा हापूस थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू केला. सी-वूडमधील कवी कुसुमाग्रज वाचनालयाचीही या उपक्रमास साथ मिळते. प्रत्येक वर्षी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.- भूषण मालवणकर- सी-वूड

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAlphonso Mangoहापूस आंबाMangoआंबा