शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आप्पासाहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव!

By admin | Updated: January 26, 2017 03:33 IST

रेवदंडा येथील मारूती आळीतील ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना बुधवारी (२५ जानेवारी) पद्मश्री पुरस्कार जाहीर

रेवदंडा येथील मारूती आळीतील ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना बुधवारी (२५ जानेवारी) पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच जल्लोष व्यक्त करण्यात आला. सुमारे ५० वर्षे निरूपणाच्या माध्यमातून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी अंधश्रद्धा निर्मूलन, मानवाला मानव म्हणून वागणूक देण्याची शिकवण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड असे अनेक सामाजिक कार्य त्यांच्याकडून नि:स्वार्थ भावनेने चालू आहे. अशा कार्याचा हा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. याप्रसंगी त्यांच्या निवासस्थानी धर्माधिकारी कुटुंबीय व श्री सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांना अनेकांनी दूरध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी येऊन शुभेच्छा देणे चालू होते.

आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर होणे हे त्यांच्या कामाची पोच पावती आहे. सामाजिक कार्याची सरकारने दखल घेतली त्याबद्दल सरकारचे आभार.-अनंत गीते, केंद्रीयमंत्रीनिरु पणाच्या माध्यमातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यसनमुक्ती, स्वच्छतादूत, पर्यावरण रक्षणाचे केलेले कार्य गौरवास्पद आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून घेतलेला वसा आप्पासाहेबांनी सुरु ठेवला आहे. त्यांना मिळालेला सन्मान हा रायगडकरांसाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे.- आमदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसआप्पासाहेबांना मिळालेला सन्मान हा रायगडकरांना अभिमानास्पद आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरु केलेल्या व्यसनमुक्तीच्या चळवळीला आप्पासाहेबांनी मूर्त रु प दिले आहे. सरकारने त्यांना पुरस्कार जाहीर केल्याबद्दल सरकारचे धन्यवाद.- आमदार जयंत पाटील, सरचिटणीस, शेकापश्रीसदस्यांसह अखंड देशासाठी हा आनंदाचा क्षण आहे. पद्मश्री पुरस्कार अनेकांना मिळाला आहे. परंतु आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर झाल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे. सरकारने उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आहे. - आमदार सुरेश लाडअध्यात्माच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांची खऱ्या अर्थाने आज समाजाला गरज आहे. आप्पासाहेबांचे कार्याची दखल सरकारने घेत त्यांना पुरस्कार जाहीर करून त्यांनी पुरस्काराची उंची वाढवली आहे.- आमदार धैर्यशील पाटीलपर्यावरण, स्वच्छता, व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रात अध्यात्माच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी केलेल्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर केल्याने त्या पुरस्काराची उंची वाढली आहे. - आमदार सुभाष पाटीलआप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर केल्याने त्या पुरस्काराची उंची वाढली आहे. आप्पासाहेबांनी समाजातील घटकांना सुसंस्काराची, निरामय निरोगी आयुष्याची दिशा दाखवली आहे. त्यांच्या कार्याची दखल सरकारने घेतली त्याबद्दल आभार.- आमदार प्रशांत ठाकूर