शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आप्पासाहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव!

By admin | Updated: January 26, 2017 03:33 IST

रेवदंडा येथील मारूती आळीतील ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना बुधवारी (२५ जानेवारी) पद्मश्री पुरस्कार जाहीर

रेवदंडा येथील मारूती आळीतील ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना बुधवारी (२५ जानेवारी) पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच जल्लोष व्यक्त करण्यात आला. सुमारे ५० वर्षे निरूपणाच्या माध्यमातून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी अंधश्रद्धा निर्मूलन, मानवाला मानव म्हणून वागणूक देण्याची शिकवण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड असे अनेक सामाजिक कार्य त्यांच्याकडून नि:स्वार्थ भावनेने चालू आहे. अशा कार्याचा हा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. याप्रसंगी त्यांच्या निवासस्थानी धर्माधिकारी कुटुंबीय व श्री सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांना अनेकांनी दूरध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी येऊन शुभेच्छा देणे चालू होते.

आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर होणे हे त्यांच्या कामाची पोच पावती आहे. सामाजिक कार्याची सरकारने दखल घेतली त्याबद्दल सरकारचे आभार.-अनंत गीते, केंद्रीयमंत्रीनिरु पणाच्या माध्यमातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यसनमुक्ती, स्वच्छतादूत, पर्यावरण रक्षणाचे केलेले कार्य गौरवास्पद आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून घेतलेला वसा आप्पासाहेबांनी सुरु ठेवला आहे. त्यांना मिळालेला सन्मान हा रायगडकरांसाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे.- आमदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसआप्पासाहेबांना मिळालेला सन्मान हा रायगडकरांना अभिमानास्पद आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरु केलेल्या व्यसनमुक्तीच्या चळवळीला आप्पासाहेबांनी मूर्त रु प दिले आहे. सरकारने त्यांना पुरस्कार जाहीर केल्याबद्दल सरकारचे धन्यवाद.- आमदार जयंत पाटील, सरचिटणीस, शेकापश्रीसदस्यांसह अखंड देशासाठी हा आनंदाचा क्षण आहे. पद्मश्री पुरस्कार अनेकांना मिळाला आहे. परंतु आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर झाल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे. सरकारने उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आहे. - आमदार सुरेश लाडअध्यात्माच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांची खऱ्या अर्थाने आज समाजाला गरज आहे. आप्पासाहेबांचे कार्याची दखल सरकारने घेत त्यांना पुरस्कार जाहीर करून त्यांनी पुरस्काराची उंची वाढवली आहे.- आमदार धैर्यशील पाटीलपर्यावरण, स्वच्छता, व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रात अध्यात्माच्या माध्यमातून आप्पासाहेबांनी केलेल्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. आप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर केल्याने त्या पुरस्काराची उंची वाढली आहे. - आमदार सुभाष पाटीलआप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर केल्याने त्या पुरस्काराची उंची वाढली आहे. आप्पासाहेबांनी समाजातील घटकांना सुसंस्काराची, निरामय निरोगी आयुष्याची दिशा दाखवली आहे. त्यांच्या कार्याची दखल सरकारने घेतली त्याबद्दल आभार.- आमदार प्रशांत ठाकूर