शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

लोंबकळणाऱ्या तारांची टांगती तलवार, घणसोली परिसरातील पाच गावांत समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:07 IST

घणसोली गावठाणात भूमिगत करण्यात आलेल्या अनेक केबल्स जमिनीवरून लोंबकळत आहेत. रस्त्याने चालताना विजेच्या केबल्स डोक्यावरून लोंबकळत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या लपंडावाचा वाढत्या प्रकाराने घणसोली परिसरातील पाच गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खांबावरील अनेक केबल्स चालताना डोक्यावरून लोंबकळत असून, पावसामुळे रस्त्यावरील उघड्या केबल्समुळे धक्का लागून शॉक लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून येथून येणाºया-जाणाºया पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.घणसोली गावठाणात भूमिगत करण्यात आलेल्या अनेक केबल्स जमिनीवरून लोंबकळत आहेत. रस्त्याने चालताना विजेच्या केबल्स डोक्यावरून लोंबकळत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तळवली गावात भूमिगत करण्यात आलेल्या काही घरगुती वीजपुरवठा करणाºया केबल्स खांबावरच जैसे थे असल्यामुळे सापाप्रमाणे या केबल्सचा आजूबाजूच्या घरांना विळखा घातल्याचे चित्र पाहावयास मिळते, तर नोसिल नाका झोपडपट्टी परिसरात अनेक घरांसमोर तारा लोंबकळत असून काही ठिकाणी या तारांचे जॉइंट मारले असून, त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे आवरण नसल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. विजेच्या दररोजच्या लपंडावामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून सतत रात्री अपरात्री अधूनमधून बत्ती गुल होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.घणसोली परिसरातील पाच गावांमध्ये वीजपुरवठा भूमिगत केबल्समधून केला जात असल्या, तरी अनेक ठिकाणी खांबावरील केबल्सचे जाळे जैसे थे असल्यामुळे वादळी वारा पावसामुळे केबल्स जमिनीवर पडून अपघाताची शक्यता टाळता येत नाही. अनेक ठिकाणी केबल्स गटारातून गेल्याने साफसफाई कामगारांना गटारातील कचरा, तसेच माती, घाण काढणे खूप कठीण जात आहे.घणसोली परिसरात विजेच्या संदर्भात जुन्या केबल्स किवा उघड्या डीपी बॉक्सची समस्या असल्यास त्या पावसाळ्यानंतर पाहणी करून टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील.- दीपक शिंदे,प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ऐरोलीघणसोली परिसरात विजेच्या संदर्भात जुन्या केबल्स किवा उघड्या डीपी बॉक्सची समस्या असल्यास त्या पावसाळ्यानंतर पाहणी करून टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील.- दीपक शिंदे,प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ऐरोलीवीज महावितरणच्या अनेक डीपी बॉक्स उघडे आहेत. सध्या लॉकडाऊन शिथिल झाले असले, तरी शाळा महाविद्यालये, तसेच काही खासगी कार्यालये किंवा कंपन्या सुरू करण्यात न आल्यामुळे घरीच बसून संगणकावर काम करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर नोकरदार आणि व्यावसायिकांचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होत असल्याची तक्रार आहे. विजेच्या वाढत्या समस्येमुळे घरगुती पाण्याचे मोटार पंप बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. हा वीज महावितरण कंपनीचा खेळखंडोबा त्वरित न थांबल्यास ग्रामस्थ महावितरणच्या ऐरोली कार्यालयाला धडक देतील, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :electricityवीजNavi Mumbaiनवी मुंबई