शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळणाऱ्या तारांची टांगती तलवार, घणसोली परिसरातील पाच गावांत समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:07 IST

घणसोली गावठाणात भूमिगत करण्यात आलेल्या अनेक केबल्स जमिनीवरून लोंबकळत आहेत. रस्त्याने चालताना विजेच्या केबल्स डोक्यावरून लोंबकळत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या लपंडावाचा वाढत्या प्रकाराने घणसोली परिसरातील पाच गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खांबावरील अनेक केबल्स चालताना डोक्यावरून लोंबकळत असून, पावसामुळे रस्त्यावरील उघड्या केबल्समुळे धक्का लागून शॉक लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून येथून येणाºया-जाणाºया पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.घणसोली गावठाणात भूमिगत करण्यात आलेल्या अनेक केबल्स जमिनीवरून लोंबकळत आहेत. रस्त्याने चालताना विजेच्या केबल्स डोक्यावरून लोंबकळत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तळवली गावात भूमिगत करण्यात आलेल्या काही घरगुती वीजपुरवठा करणाºया केबल्स खांबावरच जैसे थे असल्यामुळे सापाप्रमाणे या केबल्सचा आजूबाजूच्या घरांना विळखा घातल्याचे चित्र पाहावयास मिळते, तर नोसिल नाका झोपडपट्टी परिसरात अनेक घरांसमोर तारा लोंबकळत असून काही ठिकाणी या तारांचे जॉइंट मारले असून, त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे आवरण नसल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. विजेच्या दररोजच्या लपंडावामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून सतत रात्री अपरात्री अधूनमधून बत्ती गुल होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.घणसोली परिसरातील पाच गावांमध्ये वीजपुरवठा भूमिगत केबल्समधून केला जात असल्या, तरी अनेक ठिकाणी खांबावरील केबल्सचे जाळे जैसे थे असल्यामुळे वादळी वारा पावसामुळे केबल्स जमिनीवर पडून अपघाताची शक्यता टाळता येत नाही. अनेक ठिकाणी केबल्स गटारातून गेल्याने साफसफाई कामगारांना गटारातील कचरा, तसेच माती, घाण काढणे खूप कठीण जात आहे.घणसोली परिसरात विजेच्या संदर्भात जुन्या केबल्स किवा उघड्या डीपी बॉक्सची समस्या असल्यास त्या पावसाळ्यानंतर पाहणी करून टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील.- दीपक शिंदे,प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ऐरोलीघणसोली परिसरात विजेच्या संदर्भात जुन्या केबल्स किवा उघड्या डीपी बॉक्सची समस्या असल्यास त्या पावसाळ्यानंतर पाहणी करून टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील.- दीपक शिंदे,प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ऐरोलीवीज महावितरणच्या अनेक डीपी बॉक्स उघडे आहेत. सध्या लॉकडाऊन शिथिल झाले असले, तरी शाळा महाविद्यालये, तसेच काही खासगी कार्यालये किंवा कंपन्या सुरू करण्यात न आल्यामुळे घरीच बसून संगणकावर काम करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर नोकरदार आणि व्यावसायिकांचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होत असल्याची तक्रार आहे. विजेच्या वाढत्या समस्येमुळे घरगुती पाण्याचे मोटार पंप बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. हा वीज महावितरण कंपनीचा खेळखंडोबा त्वरित न थांबल्यास ग्रामस्थ महावितरणच्या ऐरोली कार्यालयाला धडक देतील, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :electricityवीजNavi Mumbaiनवी मुंबई