शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लोंबकळणाऱ्या तारांची टांगती तलवार, घणसोली परिसरातील पाच गावांत समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:07 IST

घणसोली गावठाणात भूमिगत करण्यात आलेल्या अनेक केबल्स जमिनीवरून लोंबकळत आहेत. रस्त्याने चालताना विजेच्या केबल्स डोक्यावरून लोंबकळत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या लपंडावाचा वाढत्या प्रकाराने घणसोली परिसरातील पाच गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खांबावरील अनेक केबल्स चालताना डोक्यावरून लोंबकळत असून, पावसामुळे रस्त्यावरील उघड्या केबल्समुळे धक्का लागून शॉक लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून येथून येणाºया-जाणाºया पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.घणसोली गावठाणात भूमिगत करण्यात आलेल्या अनेक केबल्स जमिनीवरून लोंबकळत आहेत. रस्त्याने चालताना विजेच्या केबल्स डोक्यावरून लोंबकळत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तळवली गावात भूमिगत करण्यात आलेल्या काही घरगुती वीजपुरवठा करणाºया केबल्स खांबावरच जैसे थे असल्यामुळे सापाप्रमाणे या केबल्सचा आजूबाजूच्या घरांना विळखा घातल्याचे चित्र पाहावयास मिळते, तर नोसिल नाका झोपडपट्टी परिसरात अनेक घरांसमोर तारा लोंबकळत असून काही ठिकाणी या तारांचे जॉइंट मारले असून, त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे आवरण नसल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. विजेच्या दररोजच्या लपंडावामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून सतत रात्री अपरात्री अधूनमधून बत्ती गुल होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले.घणसोली परिसरातील पाच गावांमध्ये वीजपुरवठा भूमिगत केबल्समधून केला जात असल्या, तरी अनेक ठिकाणी खांबावरील केबल्सचे जाळे जैसे थे असल्यामुळे वादळी वारा पावसामुळे केबल्स जमिनीवर पडून अपघाताची शक्यता टाळता येत नाही. अनेक ठिकाणी केबल्स गटारातून गेल्याने साफसफाई कामगारांना गटारातील कचरा, तसेच माती, घाण काढणे खूप कठीण जात आहे.घणसोली परिसरात विजेच्या संदर्भात जुन्या केबल्स किवा उघड्या डीपी बॉक्सची समस्या असल्यास त्या पावसाळ्यानंतर पाहणी करून टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील.- दीपक शिंदे,प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ऐरोलीघणसोली परिसरात विजेच्या संदर्भात जुन्या केबल्स किवा उघड्या डीपी बॉक्सची समस्या असल्यास त्या पावसाळ्यानंतर पाहणी करून टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील.- दीपक शिंदे,प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ऐरोलीवीज महावितरणच्या अनेक डीपी बॉक्स उघडे आहेत. सध्या लॉकडाऊन शिथिल झाले असले, तरी शाळा महाविद्यालये, तसेच काही खासगी कार्यालये किंवा कंपन्या सुरू करण्यात न आल्यामुळे घरीच बसून संगणकावर काम करावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर नोकरदार आणि व्यावसायिकांचे आर्थिकदृष्ट्या नुकसान होत असल्याची तक्रार आहे. विजेच्या वाढत्या समस्येमुळे घरगुती पाण्याचे मोटार पंप बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. हा वीज महावितरण कंपनीचा खेळखंडोबा त्वरित न थांबल्यास ग्रामस्थ महावितरणच्या ऐरोली कार्यालयाला धडक देतील, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :electricityवीजNavi Mumbaiनवी मुंबई