शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रिक्षावाल्यांपुढे आरटीओने टेकले हात

By admin | Updated: June 13, 2017 03:40 IST

शहरातील अनधिकृत रिक्षांवर कारवाईची मागणी होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध संघटनांच्या आडून या अनधिकृत रिक्षा चालत

- सूर्यकांत वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : शहरातील अनधिकृत रिक्षांवर कारवाईची मागणी होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध संघटनांच्या आडून या अनधिकृत रिक्षा चालत असून त्यांना राजकीय पाठबळ देखील मिळत असल्याचे समजते. यामुळे रिक्षाचालकांची दादागिरी वाढत चालली असून त्यांच्यापुढे आरटीओने देखील हात टेकल्याचे दिसत आहे.सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर भर देण्याची गरज असतानाही नवी मुंबईत मात्र दिवसेंदिवस खासगी रिक्षांचे प्रमाण वाढतच चालले आहे. शहरातील अधिकृत रिक्षांच्या दुप्पट संख्येने परवाना नसलेल्या अनधिकृत रिक्षा चालत आहेत. काही जण गुन्हेगारी हालचालीच्या उद्देशाने रिक्षाचालक बनले असून, काहींनी बेरोजगारीला पर्याय म्हणून रिक्षा चालवण्याचा मार्ग निवडला आहे. याचाच गैरफायदा घेत काहींनी परवाना नसलेल्या अनधिकृत रिक्षा भाड्याने देण्याचा देखील व्यवसाय मांडला आहे. त्यानुसार शहरात अनधिकृत (बोगस) रिक्षा चालक व मालकांची टोळी सक्रिय झाली आहे. तर राजकीय वरदहस्त लाभत असल्यामुळे त्यांच्याकडून प्रवाशांना तसेच अधिकृत रिक्षाचालकांना वेठीस धरले जात आहे. यासंबंधी काही अधिकृत रिक्षाचालक संघटनांसह प्रवाशांनी देखील आरटीओकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र तक्रारीनंतर ठरावीक जणांवर कारवाई केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती असते. यामुळे नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर, सारसोळे गाव, घणसोली रेल्वे स्थानकासमोर, सीवूड अशा ठिकाणी अधिकृत - अनधिकृत रिक्षाचालकांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. भविष्यात अनधिकृत रिक्षाचालकांकडून संपूर्ण शहर वेठीस धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच शहरातील अनधिकृत रिक्षांचे जाळे मोडीत काढण्याची मागणी होत आहे. यापूर्वी पुणे, ठाणे येथे रिक्षाचालकांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने स्मार्ट कार्ड योजना राबवण्याचा प्रयत्न झालेला आहे. असाच उपक्रम स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्याद्वारे अधिकृत रिक्षाची सहज ओळख पटेल. शिवाय रात्रीच्या वेळी रिक्षाने प्रवास करणाऱ्या एकट्या प्रवाशाला चालकाविषयीची माहिती सहज उपलब्ध होईल. परंतु शासनाकडून कोणताही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास विरोध करण्याचा रिक्षाचालकांनी पायंडा पाडला आहे. यापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीटर, गणवेश, भाडे दर निश्चितीला रिक्षाचालकांनी विरोध केलेला आहे. त्याद्वारे अनधिकृत रिक्षाचालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून साकारलेल्या खारघरमध्ये तर रिक्षाचालकांनी नियमच धाब्यावर बसवले आहेत. आरटीओने निश्चित केलेल्या दरांऐवजी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत आहे. हीच परिस्थिती वाशी, कोपरखैरणे, नेरुळ, सीवूड याठिकाणी पहायला मिळत आहे. शेअर भाडे आकारण्यासाठी मार्ग ठरवून दिलेले असतानाही त्याचे पालन होत नाही. तर एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे येण्याची मागणी केल्यास रिक्षाचालकाकडून दिवसा देखील हाफ रिटर्नच्या बहाण्याने जादा रकमेची मागणी केली जाते.- प्रवाशांची अडवणूक करून रात्री १२ ऐवजी १0 वाजताच प्रवाशांकडून हाफ रिटर्न भाडे आकारणी केली जाते. त्याकरिता मीटरमध्ये बेकायदेशीररीत्या छेडछाड केली जात असल्याचा काहींचा आरोप आहे. यापूर्वी असे काही प्रकार उघडकीस देखील आलेले आहेत.- रिक्षासाठी आवश्यक ठिकाणी थांबे निश्चित करून देण्यात आले आहेत. परंतु बेशिस्त रिक्षाचालकांनी शहरातील सर्व बस थांब्यावरच रिक्षास्टँड तयार केले आहेत. यामुळे प्रवाशांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.- काही रिक्षा थांब्यावर रात्रीच्या वेळी दारूच्या पार्ट्या रंगतात. रात्रीच्या वेळी मद्यपान अथवा नशा करून काही जण रिक्षा चालवत असल्याने त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. - शहरातील सर्व विनापरवाना अनधिकृत रिक्षांवर आरटीओकडून कारवाई होणे अपेक्षित असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे प्रवासी वेठीस धरले जात आहेत.