शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

मसाला मार्केटमधील अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Updated: June 15, 2016 01:43 IST

एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील अनधिकृत वाढीव बांधकामांवर अखेर महापालिकेने हातोडा घातला, तर कारवाई टाळण्यासाठी ज्या व्यापाऱ्यांनी गाळे बंद केले त्यांच्या गाळ्यांना सील ठोकण्यात

नवी मुंबई : एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील अनधिकृत वाढीव बांधकामांवर अखेर महापालिकेने हातोडा घातला, तर कारवाई टाळण्यासाठी ज्या व्यापाऱ्यांनी गाळे बंद केले त्यांच्या गाळ्यांना सील ठोकण्यात आले आहे. एपीएमसी आवारात महापालिकेने केलेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे. यावेळी कारवाईच्या विरोधात काही व्यापाऱ्यांनी गाळे बंद करून परिसरात तणाव निर्माण केला होता.एपीएमसी मार्केट आवारात होत असलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामांकडे अद्यापपर्यंत दुर्लक्ष केले जात होते. टपऱ्या, हॉटेल तसेच कार्यालये अनधिकृतपणे उभारण्यासह गाळ्यांमध्ये देखील विनापरवाना वाढीव बांधकामे करण्यात आलेली होती. मालाची साठवणूक करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हे पोटमाळे बांधले होते. व्यावसायिक गाळ्यांची मूळ रचना बदलून केलेल्या या बांधकामांना महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. परंतु आजतागायत या अनधिकृत बांधकामांकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानेही पाठ फिरवली होती. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एपीएमसी आवाराचा आढावा घेतल्यानंतर त्याठिकाणच्या विनापरवाना वाढीव बांधकामांवर कारवाईच्या सूचना अतिक्रमण विरोधी पथकाला दिल्या होत्या. यानुसार तुर्भे विभाग कार्यालयामार्फत सुमारे शंभरहून अधिक व्यापाऱ्यांना महिन्याच्या मुदतीची नोटीस बजावण्यात आली होती. या मुदतीत व्यापाऱ्यांनी स्वत:हून वाढीव बांधकामे न हटवल्यामुळे मसाला मार्केटच्या डी गल्लीतील ३४ गाळ्यांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. यापूर्वी दोनदा त्याठिकाणची कारवाई टळली होती. १६ मे रोजी कारवाईदरम्यान व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे कारवाई थांबवली होती, तर २ जूनला पोलीस बंदोबस्ताअभावी कारवाई झाली नव्हती. अखेर मंगळवारी चोख पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. कारवाईच्या अनुषंगाने पोलिसांच्या उपस्थितीमुळे सकाळपासूनच मसाला मार्केटला छावणीचे रूप आले होते. दरम्यान, कारवाई टाळण्याकरिता काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून विरोध करण्याचाही प्रयत्न केला. परंतु एपीएमसी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे इतर व्यापाऱ्यांनी गाळे बंद करून कारवाईत अडथळा निर्माण केला. यामुळे ३२ गाळ्यांना सील ठोकल्याचे अतिक्रमण उपआयुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले. सील केलेल्या गाळ्यांमध्ये मर्र्चट चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा यांच्याही गाळ्याचा समावेश आहे. तर दोन गाळेधारकांनी स्वत:हून पोटमाळे पाडायला सुरवात केली.एपीएमसी मार्केटमध्ये महापालिकेने पहिल्याच दणक्यात ३४ गाळ्यांवर कारवाई केल्यामुळे अनधिकृत बांधकाम केलेल्या इतर व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार शहरात इतर ठिकाणी सुरू असलेल्या कारवाया पाहूनच मार्केटमधील बहुतांश व्यापाऱ्यांनी यापूर्वीच त्यांची अतिक्रमणे हटवलेली आहेत. परंतु मसाला मार्केटच्या डी गल्लीतील व्यापारी महापालिकेला एपीएमसीत कारवाईचा अधिकारच नसल्याच्या भ्रमात होते. मात्र प्रत्यक्षात महापालिकेचे पथक त्याठिकाणी धडकल्यानंतर याच व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना कारवाई टाळण्यासाठी आटापिटा करावा लागला. (प्रतिनिधी)आणखी वृत्त/३‘लोकमत’ने उठवला आवाजएपीएमसीतील अतिक्रमणांविरोधात ‘लोकमत’ने अनेकदा आवाज उठवला आहे. मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या झुंडशाहीवरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला होता. मंगळवारी झालेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर होत असलेल्या कारवायांमागे राजकीय कारण असल्याचा आरोप नवी मुंबई मर्चंट चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा यांनी केला आहे. माथाडी कामगारांच्या सोयीसाठी व्यापाऱ्यांनी पोटमाळे तयार करून त्याठिकाणी मालाची साठवण केली जात आहे. तसेच मार्केटच्या एफएसआयचा प्रश्न न्यायालयीन स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने कायद्याची तरतूद करून पोटमाळ्याचे बांधकाम नियमित करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंबंधी पालिका आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.