शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

व्यावसायिक वापराच्या जागांचे भाडे निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:27 IST

लॉकडाऊनचा परिणाम : अनेकांनी केले व्यवसाय बंद

कमलाकर कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाऊनमुळे वाणिज्य वापराच्या जागांचे भाडे निम्म्यावर आले आहे. दुकानाचे भाडे देणे शक्य नसल्याने अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. त्यामुळे व्यावसायिक वापराच्या शेकडो मालमत्ता वापराविना पडून आहेत. त्यामुळे या मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले असून, होणारे नुकसान कमी करण्यासाठी अनेकांनी भाडेदर निम्म्यावर आणल्याचे समजते.

देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. लहान-मोठ्या सर्वच व्यावसायांना टाळे लागले आहेत. विशेष म्हणजे, बहुतांशी व्यवसाय भाडेतत्त्वावरील जागेवर केले जातात, परंतु मागील चार महिन्यांपासून सर्वच व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे भाडे थकले आहे. धंदाच नसेल, तर भाडे कुठून देणार, असा प्रश्न या व्यावसायिकांना सतावत आहे. त्यामुळे अनेकांनी व्यवसाय बंद करून घरी बसणे पसंत केले आहे. नवी मुंबई शहरात अशा व्यावसायिकांची संख्या लक्षणीय आहे. दुकान किंवा गाळ्याच्या मासिक भाड्यातून अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, परंतु मागील चार महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने भाडेही थकले आहे. त्यामुळे दुकान मालकांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे. याचा परिणाम म्हणून अनेकांनी थकीत भाडेवसुलीसाठी संबंधित दुकानचालकांच्या मागे तगादा लावला आहे. काही दुकानचालकांनी स्वत:च आपले व्यवसाय बंद करून गावाकडे स्थलांतर केले आहे.

मागील चार महिन्यांत ही प्रक्रिया वेगाने वाढल्याने शहरातील अनेक दुकाने व गाळ्यांना टाळे लागले आहेत. दुकाने विनावापर बंद ठेवणे गाळे मालकांना परवडणारे नसल्याने अनेकांनी मिळेल त्या भाडेदरावर आपली दुकाने भाडेतत्त्वावर देण्याचा सपाटा लावला आहे. काही ठिकाणी तर हे भाडे चक्क निम्म्यावर आल्याचे इस्टेट एजेंट सांगतात. त्या तुलनेत निवासी जागांच्या भाडेदरात कोणताही परिणाम झाल्याचे जाणवत नाही. कारण सध्याच्या परिस्थितीत कोणीही आपली निवासी जागा बदलण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे घरभाडेसुद्धा थकले आहे. काहींनी वसुलीसाठी भाडेकरूंच्या मागे तगादा लावला आहे, तर काहींनी मोठ्या मनाने मागील तीन महिन्यांचे भाडे माफ केल्याची उदाहरणे आहेच्दुकाने विनावापर बंद ठेवणे गाळे मालकांना परवडणारे नसल्याने अनेकांनी मिळेल त्या भाडेदरावर आपली दुकाने भाडेतत्त्वावर देण्याचा सपाटा लावला आहे. काही ठिकाणी तर हे भाडे चक्क निम्म्यावर आल्याचे इस्टेट एजेंट सांगतात.लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिकांनी आपले दुकान किंवा गाळे मालकांबरोबरचा भाडेकरार रद्द केला आहे. नवीन भाडेकरू येत नसल्याने दुकानमालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेले बरे, या भावनेतून अनेक जण मिळेल त्या दराने आपली दुकाने भाडेतत्त्वावर देण्यास तयार झाले आहेत. वाशीसारख्या विभागात सध्या दुकानाचे भाडे निम्म्यावर आले आहे.-मिलिंद पाटीलप्रॉपर्टी कन्सल्टंट, वाशी.