शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

व्यावसायिक वापराच्या जागांचे भाडे निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:27 IST

लॉकडाऊनचा परिणाम : अनेकांनी केले व्यवसाय बंद

कमलाकर कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाऊनमुळे वाणिज्य वापराच्या जागांचे भाडे निम्म्यावर आले आहे. दुकानाचे भाडे देणे शक्य नसल्याने अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. त्यामुळे व्यावसायिक वापराच्या शेकडो मालमत्ता वापराविना पडून आहेत. त्यामुळे या मालमत्ताधारकांचे धाबे दणाणले असून, होणारे नुकसान कमी करण्यासाठी अनेकांनी भाडेदर निम्म्यावर आणल्याचे समजते.

देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. लहान-मोठ्या सर्वच व्यावसायांना टाळे लागले आहेत. विशेष म्हणजे, बहुतांशी व्यवसाय भाडेतत्त्वावरील जागेवर केले जातात, परंतु मागील चार महिन्यांपासून सर्वच व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे भाडे थकले आहे. धंदाच नसेल, तर भाडे कुठून देणार, असा प्रश्न या व्यावसायिकांना सतावत आहे. त्यामुळे अनेकांनी व्यवसाय बंद करून घरी बसणे पसंत केले आहे. नवी मुंबई शहरात अशा व्यावसायिकांची संख्या लक्षणीय आहे. दुकान किंवा गाळ्याच्या मासिक भाड्यातून अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, परंतु मागील चार महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने भाडेही थकले आहे. त्यामुळे दुकान मालकांचेही आर्थिक गणित कोलमडले आहे. याचा परिणाम म्हणून अनेकांनी थकीत भाडेवसुलीसाठी संबंधित दुकानचालकांच्या मागे तगादा लावला आहे. काही दुकानचालकांनी स्वत:च आपले व्यवसाय बंद करून गावाकडे स्थलांतर केले आहे.

मागील चार महिन्यांत ही प्रक्रिया वेगाने वाढल्याने शहरातील अनेक दुकाने व गाळ्यांना टाळे लागले आहेत. दुकाने विनावापर बंद ठेवणे गाळे मालकांना परवडणारे नसल्याने अनेकांनी मिळेल त्या भाडेदरावर आपली दुकाने भाडेतत्त्वावर देण्याचा सपाटा लावला आहे. काही ठिकाणी तर हे भाडे चक्क निम्म्यावर आल्याचे इस्टेट एजेंट सांगतात. त्या तुलनेत निवासी जागांच्या भाडेदरात कोणताही परिणाम झाल्याचे जाणवत नाही. कारण सध्याच्या परिस्थितीत कोणीही आपली निवासी जागा बदलण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे घरभाडेसुद्धा थकले आहे. काहींनी वसुलीसाठी भाडेकरूंच्या मागे तगादा लावला आहे, तर काहींनी मोठ्या मनाने मागील तीन महिन्यांचे भाडे माफ केल्याची उदाहरणे आहेच्दुकाने विनावापर बंद ठेवणे गाळे मालकांना परवडणारे नसल्याने अनेकांनी मिळेल त्या भाडेदरावर आपली दुकाने भाडेतत्त्वावर देण्याचा सपाटा लावला आहे. काही ठिकाणी तर हे भाडे चक्क निम्म्यावर आल्याचे इस्टेट एजेंट सांगतात.लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिकांनी आपले दुकान किंवा गाळे मालकांबरोबरचा भाडेकरार रद्द केला आहे. नवीन भाडेकरू येत नसल्याने दुकानमालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असलेले बरे, या भावनेतून अनेक जण मिळेल त्या दराने आपली दुकाने भाडेतत्त्वावर देण्यास तयार झाले आहेत. वाशीसारख्या विभागात सध्या दुकानाचे भाडे निम्म्यावर आले आहे.-मिलिंद पाटीलप्रॉपर्टी कन्सल्टंट, वाशी.