शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गुणाले तलाव बनलेय वॉशिंग सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:29 IST

घणसोलीतील प्रकार : सुरक्षारक्षक गायब, तळीरामांचे आश्रयस्थान; दुर्गंधीयुक्त पाणी

अनंत पाटील

नवी मुंबई : तलाव व्हिजनअंतर्गत महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून एकूण २४ तलावांपैकी १८ तलावांचे सुशोभीकरण केले आहे. त्यातील घणसोली गावातील गुणाले तलावाची पार दुरवस्था झाली आहे. तलावाच्या बाजूला वाहने धुण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून या तलावांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकण्यात येत असल्यामुळे जलप्रदूषित दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेकदा मासळी मरण्याच्या अनेक घटना घडत आहेत. केरकचरा आणि निर्माल्याच्या ढिगाऱ्यामुळे अक्षरश: स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे फुसका बार असल्याची टीका होत आहे. लॉकडाऊन कालावधीत ५५ लाख रुपये खर्चून या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आल्यानंतरही परिस्थिती जैसे असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

वाहने धुण्याचे सर्व्हिस सेंटरघणसोली येथील महापालिकेच्या गुणाले तलावाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी १८ हजार रुपये मासिक पगारावर दोन कंत्राटी सुरक्षारक्षक नेमण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, तेथे त्यांचा पत्ताच नसल्यामुळे दर रविवारी कार, दुचाकी टेम्पो, वाहने धुतली जातात. त्यामुळे रसायने, ज्वालाग्राही पदार्थ आणि इंधन तलावात मिसळून पाणी दूषित होत असते. निर्माल्य कुंड असून, भाविकांनी त्यात टाकलेले निर्माल्य तलावात मिसळून पाण्याला दुर्गंधी येते. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत संपूर्ण शहरात ‘स्वच्छ नवी मुंबई, सुंदर नवी मुंबई’ असे स्वच्छतेचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने लाखो रुपये खर्चून नोड्स आणि गावठाणात ठिकठिकाणी रंगरंगोटीचे काम सुरू आहे. मात्र, तलावाच्या दूषित सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नाक तोंड दाबून जावे लागत आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या वतीने ५५ लाख रुपयांची निविदा काढून स्थापत्य विभागाच्या वतीने तत्कालीन कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार यांच्या देखरेखीखाली या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम चांगल्या प्रकारे करण्यात आले होते. मात्र, महापालिकेकडून दोन सुरक्षारक्षक नेमण्यात येऊनही ते केवळ कागदोपत्री हजेरीपटावर आहेत की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

गुणाले तलाव तळीरामांचा अड्डाया तलावांची देखभाल करण्यासाठी महापालिकेचा सुरक्षारक्षक नसल्यामुळे रात्रीच्या वेळी तर तळीराम येथे दारूच्या बाटल्या घेऊन दारू पीत असतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, तसेच महापालिकेने तलावाच्या सुशोभीकरणामध्ये बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

घणसोली परिसरातील तलावांची पाहणी करून, आवश्यक साफसफाई संदर्भात महापालिकेला अहवाल पाठविला जाईल. सुरक्षारक्षकाच्या बाबतीत चौकशी केली जाईल.- महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, घणसोली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई