शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

गुणाले तलाव बनलेय वॉशिंग सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:29 IST

घणसोलीतील प्रकार : सुरक्षारक्षक गायब, तळीरामांचे आश्रयस्थान; दुर्गंधीयुक्त पाणी

अनंत पाटील

नवी मुंबई : तलाव व्हिजनअंतर्गत महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून एकूण २४ तलावांपैकी १८ तलावांचे सुशोभीकरण केले आहे. त्यातील घणसोली गावातील गुणाले तलावाची पार दुरवस्था झाली आहे. तलावाच्या बाजूला वाहने धुण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून या तलावांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकण्यात येत असल्यामुळे जलप्रदूषित दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे अनेकदा मासळी मरण्याच्या अनेक घटना घडत आहेत. केरकचरा आणि निर्माल्याच्या ढिगाऱ्यामुळे अक्षरश: स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे फुसका बार असल्याची टीका होत आहे. लॉकडाऊन कालावधीत ५५ लाख रुपये खर्चून या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आल्यानंतरही परिस्थिती जैसे असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

वाहने धुण्याचे सर्व्हिस सेंटरघणसोली येथील महापालिकेच्या गुणाले तलावाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी १८ हजार रुपये मासिक पगारावर दोन कंत्राटी सुरक्षारक्षक नेमण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, तेथे त्यांचा पत्ताच नसल्यामुळे दर रविवारी कार, दुचाकी टेम्पो, वाहने धुतली जातात. त्यामुळे रसायने, ज्वालाग्राही पदार्थ आणि इंधन तलावात मिसळून पाणी दूषित होत असते. निर्माल्य कुंड असून, भाविकांनी त्यात टाकलेले निर्माल्य तलावात मिसळून पाण्याला दुर्गंधी येते. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत संपूर्ण शहरात ‘स्वच्छ नवी मुंबई, सुंदर नवी मुंबई’ असे स्वच्छतेचे दर्शन घडविण्याच्या उद्देशाने लाखो रुपये खर्चून नोड्स आणि गावठाणात ठिकठिकाणी रंगरंगोटीचे काम सुरू आहे. मात्र, तलावाच्या दूषित सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नाक तोंड दाबून जावे लागत आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी या तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या वतीने ५५ लाख रुपयांची निविदा काढून स्थापत्य विभागाच्या वतीने तत्कालीन कार्यकारी अभियंता अनिल नेरपगार यांच्या देखरेखीखाली या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम चांगल्या प्रकारे करण्यात आले होते. मात्र, महापालिकेकडून दोन सुरक्षारक्षक नेमण्यात येऊनही ते केवळ कागदोपत्री हजेरीपटावर आहेत की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

गुणाले तलाव तळीरामांचा अड्डाया तलावांची देखभाल करण्यासाठी महापालिकेचा सुरक्षारक्षक नसल्यामुळे रात्रीच्या वेळी तर तळीराम येथे दारूच्या बाटल्या घेऊन दारू पीत असतात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, तसेच महापालिकेने तलावाच्या सुशोभीकरणामध्ये बाधा आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

घणसोली परिसरातील तलावांची पाहणी करून, आवश्यक साफसफाई संदर्भात महापालिकेला अहवाल पाठविला जाईल. सुरक्षारक्षकाच्या बाबतीत चौकशी केली जाईल.- महेंद्रसिंग ठोके, विभाग अधिकारी, घणसोली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई