शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

१६,६१६ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

By admin | Updated: January 24, 2017 06:03 IST

सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजीत शिवआधार स्पर्धा परीक्षा उपक्रमामध्ये ४२ शाळांमधील १६६१६ विद्यार्थ्यांनी

नवी मुंबई : सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजीत शिवआधार स्पर्धा परीक्षा उपक्रमामध्ये ४२ शाळांमधील १६६१६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबीरे आयोजीत करण्यात आले होते. आजी - माजी सनदी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्तरेकडील व दक्षीणेकडील राज्यांमधील तरूण प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. रेल्वेतील क्लॉर्क ते आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही याच राज्यांमधील टक्केवारी अधिक आहे. तेथे प्राथमीक शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांविषयी मार्गदर्शन करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतही या परीक्षांविषयी फारशी माहिती नसते. यामुळे गुणवत्ता असूनही अद्याप प्रशासकिय सेवेतील टक्का कमी आहे. हा टक्का वाढावा यासाठी शिवसेना नगरसेवक संजू आधार वाडे यांनी सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शिवआधार स्पर्धा परिक्षा हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील खाजगी व महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देण्यात आली. तज्ज्ञांकडून स्पर्धा परिक्षेचे महत्व व अभ्यास कसा करायचा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पाचवी ते सहावी, सातवी व आठवी, ९ वी दहावी , ११ वी १२वी व एफ. वाय. ते पदवी अशा पाच गटामध्ये ही परीक्षा घेण्यात आली. तब्बल १६६१६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला. स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी मानवता संघटना, पतंजली योगा गृप, ज्येष्ठ नागरीक संघटना, रिक्षा चालक मालक संघटना, यु.पी. बिहार संघटना, मुस्लीम संघटना, जयभीम मित्र मंडळ, जेष्ठ नागरीक संघटनांनी स्वेच्छेने सहभाग घेतला होता. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, विजय नाहटा, विजय चौगुले, प्रकाश बावीस्कर, शाळांमधील शिक्षक, मुख्याद्यापक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.