शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

आयुक्तालयातील गुन्ह्यांचा वाढतोय आलेख

By admin | Updated: January 9, 2016 02:25 IST

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २००४ पासून तब्बल २३,०४८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. गुन्ह्यांचा बॅकलॉग प्रतिवर्षी वाढतच चालला आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईपोलीस आयुक्तालय क्षेत्रात २००४ पासून तब्बल २३,०४८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. गुन्ह्यांचा बॅकलॉग प्रतिवर्षी वाढतच चालला आहे. तपास लागलेल्या गुन्ह्यांचे श्रेय घेण्यासाठी अधिकारी धडपडत असतात. परंतु प्रलंबित गुन्ह्यांविषयी मात्र कोणीच काही बोलत नाही. आतापर्यंत १३७ खुनाचे गुन्हे व १२,१३४ चोरीच्या गुन्ह्यांचा तपासही प्रलंबित असून याप्रकरणी पीडित नागरिकांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून २०१५ या वर्षातील कामगिरीची माहिती दिली. गत १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्षभरात ५४०५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यामधील ३६२० गुन्ह्यांचा तपास लागला असून तब्बल १७४८ गुन्हे प्रलंबित आहेत. प्रत्येक वर्षी गुन्ह्यांचा हा बॅकलॉग वाढत चालला आहे. पोलिसांच्या वार्षिक अहवालाप्रमाणे २००४ पासून शहरात विविध प्रकारचे ५६,५६५ गुन्हे घडले आहेत. यामधील ३३,५१७ गुन्ह्यांचाच तपास लागला आहे. अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ऐरोलीतील काँगे्रसचे नगरसेवक अनंत काळे यांची जवळपास सात वर्षांपूर्वी ऐरोलीमध्ये हत्या झाली. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विश्वास पाटील, वाशीतील डेंटिस्ट महिला डॉक्टर, घणसोलीमधील एटीएममधील सुरक्षा रक्षकाचा खून, बेलापूरमधील पारसिक हिलवर विदेशी महिलेवर झालेला बलात्कार या प्रमुख गुन्ह्यांमधील आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. खुनाच्या १३७ गुन्ह्यांचा तपास शिल्लक असून त्यांचे आरोपी कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात चोरी, घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी काही टोळ्यांना जेरबंद केले असले तरी प्रत्येक वर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढच होत आहे. प्रत्येक वर्षी जवळपास ८० ते १०० कोटी रुपयांचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तूंची चोरी होत आहे. फक्त ३० ते ३५ टक्के चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. घरफोडी व सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना वाढल्याने महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. चोरी गेलेले दागिने कधी परत मिळणार अशी विचारणा करण्यासाठी अनेक जण पोलीस स्टेशनमध्ये जातात. परंतु काहीही होत नसल्याचे लक्षात येताच पाठपुरावा करण्याचेही सोडून देत आहेत. १२ वर्षांमध्ये १६१४ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. घर घेण्याच्या व नोकरीच्या आमिषाने अनेकांना फसविले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये हडप करून आरोपी खुलेआम फिरत आहेत. ज्यांच्यावर कारवाई झाली तेही काही दिवसामध्ये जामिनावर सुटून बिनधास्तपणे समाजात उजळ माथ्याने फिरत असून पीडित नागरिक मात्र न्यायासाठी पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.नवी मुंबई स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. परंतु इतर शहरांप्रमाणे या परिसरातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. २००४ मध्ये ३० महिलांवर अतिप्रसंग झाल्याचे गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये ही संख्या १०४ झाली आहे. विनयभंगाचे गुन्हे ३३ वरून २०२ झाले आहेत. या कालावधीमध्ये अतिप्रसंगाच्या २१ गुन्ह्यांचा व विनयभंगाच्या २५ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. याशिवाय सोनसाखळी चोरी व महिलांविषयी इतर गुन्ह्यांचे प्रमाणही प्रचंड असून ते कमी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.फसवणुकीचे गुन्हे रोखण्याचे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर फसवणुकीचे गुन्हे थांबविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. घरे घेवून देण्याच्या बहाण्याने बिल्डर नागरिकांची फसवणूक करत आहेत. अनधिकृत इमारती उभ्या करून तेथील घरे अधिकृत असल्याचे भासवून फसवणूक केली जात आहे. १२ वर्षांपूर्वी फसवणुकीच्या १४२ घटना घडल्या होत्या. गतवर्षी ही संख्या तीन पटीने वाढून ५६३ झाली आहे. भविष्यात या गुन्ह्यांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरफोडीचे गुन्हे दुप्पटशहरात रात्री व दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाणही दुप्पट झाले आहे. २००४ मध्ये वर्षभरामध्ये ३१३ गुन्हे घडले होते, ते २०१५ ला ६१९ वर गेले आहेत. नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. घर बंद करून कामावर गेलेल्या नागरिकांना सायंकाळी येण्यापूर्वीच दरवाजा तोडून चोर दागिने व रोकड घेवून पळून जात आहेत. सुटीवर गेलेल्या नागरिकांना परत येईपर्यंत घर सुरक्षित राहील याची खात्री राहिलेली नाही.