शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

आयुक्तालयातील गुन्ह्यांचा वाढतोय आलेख

By admin | Updated: January 9, 2016 02:25 IST

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २००४ पासून तब्बल २३,०४८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. गुन्ह्यांचा बॅकलॉग प्रतिवर्षी वाढतच चालला आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईपोलीस आयुक्तालय क्षेत्रात २००४ पासून तब्बल २३,०४८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. गुन्ह्यांचा बॅकलॉग प्रतिवर्षी वाढतच चालला आहे. तपास लागलेल्या गुन्ह्यांचे श्रेय घेण्यासाठी अधिकारी धडपडत असतात. परंतु प्रलंबित गुन्ह्यांविषयी मात्र कोणीच काही बोलत नाही. आतापर्यंत १३७ खुनाचे गुन्हे व १२,१३४ चोरीच्या गुन्ह्यांचा तपासही प्रलंबित असून याप्रकरणी पीडित नागरिकांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून २०१५ या वर्षातील कामगिरीची माहिती दिली. गत १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्षभरात ५४०५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यामधील ३६२० गुन्ह्यांचा तपास लागला असून तब्बल १७४८ गुन्हे प्रलंबित आहेत. प्रत्येक वर्षी गुन्ह्यांचा हा बॅकलॉग वाढत चालला आहे. पोलिसांच्या वार्षिक अहवालाप्रमाणे २००४ पासून शहरात विविध प्रकारचे ५६,५६५ गुन्हे घडले आहेत. यामधील ३३,५१७ गुन्ह्यांचाच तपास लागला आहे. अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ऐरोलीतील काँगे्रसचे नगरसेवक अनंत काळे यांची जवळपास सात वर्षांपूर्वी ऐरोलीमध्ये हत्या झाली. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विश्वास पाटील, वाशीतील डेंटिस्ट महिला डॉक्टर, घणसोलीमधील एटीएममधील सुरक्षा रक्षकाचा खून, बेलापूरमधील पारसिक हिलवर विदेशी महिलेवर झालेला बलात्कार या प्रमुख गुन्ह्यांमधील आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. खुनाच्या १३७ गुन्ह्यांचा तपास शिल्लक असून त्यांचे आरोपी कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात चोरी, घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी काही टोळ्यांना जेरबंद केले असले तरी प्रत्येक वर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढच होत आहे. प्रत्येक वर्षी जवळपास ८० ते १०० कोटी रुपयांचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तूंची चोरी होत आहे. फक्त ३० ते ३५ टक्के चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. घरफोडी व सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना वाढल्याने महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. चोरी गेलेले दागिने कधी परत मिळणार अशी विचारणा करण्यासाठी अनेक जण पोलीस स्टेशनमध्ये जातात. परंतु काहीही होत नसल्याचे लक्षात येताच पाठपुरावा करण्याचेही सोडून देत आहेत. १२ वर्षांमध्ये १६१४ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. घर घेण्याच्या व नोकरीच्या आमिषाने अनेकांना फसविले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये हडप करून आरोपी खुलेआम फिरत आहेत. ज्यांच्यावर कारवाई झाली तेही काही दिवसामध्ये जामिनावर सुटून बिनधास्तपणे समाजात उजळ माथ्याने फिरत असून पीडित नागरिक मात्र न्यायासाठी पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.नवी मुंबई स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. परंतु इतर शहरांप्रमाणे या परिसरातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. २००४ मध्ये ३० महिलांवर अतिप्रसंग झाल्याचे गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये ही संख्या १०४ झाली आहे. विनयभंगाचे गुन्हे ३३ वरून २०२ झाले आहेत. या कालावधीमध्ये अतिप्रसंगाच्या २१ गुन्ह्यांचा व विनयभंगाच्या २५ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. याशिवाय सोनसाखळी चोरी व महिलांविषयी इतर गुन्ह्यांचे प्रमाणही प्रचंड असून ते कमी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.फसवणुकीचे गुन्हे रोखण्याचे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर फसवणुकीचे गुन्हे थांबविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. घरे घेवून देण्याच्या बहाण्याने बिल्डर नागरिकांची फसवणूक करत आहेत. अनधिकृत इमारती उभ्या करून तेथील घरे अधिकृत असल्याचे भासवून फसवणूक केली जात आहे. १२ वर्षांपूर्वी फसवणुकीच्या १४२ घटना घडल्या होत्या. गतवर्षी ही संख्या तीन पटीने वाढून ५६३ झाली आहे. भविष्यात या गुन्ह्यांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरफोडीचे गुन्हे दुप्पटशहरात रात्री व दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाणही दुप्पट झाले आहे. २००४ मध्ये वर्षभरामध्ये ३१३ गुन्हे घडले होते, ते २०१५ ला ६१९ वर गेले आहेत. नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. घर बंद करून कामावर गेलेल्या नागरिकांना सायंकाळी येण्यापूर्वीच दरवाजा तोडून चोर दागिने व रोकड घेवून पळून जात आहेत. सुटीवर गेलेल्या नागरिकांना परत येईपर्यंत घर सुरक्षित राहील याची खात्री राहिलेली नाही.