शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

आयुक्तालयातील गुन्ह्यांचा वाढतोय आलेख

By admin | Updated: January 9, 2016 02:25 IST

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २००४ पासून तब्बल २३,०४८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. गुन्ह्यांचा बॅकलॉग प्रतिवर्षी वाढतच चालला आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईपोलीस आयुक्तालय क्षेत्रात २००४ पासून तब्बल २३,०४८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. गुन्ह्यांचा बॅकलॉग प्रतिवर्षी वाढतच चालला आहे. तपास लागलेल्या गुन्ह्यांचे श्रेय घेण्यासाठी अधिकारी धडपडत असतात. परंतु प्रलंबित गुन्ह्यांविषयी मात्र कोणीच काही बोलत नाही. आतापर्यंत १३७ खुनाचे गुन्हे व १२,१३४ चोरीच्या गुन्ह्यांचा तपासही प्रलंबित असून याप्रकरणी पीडित नागरिकांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून २०१५ या वर्षातील कामगिरीची माहिती दिली. गत १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्षभरात ५४०५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यामधील ३६२० गुन्ह्यांचा तपास लागला असून तब्बल १७४८ गुन्हे प्रलंबित आहेत. प्रत्येक वर्षी गुन्ह्यांचा हा बॅकलॉग वाढत चालला आहे. पोलिसांच्या वार्षिक अहवालाप्रमाणे २००४ पासून शहरात विविध प्रकारचे ५६,५६५ गुन्हे घडले आहेत. यामधील ३३,५१७ गुन्ह्यांचाच तपास लागला आहे. अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ऐरोलीतील काँगे्रसचे नगरसेवक अनंत काळे यांची जवळपास सात वर्षांपूर्वी ऐरोलीमध्ये हत्या झाली. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विश्वास पाटील, वाशीतील डेंटिस्ट महिला डॉक्टर, घणसोलीमधील एटीएममधील सुरक्षा रक्षकाचा खून, बेलापूरमधील पारसिक हिलवर विदेशी महिलेवर झालेला बलात्कार या प्रमुख गुन्ह्यांमधील आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. खुनाच्या १३७ गुन्ह्यांचा तपास शिल्लक असून त्यांचे आरोपी कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात चोरी, घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी काही टोळ्यांना जेरबंद केले असले तरी प्रत्येक वर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढच होत आहे. प्रत्येक वर्षी जवळपास ८० ते १०० कोटी रुपयांचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तूंची चोरी होत आहे. फक्त ३० ते ३५ टक्के चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. घरफोडी व सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना वाढल्याने महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. चोरी गेलेले दागिने कधी परत मिळणार अशी विचारणा करण्यासाठी अनेक जण पोलीस स्टेशनमध्ये जातात. परंतु काहीही होत नसल्याचे लक्षात येताच पाठपुरावा करण्याचेही सोडून देत आहेत. १२ वर्षांमध्ये १६१४ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. घर घेण्याच्या व नोकरीच्या आमिषाने अनेकांना फसविले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये हडप करून आरोपी खुलेआम फिरत आहेत. ज्यांच्यावर कारवाई झाली तेही काही दिवसामध्ये जामिनावर सुटून बिनधास्तपणे समाजात उजळ माथ्याने फिरत असून पीडित नागरिक मात्र न्यायासाठी पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.नवी मुंबई स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. परंतु इतर शहरांप्रमाणे या परिसरातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. २००४ मध्ये ३० महिलांवर अतिप्रसंग झाल्याचे गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये ही संख्या १०४ झाली आहे. विनयभंगाचे गुन्हे ३३ वरून २०२ झाले आहेत. या कालावधीमध्ये अतिप्रसंगाच्या २१ गुन्ह्यांचा व विनयभंगाच्या २५ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. याशिवाय सोनसाखळी चोरी व महिलांविषयी इतर गुन्ह्यांचे प्रमाणही प्रचंड असून ते कमी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.फसवणुकीचे गुन्हे रोखण्याचे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर फसवणुकीचे गुन्हे थांबविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. घरे घेवून देण्याच्या बहाण्याने बिल्डर नागरिकांची फसवणूक करत आहेत. अनधिकृत इमारती उभ्या करून तेथील घरे अधिकृत असल्याचे भासवून फसवणूक केली जात आहे. १२ वर्षांपूर्वी फसवणुकीच्या १४२ घटना घडल्या होत्या. गतवर्षी ही संख्या तीन पटीने वाढून ५६३ झाली आहे. भविष्यात या गुन्ह्यांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरफोडीचे गुन्हे दुप्पटशहरात रात्री व दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाणही दुप्पट झाले आहे. २००४ मध्ये वर्षभरामध्ये ३१३ गुन्हे घडले होते, ते २०१५ ला ६१९ वर गेले आहेत. नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. घर बंद करून कामावर गेलेल्या नागरिकांना सायंकाळी येण्यापूर्वीच दरवाजा तोडून चोर दागिने व रोकड घेवून पळून जात आहेत. सुटीवर गेलेल्या नागरिकांना परत येईपर्यंत घर सुरक्षित राहील याची खात्री राहिलेली नाही.