शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गट, गणातील अनेकांचा मोर्चा प्रभागाकडे

By admin | Updated: January 4, 2017 05:09 IST

पनवेल शहर महानगरपालिका स्थापन झाल्याने महानगरात ग्रामीण भागाचा समावेश झाला आहे. यामुळे ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. याच कारणाने आता

कळंबोली : पनवेल शहर महानगरपालिका स्थापन झाल्याने महानगरात ग्रामीण भागाचा समावेश झाला आहे. यामुळे ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. याच कारणाने आता गण आणि गटातील लढणारे इच्छुक प्रभागात लढण्याची तयारी करू लागले आहेत. काहींची उमेदवारी जवळपास निश्चित झाली तर काहींचे नेत्यांकडे हेलपाटे वाढवले आहेत. याचा परिणाम ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर जाणवू लागला आहे. तिथे उमेदवारीची शोधाशोध केली जात आहे.पूर्वी पनवेल नगरपरिषद फक्त पनवेल शहर, नवीन नोडपुरती मर्यादित होती. उर्वरित ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद होती. खारघरसारख्या सायबर सिटीत राहणाऱ्या उच्चभ्रू सोसायटीतील रहिवाशांना सुध्दा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान करावे लागत होते. एकंदरीत याबाबत शहरी मतदार कमालीचे नाराज होते. त्यांची उदासीनता मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत असे. आता पनवेल महापालिका झाल्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. तर त्यापेक्षा जास्त उत्साह राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये दिसून येत आहे. महापालिकेच्या प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर झाले असून आरक्षणाची सोडतही काढण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या संपर्ककार्यालयापासून ते विविध कार्यक्र मांची घोडदौड सुरू झाली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे गण आणि गट महापालिकेमुळे कमी झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत काहीशी उदासीनता दिसून येत आहे. पूर्वी नावडे विभागात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली जायची, आता हा परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्यासह इतर सदस्य महापालिका लढवणार आहेत. तीच परिस्थिती कळंबोली, कामोठे वसाहतीत आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम या कळंबोलीतील असल्याने त्या महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. माजी पंचायत समिती सभापती, उपसभापती, चंद्रकला शेळके, गोपाळ भगत, प्रमोद भगत, सखाराम पाटील यांचे गण सुध्दा महापालिकेत आले आहेत. त्यामुळे तेही प्रभागवासी झाले आहेत. आत्माराम पाटील यांनी रोडपाली विकास आघाडीची स्थापना केली असून महापालिकेच्या रिंगणात ते उतरणार आहेत.- दोन-अडीच वर्षांपासून पंचायत समितीत सत्ताधारी आणि प्रशासनाला नीलेश पाटील यांनी सळो की पळो करून सोडले. आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक असलेल्या त्यांनी मोमीनपाडा येथे जनसंपर्ककार्यालय सुरू केले आहे.