शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

ऐरोलीतील उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:37 IST

ऐरोली सेक्टर-१८ येथील महापालिकेच्या स्व. रामदास बापू पाटील उद्यानाची दुरवस्था झाली आहे.

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-१८ येथील महापालिकेच्या स्व. रामदास बापू पाटील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानातील खेळणी व बाकडे तुटलेली आहेत. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या मुलांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, उद्यानाचे लोखंडी प्रवेशद्वार गंजलेल्या अवस्थेत असून, काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथील शाळेत घडलेल्या दुर्घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उद्यानाच्या संरक्षण भिंतीचा दक्षिणेकडील भाग कोसळून अनेक महिने झाले तरी त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे लोखंडी फाटक पूर्णत: गंजले आहे. त्याला कुलूपही लावता येत नाही. त्यामुळे उद्यानात दिवस-रात्र गर्दुल्ले आणि प्रेमीयुगलांचा वावर दिसून येतो. विशेष म्हणजे, उद्यानाला गेट आहे; पण तुटलेल्या आणि गंजून सडलेल्या लोखंडी गेटला कुलूपसुद्धा लावता येत नाही. उद्यानाची वेळ पहाटे ५ ते सकाळी १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ अशी आहे. मात्र, ही वेळ केवळ नावापुरतीच राहिली आहे. कारण कुंपणाच्या तुटलेल्या भिंती आणि प्रवेशद्वारातून कोणीही कोणत्याही वेळी आत प्रवेश करीत असल्याचे दिसून येते.उद्यानाच्या पदपथावरील लाद्या तुटलेल्या आहेत, त्यामुळे अनेकदा खेळताना लहान मुले पडण्याच्या घटना घडत आहेत. उद्यानातील दिवे आणि हायमास्ट नियमित बंद असतात. गर्दुल्ले आणि मद्यपींना ही बाब सोयीची ठरली आहे.या उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षण भिंतीला लागून आरसीसी गटारांच्या दुरु स्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे उद्यानात प्रवेश करताना ज्येष्ठ नागरिकांना कसरत करावी लागत आहे. गटाराचे काम पूर्ण करण्याची मुदत कधीच संपून गेली आहे. तरीही हे काम सुरूच असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. उद्यानाच्या दुरवस्थेकडे महापालिका प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे.कोपरखैरणे येथील शाळेचे लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. ऐरोलीतील उद्यानाची अवस्था पाहता, कोपरखैरणेतील दुर्घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे..स्व. रामदास बापू पाटील या महापालिकेच्या उद्यानाची दुरु स्ती करण्यासाठी प्रभाग समितीमार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे लवकरच या उद्यानाची डागडुजी करण्यात येईल. कोपरखैरणे सारखी दुर्घटना घडू नये, यासाठी पुरेपूर काळजी घेऊन सर्वप्रथम प्रवेशद्वाराचे काम करण्यात येणार आहे, तसेच संरक्षण भिंत, पदपथावरील लाद्या, खेळणी आणि बसण्याची बाके आदीची युद्धपातळीवर डागडुजी केली जाईल.- जयंत कांबळे,उपअभियंता, स्थापत्य विभाग, ऐरोली (महापालिका)