शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

अनाथ मुलीच्या विवाहाची जबाबदारी महापालिका स्वीकारणार, स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 02:31 IST

नवी मुंबई : अनाथ मुलीच्या व आर्थिक दुर्बल घटकातील विधवा महिलेच्या पुनर्विवाहास ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत.

नवी मुंबई : अनाथ मुलीच्या व आर्थिक दुर्बल घटकातील विधवा महिलेच्या पुनर्विवाहास ५० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणा-यांना अनुक्रमे ५० व ३० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीअंतर्गत एकूण २७ प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पालिकेच्या योजना पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेने अनाथ मुली व विधवा महिलांच्या पुनर्विवाहास अर्थसाहाय्य देण्याची योजना सुरू केली आहे. यापूर्वी ३५ हजार रूपये अनुदान दिले जात होते. यामध्ये वाढ करून ५० हजार रूपये करण्यात येणार आहे. अर्थार्जन करणारा कुटुंब प्रमुख मृत्यू पावल्यामुळे विधवा महिलांवर चरितार्थाचा प्रश्न निर्माण होत असतो. पुनर्विवाह केल्यास अशा महिलांचे पुढील आयुष्य सुरक्षित होते यामुळे महापालिकेने अनुदान सुरू केले आहे. याशिवाय अनाथ मुलींचे लग्न करताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने महापालिकेने ५० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठीही विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचण्या करणाºयांवरही कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय १ किंवा २ मुलींवर शस्त्रक्रिया करणाºया कुटुंबाला प्रोत्साहनपर अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे. १ मुलीवर शस्त्रक्रिया करणाºयांना ५० हजार रूपये व २ मुलींवर शस्त्रक्रिया करणाºयांना ३० हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.