शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत

By admin | Updated: August 5, 2015 00:17 IST

तालुक्यातील १५ ग्रामपंचायातच्या निवडणुका मंगळवारी शांततेत पार पडल्या. ३ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांचा यामध्ये समावेश होता.

पनवेल : तालुक्यातील १५ ग्रामपंचायातच्या निवडणुका मंगळवारी शांततेत पार पडल्या. ३ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांचा यामध्ये समावेश होता. ९४ टक्के मतदान झाले असून गुरु वारी या निवडणुकाचे निकाल जाहीर होणार आहेत. हरीग्राम, पाली देवद, केवाळे, उसर्ली खुर्द, तरघर, वलप, खैरवाडी, उमरोली, पाले बुद्रुक, पिसार्वे, आकुर्ली, आपटे, वारादोली, खाणाव, देवलोळी आदींसह गव्हाण, उलवे, जांभिवली या तीन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका यावेळी पार पडल्या. पनवेल मधील ग्रामीण भागात शेकापची ताकद मोठी असल्याचे बोलले जाते. यापैकी अनेक ग्रामपंचायतींवर शेकापचा लाल बावटा अनेक वर्षांपासून फडकत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील शेकापच्या बाळाराम पाटील यांना ग्रामीण भागातून चांगले मताधीक्य मिळाले होते. पूर्वीचे काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ग्रामीण भागात भाजपाला ‘अच्छे दिन’ आल्याचे बोलले जात आहे. अनेक ठिकाणी शेकाप विरुद्ध भाजपा अशी लढत रंगली असून काँग्रेसने शेकाप सोबत युती केली आहे. ग्रामीण भागात शिवसेनेचे देखील वर्चस्व असल्याने अनेक ठिकाणी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. ग्रामीण भागातील मतदारांनी उस्फुर्तपणे मतदान केले आहे. कुठेही निवडणुकांना गालबोट लागले नसून सर्वत्र निवडणुका शांततेत पार पडल्या.