शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकांचा नवी मुंबईत प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:35 IST

चाकरमान्यांना गावी येण्याचे आवाहन : घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : विधानसभा व लोकसभा निवडणुकीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे सातारा, अहमदनगर व इतर अनेक जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचे उमेदवार मुंबई, नवी मुंबईत येऊन ग्रामस्थांच्या भेटी घेऊ लागले आहे. मतदानासाठी गावी येण्याचे आवाहन केले जात असून वाहन व्यवस्थेचीही सुविधा केलीआहे. 

राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील तब्बल १४ हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. अनेक गावांमध्ये निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांमधील मूळ गावातील बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत आले आहेत. अनेक गावांमधील ५० टक्केपेक्षा जास्त मतदार मुंबई व नवी मुंबई परिसरात आहेत. यामुळे ग्रामपंचायत उमेदवारांनी प्रचारासाठी येथे तळ ठोकला आहे. घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात आहे. गावाच्या विकासासाठी मतदानाला गावी यावे, असे आवाहन केले जात आहे. अनेक ग्रामस्थांच्या गावकीच्या सामूहिक रूम असून त्या ठिकाणी बैठकाही घेतल्या जात आहेत. गावातील यात्रेपासून सर्व कामांमध्ये मुंबईकरांची भूमिका महत्त्वाची असते. विधानसभा, लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांसाठी खास बसेसची सुविधाही केली जाते. प्रथमच ग्रामपंचायतीसाठी चाकरमान्यांना गावी येण्याचे आवाहन केले जात आहे.

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे उमेदवार रविवारपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांनी ठाणे, मीरा-भाईंदर, मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांना गावी येण्याचे आवाहन केले. अहमदनगर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या उमेदवारांचाही नवी मुंबई, पनवेल परिसरात प्रचार सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये २० ते ४० वर्षांत पहिल्यांदा निवडणूक होत आहे. यामुळे तेथील निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. यामुळे मुंबईमध्ये येऊन प्रत्येक ग्रामस्थांच्या भेटी घेत असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. 

मीडियाही मुंबईकरांकडेनिवडणुकांसाठी सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. गावातील मुंबई, नवी मुंबईत राहणारे तरुण सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळत असल्याचेही पाहावयास मिळत आहे. यामुळे विधानसभा व लोकसभेप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही प्रचाराचा धुरळा उडाला आहे.

वाहनांचीही सुविधाग्रामपंचायतीच्या मतदानासाटी जाता यावे यासाठी अनेक गावांतील नागरिकांनी बस बुकिंग केले आहे. सर्वांना वेळेत गावी जाता यावे व एक दिवसात पुन्हा मुंबई, नवी मुंबईत येता यावे यासाठी स्वेच्छेने वाहनांची बुकिंग केल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे.

गावाच्या विकासामध्ये मुंबईत राहणाऱ्या नागरिकांचेही मोठे योगदान असते. अनेक चाकरमान्यांची मतदार यादीमध्ये नावे आहेत. सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी घरोघरी जाऊन त्यांना मतदानासाठी येण्याचे आवाहन आम्ही केले आहे.- योगेश जांभळे, ग्रामस्थ,जांभळमुरे, सातारा

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईElectionनिवडणूक