शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

पावसाच्या पुनरागमनामुळे गोविंदा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:14 IST

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे गोविंदा सुखावला आहे

नवी मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे गोविंदा सुखावला आहे. मंगळवारी ठिकठिकाणी रचल्या जाणाºया हंड्या फोडण्याच्या प्रयत्नात गोविंदांकडून मानवी मनोरे रचले जाणार असून पावसाच्या सरींमुळे टँकरद्वारे पाण्याचा फवारा करण्याची वेळ आयोजकांवरील टळण्याची शक्यता आहे.काही वर्षांपासून पर्यावरणात झालेल्या बदलामुळे ऐन दहीहंडीच्या कालावधीत पावसाने विश्रांती घेतलेली असते. यामुळे लाखमोलाच्या हंड्या फोडण्याच्या प्रयत्नात एका शहरातून दुसºया शहरात फिरणाºया गोविंदा पथकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत असतो. शिवाय हंडीच्या ठिकाणी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचले जात असताना थरारक प्रसंग निर्माण करण्यासाठी दहीहंडी आयोजकांकडून गोविंदा पथकांवर टँकरद्वारे पाण्याचा मारा केला जातो. यामुळे प्रतिवर्षी दहीहंडीच्या दिवशी लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असते. परंतु गतवर्षी राज्यात अनेक ठिकाणी असलेल्या दुष्काळाचे भान राखून अनेक आयोजकांनी पाण्याचा अपव्यय टाळला होता. यामुळे पाण्याची बचत होत असली तरी गोविंदांकडून मात्र नाराजी व्यक्त केली जात होती. यंदाही पाण्याअभावी गोविंदा नाराज होण्याची शक्यता होती. मात्र ऐन कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने गोविंदांसह दहीहंडी आयोजक देखील सुखावला आहे. पावसाचा असाच जोर दुसºया दिवसापर्यंत राहिल्यास दहीहंडीच्या दिवशी तापमान काही अंशाने कमी होवून गोविंंदांचा थकवा कमी होण्यास मदत होणार आहे. तर अनेक आयोजकांनी ठरवलेले पाण्याचे टँकर देखील रातोरात रद्द केले आहेत.सोमवारी सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळत होते. जोराच्या वाºयामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचे देखील प्रकार घडले. मात्र यामध्ये कोणती गंभीर दुर्घटना घडलेली नाही.अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळी ८.५० वाजल्यापासून संध्याकाळी ५.३० पर्यंत ३१.९२ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.बेलापूर विभागात १५.०४ मि.मी., नेरुळ विभागात ३५.०६ मि.मी., वाशी विभागात २७.०७ तर ऐरोली विभागात ४९.०० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आपत्कालीन विभागात झाली आहे.पाऊस सुरू झाल्याने गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सवातही अधूनमधून पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.