शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

पावसाच्या पुनरागमनामुळे गोविंदा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:14 IST

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे गोविंदा सुखावला आहे

नवी मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे गोविंदा सुखावला आहे. मंगळवारी ठिकठिकाणी रचल्या जाणाºया हंड्या फोडण्याच्या प्रयत्नात गोविंदांकडून मानवी मनोरे रचले जाणार असून पावसाच्या सरींमुळे टँकरद्वारे पाण्याचा फवारा करण्याची वेळ आयोजकांवरील टळण्याची शक्यता आहे.काही वर्षांपासून पर्यावरणात झालेल्या बदलामुळे ऐन दहीहंडीच्या कालावधीत पावसाने विश्रांती घेतलेली असते. यामुळे लाखमोलाच्या हंड्या फोडण्याच्या प्रयत्नात एका शहरातून दुसºया शहरात फिरणाºया गोविंदा पथकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत असतो. शिवाय हंडीच्या ठिकाणी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचले जात असताना थरारक प्रसंग निर्माण करण्यासाठी दहीहंडी आयोजकांकडून गोविंदा पथकांवर टँकरद्वारे पाण्याचा मारा केला जातो. यामुळे प्रतिवर्षी दहीहंडीच्या दिवशी लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असते. परंतु गतवर्षी राज्यात अनेक ठिकाणी असलेल्या दुष्काळाचे भान राखून अनेक आयोजकांनी पाण्याचा अपव्यय टाळला होता. यामुळे पाण्याची बचत होत असली तरी गोविंदांकडून मात्र नाराजी व्यक्त केली जात होती. यंदाही पाण्याअभावी गोविंदा नाराज होण्याची शक्यता होती. मात्र ऐन कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने गोविंदांसह दहीहंडी आयोजक देखील सुखावला आहे. पावसाचा असाच जोर दुसºया दिवसापर्यंत राहिल्यास दहीहंडीच्या दिवशी तापमान काही अंशाने कमी होवून गोविंंदांचा थकवा कमी होण्यास मदत होणार आहे. तर अनेक आयोजकांनी ठरवलेले पाण्याचे टँकर देखील रातोरात रद्द केले आहेत.सोमवारी सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळत होते. जोराच्या वाºयामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचे देखील प्रकार घडले. मात्र यामध्ये कोणती गंभीर दुर्घटना घडलेली नाही.अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळी ८.५० वाजल्यापासून संध्याकाळी ५.३० पर्यंत ३१.९२ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.बेलापूर विभागात १५.०४ मि.मी., नेरुळ विभागात ३५.०६ मि.मी., वाशी विभागात २७.०७ तर ऐरोली विभागात ४९.०० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आपत्कालीन विभागात झाली आहे.पाऊस सुरू झाल्याने गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सवातही अधूनमधून पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.