शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नवी मुंबईच्या स्वच्छतेसह सौंदर्यावर शासनाची मोहर; क वर्ग गटात राज्यात पहिला क्रमांक 

By नामदेव मोरे | Updated: April 20, 2023 19:00 IST

नवी मुंबई : राज्य शासनाच्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये क वर्ग महानगरपालिका गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात प्रथम ...

नवी मुंबई : राज्य शासनाच्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये क वर्ग महानगरपालिका गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात महानगरपालिकेला १५ कोटीचा धनादेश देण्यात आला. स्वच्छता अभियानामध्ये महानगरपालिकेची कामगिरी सातत्याने उंचावत असून शहरात राबविण्यात आलेले प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर पथदर्शी ठरू लागले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये देशात तीसरा व राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. २०२३ मध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचे उद्दीष्ट निश्चीत करुन अभियान राबविले जात आहे. शासनाने आयोजीत केलेल्या स्पर्धेमध्ये क वर्ग महानगरपालिका गटात पहिला क्रमांक मिळविला असून मुंबईमधील एनसीपीए सभागृहात मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. महानगरपालिकेने झोपडपट्टी, गावठाणासह सिडको विकसीत विभागामध्येही प्रभावीपणे स्वच्छता अभियान राबविले आहे. सामाजीक संघटना, विद्यार्थी, नागरिक, लोकप्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्याने नियमीत श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जात आहे. 

घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अद्ययावत केली असून कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मीती केली जात आहे. मोकळ्या भूखंडांवरील कचरा साफ करून त्यांचे सुशोभीकरण केले आहे. उड्डाणपुलाखाली दोन ठिकाणी मैदान तयार केले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, रचना संसद अशा नामांकित कला महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शहरातील भिंती, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, शाळा व इतर इमारतींच्या भिंती रंगविण्यात आल्या असून आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. महत्वाच्या ठिकाणी संतांचे अभंग, कवितांच्या ओळी रेखाटण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईमध्ये येणारा प्रत्येक नागरिक येथील स्वच्छता व सौंदर्य पाहून प्रभावीत होऊ लागला आहे. महानगरपालिकेने राबविलेल्या या उपक्रमांची दखल शासनाने घेतली असून क वर्ग गटात मनपाला पहिला क्रमांक मिळाला आहे. १५ कोटी रुपयांचा धनादेश स्विकारताना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घरनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी केले कौतुकस्वच्छतेप्रमाणे शहर सुशोभीकरणावर नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले आहे. सुशोभीकरणासाठी अभिवन संकल्पना राबविण्यात आल्या आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येकाला येथील सौंदर्य दृष्टीस पडत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाचे कोतुक केले. सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेला पुरस्कार प्रत्येक अभियानात सक्रीय सहभाग घेणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांना समर्पीत आहे. कोणताही पुरस्कार हा चांगले काम केल्याबद्दल प्रोत्साहीत करणारा असून अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी वाढविणारा असतो. यापुढील काळातही निश्चय केला नंबर पहिला हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबविले जाईल. - राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका 

  • नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलले स्वच्छता उपक्रम
  • इमारतींच्या संरक्षण भिंती, उड्डाणपुलांवर आकर्षक चित्रांचे रेखाटन.
  • उड्डाणपुलाखालील कचरा साफ करून मैदानाची निर्मीती व सुशोभीकरण.
  • शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये टाकाऊपासून आकर्षक शिल्पांची उभारणी.
  • विद्यार्थ्यांसाठी ड्राय वेस्ट बॅंक संकल्पनेची अंमलबजावणी.
  • घनकचरा व्यवस्थापनासाठी अधुनीक तंत्राचा वापर.
  • ओल्या कचऱ्यापासून खत निर्मीती, बांधकाम साहित्यावरही प्रक्रिया सुरु.
  • मोकळे भूखंड स्वच्छ करून हरीत पट्यांचा विकास 
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस