शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी सरकारनेच मागवली माहिती

By admin | Updated: July 4, 2017 07:03 IST

राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये स्वच्छ भारत अभियानाचा निधी न मिळाल्याने शौचालयांची कामे रखडली होती, तर काही लाभार्थ्यांना

आविष्कार देसाई/लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये स्वच्छ भारत अभियानाचा निधी न मिळाल्याने शौचालयांची कामे रखडली होती, तर काही लाभार्थ्यांना त्यांचे अनुदानच दिले नव्हते. त्यामुळे २०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षांमधील प्रगतीचा अहवाल राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्रशासनाने सरकारला सादर केला, तेव्हा त्यामध्ये भौतिक प्रगतीच्या तुलनेत आर्थिक प्रगती कमी दिसून आली. लाभार्थ्यांना अनुदान देण्याचे दिलेले वचन सरकारकडून पाळले न गेल्याने, उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी आता सरकारनेच किती अनुदानाची आवश्यकता आहे. याबाबतची माहिती विविध जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून मागितली आहे.रायगड जिल्हा परिषदेला ३८ हजार ८७९ शौचालयांची उभारणी करायची होती. १३ हजार ६२५ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे, तर आठ हजार ७९ कामे प्रगतिपथावर आहेत. १७ हजार १७५ कामे १५ आॅगस्ट २०१७पर्यंत पूर्ण करायची आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यासाठी आपापले अनुदान यासाठी देते. लाभार्थ्याला १२ हजार रुपये शौचालयाच्या बांधकामासाठी दिले जातात. स्वच्छ भारत अभियानाची कास धरत मोठ्या संख्येने शौचालयांची निर्मिती करण्यात आली; परंतु अद्यापही जिल्ह्यातील सुमारे २९ हजार लाभार्थ्यांचे ३४ कोटी ८० लाख रुपये सरकारने दिलेले नाहीत. ‘लोकमत’ने याबाबत आवाज उठवून जिल्ह्यासह राज्यभरातील स्वच्छ भारत अभियानाचे विदारक चित्र समोर आणले होते.सरकारसह प्रशासनला हे अभियान पुढे रेटायचे असल्याने मोठा गाजावाजा करून समाजातील घटकांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरित केले गेले. सरकारच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व घटकांनी त्यामध्ये पुढाकार घेतला. त्यामुळे सरकार त्यामध्ये यशस्वी होताना दिसू लागले आहे; परंतु सरकारने फक्त शौचालयांच्या आकड्यांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याने लाभार्थ्यांना अनुदान देण्याच्या वचनाचा सरकारला जणू विसरच पडला. त्याचाच परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल २९ हजार लाभार्थ्यांना ३४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. अशीच कमी-अधिक परिस्थिती उर्वरित जिल्ह्यांची आहे.राज्यातील विविध जिल्हा परिषदांनी २०१६-१७ आणि २०१७-१८चा स्वच्छ भारत अभियानाचा प्रगती अहवाल सरकारला सादर केला, तेव्हा त्यामध्ये तफावत दिसून आली. शौचालयांची संख्या जास्त, तर आर्थिक खर्च कमी दिसल्याने पाणी व स्वच्छता साहाय्य संस्थेचे संचालक डॉ. स. दे. अरीकर यांनी संबंधित जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला विचारणा केली आहे. तसेच किती रकमेच्या अनुदानाची आवश्यकता आहे, ही महत्त्वपूर्णबाबही अधोरेखित केली आहे. ही माहिती ५ जुलै २०१७पर्यंत सरकारला कळविण्यात यावी, असेही संचालकांनी म्हटले आहे. हे पत्र १ जुलै २०१७ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाठविले आहे.राज्यातील यादीत रायगड तिसऱ्या स्थानावररायगड जिल्ह्याने शौचालयांच्या बांधकामात प्रगती केल्याने राज्याच्या यादीत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. चंद्रपूर जिल्हा प्रथम तर, पालघर जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. रायगड जिल्ह्यासाठी केंद्र सरकारने २०१७-१८साठी १८ कोटी चार लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे राज्याचा सुमारे १२ कोटी रुपयांचा हिस्साही लवकरच प्राप्त होणार असल्याने कोणाताही लाभार्थी वंचित राहणार नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारचा मंजूर झालेला १८ कोटी रुपयांचा निधी अद्यापही जिल्हा परिषदेच्या खात्यावर वर्ग झालेला नाही, हे विशेष आहे.