शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

समुद्रकिनारी हवेत गोएन्स बंधारे

By admin | Updated: February 5, 2016 02:56 IST

समुद्रकिनारी पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समुद्रसुरक्षा व पर्यटन विकासाकरिता विशेष आर्थिक सहाय्य मिळावे

जंजिरा : समुद्रकिनारी पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समुद्रसुरक्षा व पर्यटन विकासाकरिता विशेष आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष अशोक धुमाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती मुख्याधिकारी वंदना गुळवे यांनी दिली. समुद्रकिनारी गोएन्स बंधारा ही मागणी गेली दोन दशके शासनाकडे सुरु आहे. संतोष नवआळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद असतानापासून हा प्रस्ताव आहे. या बंधाऱ्यामुळे सध्या असलेला धोकादायक भोवऱ्याची जागा नष्ट होवून समुद्रकिनारा पूर्णत: सुरक्षित होणार आहे. मच्छीमार बोटींना भरतीपर्यंत थांबावे लागते. त्यामधून होणारे आर्थिक नुकसान थांबू शकेल. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानापासून सदरची मागणी शासनाकडे प्रलंबित आहे. हा बंधारा तवसाळकर वाडीपासून दुर्घटनाग्रस्त जागेपर्यंत पूर्व-पश्चिम होऊ शकेल. यामुळे नैसर्गिक खाडीमुखाचा भाग खोल व सुरक्षित होईल. बंधाऱ्याचा बाकी परिसर पर्यटकांना स्वच्छतागृह व इतर सुविधांसाठी होवू शकेल. शासनाकडून भौगोलिक अभ्यास घेऊन हा बंधारा व्हावा, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण अडीच कि.मी. किनारपट्टी सुरक्षित राहावी याकरिता टेहळणी मनोरा, शासनाकडून कायमस्वरुपी जीवरक्षक नेमणूक, संपूर्ण समुद्रकिनारा सुशोभीकरण व पर्यटन सक्षम होण्यासाठी मदत, किनारपट्टी धूपप्रतिबंधक बंधारा याकरिता शासनाने विशेष पर्यटन विकासनिधी तातडीने द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे आमदार पंडित पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मृत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देवून त्यांचे जीवन परत मिळणार नाही. पण सरकारने वेळीच मुरुडकरांची मागणी पूर्ण केली असती तर कदाचित पुण्याचे हे दुर्दैवी विद्यार्थी वाचले असते, असे संवेदनशील प्रतिपादन पाटील यांनी केले. आता तरी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)