शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

श्वानप्रेमासाठी गोवा ते मुंबई पदयात्रा !

By admin | Updated: November 22, 2015 00:44 IST

भटक्या श्वानांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यासाठी गोव्याची व्यक्ती मुंबईच्या पदयात्रेवर निघाली आहे. गुरुवारी त्यांचे नवी मुंबईत आगमन झाले असून, प्रवासात भेटलेले अनेक

नवी मुंबई : भटक्या श्वानांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यासाठी गोव्याची व्यक्ती मुंबईच्या पदयात्रेवर निघाली आहे. गुरुवारी त्यांचे नवी मुंबईत आगमन झाले असून, प्रवासात भेटलेले अनेक भटके श्वान त्यांनी सोबत आणले आहेत. या प्रवासात त्यांनी अनेक भटक्या जखमी श्वानांवर उपचारदेखील केले असून, काहींना सोबतच आणले आहे.घरामध्ये कुत्रे पाळून त्याचे लाड करायला प्रत्येकालाच आवडते. परंतु रस्त्यावर एखादे भटके कुत्रे दिसल्यास त्याला दगड मारण्याची इच्छाही त्यापैकी अनेकांना होतच असते. मात्र अशा भटक्या कुत्र्यांसाठी घर सोडून त्यांच्यासोबत रस्त्यालगत पदपथावर झोपणारी एक व्यक्ती श्वानांवर प्रेम करण्याचा संदेश देत गोवा ते मुंबईच्या पदयात्रेला निघाली आहे. सुफी मोहम्मद अल्ताफ असे या श्वानप्रेमीचे नाव असून, गुरुवारी त्यांचे नवी मुंबईत आगमन झाले. ६ जुलै रोजी त्यांनी गोवा येथून सुमारे ६०० कि.मी.च्या या पदयात्रेला सुरुवात केली आहे. मूळच्या काश्मीरच्या सुफी यांनी पाच वर्षांपूर्वी श्रीनगर सोडून गोव्यातच मुक्काम केला आहे. यादरम्यान सन २०१० मध्ये त्यांच्या दुर्लक्षामुळे ९ श्वानांचा मृत्यू झाल्याची घटना त्यांच्या मनाला लागली. तेव्हापासून सुफी यांनी हिमाचल ते दिल्ली, काश्मीर ते मुंबई असा पायी प्रवास केला आहे. यानंतर गोवा ते मुंबई पदयात्रा करून भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न शासनापुढे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर कोकणातून ते येत असताना तिथले मोहम्मद मुल्ला यांनाही त्यांचा उपक्रम आवडल्याने तेदेखील त्यामध्ये सहभागी झाले आहेत. या प्रवासात त्यांनी रस्त्यालगतच्या अनेक भटक्या कुत्र्यांवर उपचार करून काहींना प्रवासात सोबत घेतले आहे.मात्र अद्यापपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आपल्याला केवळ सहानुभूती मिळाल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यांच्यासोबतचा एक श्वान काही दिवसांपासून आजारी आहे. मात्र श्वानप्रेमाच्या घोषणा करीत निधी लाटणाऱ्यांपैकी एकही संस्था त्याच्या मदतीसाठी पुढे आलेली नाही. अशा संस्थांनी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून श्वानांची काळजी घेतल्यास एकाही भटक्या श्वानाचा आजाराने मृत्यू होणार नाही, असाही त्यांचा विश्वास आहे. मात्र दिवसभराच्या प्रवासानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांना रस्त्यालगतच निवारा शोधावा लागत आहे. सोबत कुत्रे असल्याने त्यांना निवारा केंद्रात किंवा हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. वाहन अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वाहनचालकावर कारवाई होते. मात्र त्याच वाहनाच्या धडकेने एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास कसलीही कारवाई होत नाही. त्यामुळे यासंबंधीचा देशात कायदा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.