शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

श्वानप्रेमासाठी गोवा ते मुंबई पदयात्रा !

By admin | Updated: November 22, 2015 00:44 IST

भटक्या श्वानांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यासाठी गोव्याची व्यक्ती मुंबईच्या पदयात्रेवर निघाली आहे. गुरुवारी त्यांचे नवी मुंबईत आगमन झाले असून, प्रवासात भेटलेले अनेक

नवी मुंबई : भटक्या श्वानांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यासाठी गोव्याची व्यक्ती मुंबईच्या पदयात्रेवर निघाली आहे. गुरुवारी त्यांचे नवी मुंबईत आगमन झाले असून, प्रवासात भेटलेले अनेक भटके श्वान त्यांनी सोबत आणले आहेत. या प्रवासात त्यांनी अनेक भटक्या जखमी श्वानांवर उपचारदेखील केले असून, काहींना सोबतच आणले आहे.घरामध्ये कुत्रे पाळून त्याचे लाड करायला प्रत्येकालाच आवडते. परंतु रस्त्यावर एखादे भटके कुत्रे दिसल्यास त्याला दगड मारण्याची इच्छाही त्यापैकी अनेकांना होतच असते. मात्र अशा भटक्या कुत्र्यांसाठी घर सोडून त्यांच्यासोबत रस्त्यालगत पदपथावर झोपणारी एक व्यक्ती श्वानांवर प्रेम करण्याचा संदेश देत गोवा ते मुंबईच्या पदयात्रेला निघाली आहे. सुफी मोहम्मद अल्ताफ असे या श्वानप्रेमीचे नाव असून, गुरुवारी त्यांचे नवी मुंबईत आगमन झाले. ६ जुलै रोजी त्यांनी गोवा येथून सुमारे ६०० कि.मी.च्या या पदयात्रेला सुरुवात केली आहे. मूळच्या काश्मीरच्या सुफी यांनी पाच वर्षांपूर्वी श्रीनगर सोडून गोव्यातच मुक्काम केला आहे. यादरम्यान सन २०१० मध्ये त्यांच्या दुर्लक्षामुळे ९ श्वानांचा मृत्यू झाल्याची घटना त्यांच्या मनाला लागली. तेव्हापासून सुफी यांनी हिमाचल ते दिल्ली, काश्मीर ते मुंबई असा पायी प्रवास केला आहे. यानंतर गोवा ते मुंबई पदयात्रा करून भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न शासनापुढे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर कोकणातून ते येत असताना तिथले मोहम्मद मुल्ला यांनाही त्यांचा उपक्रम आवडल्याने तेदेखील त्यामध्ये सहभागी झाले आहेत. या प्रवासात त्यांनी रस्त्यालगतच्या अनेक भटक्या कुत्र्यांवर उपचार करून काहींना प्रवासात सोबत घेतले आहे.मात्र अद्यापपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आपल्याला केवळ सहानुभूती मिळाल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यांच्यासोबतचा एक श्वान काही दिवसांपासून आजारी आहे. मात्र श्वानप्रेमाच्या घोषणा करीत निधी लाटणाऱ्यांपैकी एकही संस्था त्याच्या मदतीसाठी पुढे आलेली नाही. अशा संस्थांनी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून श्वानांची काळजी घेतल्यास एकाही भटक्या श्वानाचा आजाराने मृत्यू होणार नाही, असाही त्यांचा विश्वास आहे. मात्र दिवसभराच्या प्रवासानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांना रस्त्यालगतच निवारा शोधावा लागत आहे. सोबत कुत्रे असल्याने त्यांना निवारा केंद्रात किंवा हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. वाहन अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वाहनचालकावर कारवाई होते. मात्र त्याच वाहनाच्या धडकेने एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास कसलीही कारवाई होत नाही. त्यामुळे यासंबंधीचा देशात कायदा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.