शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी द्या

By admin | Updated: April 19, 2017 00:55 IST

सन २००० पर्यंतच्या झोपडधारकांना नळजोडणी देण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी दिलेच पाहिजे.

नवी मुंबई : सन २००० पर्यंतच्या झोपडधारकांना नळजोडणी देण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी दिलेच पाहिजे. पाण्यापासून कोणालाही वंचित ठेवू नये, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली आहे. प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये डिसेंबर २००० पर्यंत शहरात ४१ हजार ५०५ झोपड्या असल्याचे निदर्शनास आले आहे. झोपडीधारकांना वैयक्तिक नळजोडणी देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर केला होता. प्रस्तावावर चर्चा करताना शिवसेना नगरसेवकांनी प्रशासनावर व सत्ताधाऱ्यांवर टीका केली. २०१५ पर्यंतची घरे कायम करण्यासाठी आंदोलन करता व २००० पर्यंतच्या झोपडीधारकांना नळजोडणी देण्याचा प्रस्ताव सादर करणे चुकीचे आहे. वीज व पाण्याशिवाय शहरात कोणीही राहू शकत नाही. वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरण मागेल त्याला वीज देते. त्याच धर्तीवर पालिकेनेही २०१७ पर्यंतच्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी द्यावे, अशी मागणी केली. अनेक झोपड्या २००० पूर्वीच्या आहेत. पण मूळ मालकाने झोपडी विकली आहे. मग ज्याने झोपडी विकत घेतली त्यांना पाणी देणार नाही का, असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी असल्याने नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. अपर्णा गवते, शुभांगीताई पाटील, शशिकला पाटील, रंगनाथ औटी, शंकर मोरे, बहादूर बिस्ट यांच्यासह अनेक नगरसेवकांनी गावठाण, माथाडी वसाहत, झोपडपट्टी परिसरातील पाणी समस्येवर लक्ष वेधले. मोरबे धरणाचे पाणी दिघापर्यंत का जात नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, झोपडपट्टीमधील नागरिकांना नळजोडणी आहे. यापूर्वी नळजोडणी घेण्याची प्रक्रिया क्लिष्ट होती. आता फक्त दोन पुरावे असले की तत्काळ नळजोडणी देण्यात येणार आहे. २००० नंतरच्या नागरिकांसाठी ठाण्याच्या धर्तीवर अभय योजना सुरू करता येईल का याचीही माहिती घेतली जाईल, असे स्पष्ट केले. बहुमताने ठराव मंजूर झाला असला तरी शिवसेनेने सर्वांना पाणी देण्याचा आग्रह कायम ठेवला.