शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी द्या

By admin | Updated: April 19, 2017 00:55 IST

सन २००० पर्यंतच्या झोपडधारकांना नळजोडणी देण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी दिलेच पाहिजे.

नवी मुंबई : सन २००० पर्यंतच्या झोपडधारकांना नळजोडणी देण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. वीजमीटर असलेल्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी दिलेच पाहिजे. पाण्यापासून कोणालाही वंचित ठेवू नये, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली आहे. प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये डिसेंबर २००० पर्यंत शहरात ४१ हजार ५०५ झोपड्या असल्याचे निदर्शनास आले आहे. झोपडीधारकांना वैयक्तिक नळजोडणी देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर केला होता. प्रस्तावावर चर्चा करताना शिवसेना नगरसेवकांनी प्रशासनावर व सत्ताधाऱ्यांवर टीका केली. २०१५ पर्यंतची घरे कायम करण्यासाठी आंदोलन करता व २००० पर्यंतच्या झोपडीधारकांना नळजोडणी देण्याचा प्रस्ताव सादर करणे चुकीचे आहे. वीज व पाण्याशिवाय शहरात कोणीही राहू शकत नाही. वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरण मागेल त्याला वीज देते. त्याच धर्तीवर पालिकेनेही २०१७ पर्यंतच्या प्रत्येक झोपडीधारकाला पाणी द्यावे, अशी मागणी केली. अनेक झोपड्या २००० पूर्वीच्या आहेत. पण मूळ मालकाने झोपडी विकली आहे. मग ज्याने झोपडी विकत घेतली त्यांना पाणी देणार नाही का, असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये अनेक त्रुटी असल्याने नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. अपर्णा गवते, शुभांगीताई पाटील, शशिकला पाटील, रंगनाथ औटी, शंकर मोरे, बहादूर बिस्ट यांच्यासह अनेक नगरसेवकांनी गावठाण, माथाडी वसाहत, झोपडपट्टी परिसरातील पाणी समस्येवर लक्ष वेधले. मोरबे धरणाचे पाणी दिघापर्यंत का जात नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, झोपडपट्टीमधील नागरिकांना नळजोडणी आहे. यापूर्वी नळजोडणी घेण्याची प्रक्रिया क्लिष्ट होती. आता फक्त दोन पुरावे असले की तत्काळ नळजोडणी देण्यात येणार आहे. २००० नंतरच्या नागरिकांसाठी ठाण्याच्या धर्तीवर अभय योजना सुरू करता येईल का याचीही माहिती घेतली जाईल, असे स्पष्ट केले. बहुमताने ठराव मंजूर झाला असला तरी शिवसेनेने सर्वांना पाणी देण्याचा आग्रह कायम ठेवला.