शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईतही मुलींची बाजी

By admin | Updated: May 26, 2016 02:56 IST

बारावीच्या परीक्षेत राज्यासह नवी मुंबईतही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील ५४ महाविद्यालयांमधून ७८५९ मुले तर ५६९१ मुली असे एकूण १४ हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

नवी मुंबई : बारावीच्या परीक्षेत राज्यासह नवी मुंबईतही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील ५४ महाविद्यालयांमधून ७८५९ मुले तर ५६९१ मुली असे एकूण १४ हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६३८२ मुले व ५६९१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. २५ महाविद्यालयांचा निकाल ९० टक्केहून अधिक तर तीन महाविद्यालयांचा १०० टक्के लागला आहे.राज्यातील विद्यार्थ्यांसह पालकांचे डोळे लागून राहिलेला बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. तूर्तास आॅनलाइनवर विद्यार्थ्यांना हा निकाल उपलब्ध करुन देण्यात आला असून छापील गुणपत्रक ३ जूनला दिले जाणार आहे. नवी मुंबईतून फ्रेश व रिपीटर अशा तब्बल १४ हजार १७८ विद्यार्थ्यांनी विविध शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ७८५९ मुले तर ६३१९ मुलींचा समावेश होता. त्यांच्यापैकी ६३८२ मुलांनी व ५६९१ मुलींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४.६६ टक्केने राज्याचा निकाल घसरला आहे. त्यामध्ये सर्वाधिक घसरण कला शाखेतल्या निकालाची झाली आहे. असे असले तरीही उत्तीर्ण होण्यामध्ये नेहमीप्रमाणेच यंदाही राज्यासह नवी मुंबईतही मुलींनी बाजी मारली आहे.मागील काही वर्षांत नवी मुंबई देखील विद्यानगरी म्हणून ओळखली जावू लागली आहे. नवी मुंबई परिसरात महाविद्यालयांचे जाळे पसरले असून त्यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शैक्षणिक संस्था व त्यामधील शिक्षक हे देखील प्रयत्न करत असतात. अशा २५ महाविद्यालयांचा निकाल ९० टक्केहून अधिक लागलेला आहे, तर तीन महाविद्यालयांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. मुंबई विभागात ५१८ मुख्य व २५ उपकेंद्रांवर बारावीची परीक्षा झाली होती. परीक्षेदरम्यान २१ विद्यार्थी कॉपी करताना आढळल्याचे मुंबई विभागीय अध्यक्ष डी. जगताप यांनी सांगितले.