शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

मुलींना मिळाले हक्काचे वसतिगृह, खांदा वसाहतीत आदिवासी मुलींसाठी उभारली इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:29 IST

पनवेल : पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे खांदा वसाहतीतील हक्काच्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणीदेखील विद्यार्थिनींचे प्रश्न संपलेले दिसत नाहीत. त्यांना पाण्यासाठी सिडकोकडे तर इंटरनेटसाठी एमटीएनएलकडे पाठपुरावा करावा लागत आहे.पनवेल तालुक्यात एकमेव असलेले आदिवासी मुलींचे वसतिगृह खांदा वसाहतीतील नवीन व हक्काच्या ...

पनवेल : पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे खांदा वसाहतीतील हक्काच्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणीदेखील विद्यार्थिनींचे प्रश्न संपलेले दिसत नाहीत. त्यांना पाण्यासाठी सिडकोकडे तर इंटरनेटसाठी एमटीएनएलकडे पाठपुरावा करावा लागत आहे.पनवेल तालुक्यात एकमेव असलेले आदिवासी मुलींचे वसतिगृह खांदा वसाहतीतील नवीन व हक्काच्या इमारतीत काही दिवसांपूर्वी स्थलांतरित झाले आहे. शिक्षणासाठी अनेक मुली पनवेल शहरात दाखल होत असतात. मात्र, राहण्याची सोय नसल्याने मिळेल त्या ठिकाणी बिºहाड टाकले जाते. शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आकुर्ली गावात असणाºया खोल्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थिनींची तात्पुरती सोय करण्यात आली होती. शाळेपासून हे वसतिगृह लांब असल्याने बहुतांशी मुली रोज सकाळी चालत शाळा गाठत होत्या.आकुर्ली मालेवाडी येथील भाड्याच्या सात रूममध्ये कार्यालय, स्टोअर रूमसह ७६ मुलींना दाटीवाटीने राहावे लागत असे. २००७पासून भाड्याने जागेत सुरू असलेल्या वसतिगृहाला तब्बल १० वर्षांनी हक्काची जागा मिळाली आहे. ३ कोटी ५२ लाख खर्च करून ३ माळ्यांची इमारत बांधून देण्यात आलेली आहे. मात्र, सद्यस्थितीत बोअरवेलचे पाणी विद्यार्थिनी वापरत आहेत. सिडकोकडून पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही, तर पूर्वी आकुर्ली येथे बीएसएनएलचे नेट वापरत होते. नवीन इमारतीत नेटची सुविधा नसल्याने कामाचा खोळंबा होत आहे. २०११मध्ये पनवेलच्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे तत्कालीन गृहपाल विजय मोरे यांनी प्रयत्न करून सिडकोकडून खांदा वसाहतीत मुलींच्या वसतिगृहासाठी भूखंड मिळवला होता.वसतिगृहात ३३ खोल्या असून, १ कॉमन रूम, १ संगणक रूम, १ अभ्यास रूम असून २९ रूम मुलींसाठी आहेत. या आदिवासी वसतिगृहात ७६ मुली राहत असून ११ वी, १२ वी, नर्सिंग, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. पाण्याचा पुरवठ्याबाबत सिडकोचे राहुल सरोदे यांना विचारले पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्याने आनंद झाला आहे. आमच्या हक्काची इमारत मिळाली आहे. भाड्याच्या खोल्यांमध्ये झोपायला बेड देखील नव्हते. दाटीवाटीने राहावे लागत असे.- जयश्री गुट्टे,विद्यार्थिनीनवीन इमारतीत राहायला आल्याने कॉलेजला लवकर जायला मिळते. पूर्वीच्या भाड्याच्या खोल्यांमध्ये राहत असताना खूप लांब चालत जावे लागत असे. या ठिकाणी मोकळेपणाने राहत आहोत. या ठिकाणी सिडकोने पाणीपुरवठा करून द्यायला हवा.- राणी उघडे,विद्यार्थिनी