शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे नामफलक गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:53 IST

घणसोली गावाला स्वातंत्र्य लढ्याची ऐतिहासिक ओळख आहे. या गावातील अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. अनेकांनी तुरुंगवास भोगला होता.

नवी मुंबई : घणसोली गावाला स्वातंत्र्य लढ्याची ऐतिहासिक ओळख आहे. या गावातील अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. अनेकांनी तुरुंगवास भोगला होता. या गावाची ऐतिहासिक ओळख अबाधित राहावी, यादृष्टीने महापालिकेने गावातील स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना म्हणून ठिकठिकाणी १४ नामफलक लावले होते, परंतु काळाच्या ओघात हे सर्व नामफलक गायब झाले आहेत.ब्रिटिश राजवटीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी तुरुंगवास भोगला, लाठीचार्ज सहन केला, काळ्या पाण्याची आणि नजरकैदेची शिक्षा भोगली अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा मिळावा यादृष्टीने महापालिकेने गावातील प्रमुख चौक व रस्त्यांचे नामकरण केले होते. गावातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचे फलक लावण्यात आले होते. परंतु या फलकांची, चबुतऱ्याची नियमित देखरेख करण्यात आली नाही. त्यामुळे यातील बहुतांशी फलक आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गावातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात महापालिकेने २0 मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यसंग्राम चौक उभारण्यात आला होता. मात्र मागील काही वर्षात या चौकाला आता महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरने विळखा घातला आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यसंग्राम चौकाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.शंकर शनिवार पाटील, रामा दिवड्या रानकर, महादू गांडूल पाटील, आंबो लडक्या पाटील, पदा पोशा पाटील, वामन पदा पाटील,रघुनाथ कृष्णा पवार, नारायण मरोजी मढवी, वाल्मीक महादू पाटील,चाहू आंबो पाटील, जोमा पदा पाटील, वाळक्या उंदºया पाटील, परशुराम पदा पाटील आणि हाल्या हिरा म्हात्रे या १४ स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचे चबुतरे ठिकठिकाणी बांधण्यात आले होते. परंतु आज हे चबुतरे गायब झाले आहेत. या ठिकाणी फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. नामफलकांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात गावातील तरूण मंडळी संघटित झाली आहे. गायब झालेले स्वातंत्र्यसैनिकांचे नामफलक तसेच चबुतºयांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे.