शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे नामफलक गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:53 IST

घणसोली गावाला स्वातंत्र्य लढ्याची ऐतिहासिक ओळख आहे. या गावातील अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. अनेकांनी तुरुंगवास भोगला होता.

नवी मुंबई : घणसोली गावाला स्वातंत्र्य लढ्याची ऐतिहासिक ओळख आहे. या गावातील अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. अनेकांनी तुरुंगवास भोगला होता. या गावाची ऐतिहासिक ओळख अबाधित राहावी, यादृष्टीने महापालिकेने गावातील स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना म्हणून ठिकठिकाणी १४ नामफलक लावले होते, परंतु काळाच्या ओघात हे सर्व नामफलक गायब झाले आहेत.ब्रिटिश राजवटीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी तुरुंगवास भोगला, लाठीचार्ज सहन केला, काळ्या पाण्याची आणि नजरकैदेची शिक्षा भोगली अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना उजाळा मिळावा यादृष्टीने महापालिकेने गावातील प्रमुख चौक व रस्त्यांचे नामकरण केले होते. गावातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचे फलक लावण्यात आले होते. परंतु या फलकांची, चबुतऱ्याची नियमित देखरेख करण्यात आली नाही. त्यामुळे यातील बहुतांशी फलक आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गावातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात महापालिकेने २0 मार्च १९९९ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हणे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यसंग्राम चौक उभारण्यात आला होता. मात्र मागील काही वर्षात या चौकाला आता महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरने विळखा घातला आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यसंग्राम चौकाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.शंकर शनिवार पाटील, रामा दिवड्या रानकर, महादू गांडूल पाटील, आंबो लडक्या पाटील, पदा पोशा पाटील, वामन पदा पाटील,रघुनाथ कृष्णा पवार, नारायण मरोजी मढवी, वाल्मीक महादू पाटील,चाहू आंबो पाटील, जोमा पदा पाटील, वाळक्या उंदºया पाटील, परशुराम पदा पाटील आणि हाल्या हिरा म्हात्रे या १४ स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाचे चबुतरे ठिकठिकाणी बांधण्यात आले होते. परंतु आज हे चबुतरे गायब झाले आहेत. या ठिकाणी फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. नामफलकांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात गावातील तरूण मंडळी संघटित झाली आहे. गायब झालेले स्वातंत्र्यसैनिकांचे नामफलक तसेच चबुतºयांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे.