शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

घणसोली आगारात बसला आग

By admin | Updated: May 29, 2016 03:10 IST

एनएमएमटीच्या आगारात उभ्या असलेल्या बसने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन महिन्यांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात या बस आल्या असून, अद्याप त्यांचा वापरही

नवी मुंबई : एनएमएमटीच्या आगारात उभ्या असलेल्या बसने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन महिन्यांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात या बस आल्या असून, अद्याप त्यांचा वापरही सुरू झालेला नाही. त्यापूर्वीच बसची बॅटरी चार्जिंग होत असताना हा अपघात घडला आहे.केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात २० नव्या मिडी बस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस परिवहनला या बस मिळालेल्या असून त्यापैकी काही बस तीन दिवसांपासून वापरात काढलेल्या आहेत. तर आगार अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याने उर्वरित बस आगारात उभ्याच आहेत. लवकरच त्या बस देखील शहरातल्या विविध मार्गांवर सुरू केल्या जाणार आहेत. त्यापूर्वीच एका बसला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. एका रांगेत सर्व बस उभ्या असताना एका (एमएच ४३ एच ५४२३) बसने पेट घेतला. घटनेवेळी या बसची बॅटरी चार्जिंग करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन या आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगीमध्ये बसचे इंजन पेटल्यामुळे बसचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला आहे. ही आग पसरून लगतच उभ्या असलेल्या इतर बस देखील पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु आगारातील कर्मचारी व अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुर्घटना टळली.सदर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक घनशाम मढवी यांनी आगारात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. परिवहनच्या ताफ्यात नव्यानेच दाखल झालेल्या बसने पेट घेणे ही धोक्याची सूचना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. जर ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी वापरात असताना आग लागली असती तर गंभीर दुर्घटना घडली असती. त्यामुळे नवीन आलेल्या सर्वच मिडी बसची तांत्रिक तपासणी करूनच त्यांच्या वापराबाबत निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)