शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

घणसोली आगारात बसला आग

By admin | Updated: May 29, 2016 03:10 IST

एनएमएमटीच्या आगारात उभ्या असलेल्या बसने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन महिन्यांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात या बस आल्या असून, अद्याप त्यांचा वापरही

नवी मुंबई : एनएमएमटीच्या आगारात उभ्या असलेल्या बसने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन महिन्यांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात या बस आल्या असून, अद्याप त्यांचा वापरही सुरू झालेला नाही. त्यापूर्वीच बसची बॅटरी चार्जिंग होत असताना हा अपघात घडला आहे.केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात २० नव्या मिडी बस दाखल झाल्या आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस परिवहनला या बस मिळालेल्या असून त्यापैकी काही बस तीन दिवसांपासून वापरात काढलेल्या आहेत. तर आगार अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसल्याने उर्वरित बस आगारात उभ्याच आहेत. लवकरच त्या बस देखील शहरातल्या विविध मार्गांवर सुरू केल्या जाणार आहेत. त्यापूर्वीच एका बसला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. एका रांगेत सर्व बस उभ्या असताना एका (एमएच ४३ एच ५४२३) बसने पेट घेतला. घटनेवेळी या बसची बॅटरी चार्जिंग करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन या आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगीमध्ये बसचे इंजन पेटल्यामुळे बसचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला आहे. ही आग पसरून लगतच उभ्या असलेल्या इतर बस देखील पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु आगारातील कर्मचारी व अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य दुर्घटना टळली.सदर घटनेची माहिती मिळताच नगरसेवक घनशाम मढवी यांनी आगारात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. परिवहनच्या ताफ्यात नव्यानेच दाखल झालेल्या बसने पेट घेणे ही धोक्याची सूचना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. जर ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी वापरात असताना आग लागली असती तर गंभीर दुर्घटना घडली असती. त्यामुळे नवीन आलेल्या सर्वच मिडी बसची तांत्रिक तपासणी करूनच त्यांच्या वापराबाबत निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)