शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सर्वसाधारण सभेतील भोजनपुरवठा वादग्रस्त

By admin | Updated: April 21, 2017 00:27 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमधील भोजन पुरवठा पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या भोजनावळीसाठी अधिनियमात काहीही तरतूद नाही

नवी मुंबई : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमधील भोजन पुरवठा पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे. दहा वर्षांपासून सुरू असलेल्या भोजनावळीसाठी अधिनियमात काहीही तरतूद नाही. प्रत्येक सभेला जेवण देणारी नवी मुंबई एकमेव पालिका असून ठेकेदार निकृष्ट जेवण देत असल्याने नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये दुपारी नगरसेवक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, अधिकारी यांच्यासाठी १९९७ पासून जेवण पुरविण्यात येते. ही भोजनावळ दोन वर्षांपासून सातत्याने वादग्रस्त ठरू लागली आहे. शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, राष्ट्रवादीच्या सपना गावडे व इतर अनेक नगरसेवकांनी ठेकेदार निकृष्ट पद्धतीचे जेवण देत असल्याचा आक्षेप सभागृहात घेतला होता. याशिवाय नगरसेवक, अधिकारी, पत्रकार यांच्याशिवाय अनेकजण घुसखोरी करून या अन्नदानाचा लाभ घेवू लागले होते. ही भोजनावळ कोणत्या नियमाप्रमाणे सुरू आहे याविषयी शिवसेना नगरसेवक संजू वाडे यांनी लेखी प्रश्न विचारला होता. जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. ठेकेदाराला समज दिली आहे का याविषयीही विचारणा केली होती. याविषयी माहिती देताना प्रशासनाने भोजन पुरवठ्यासाठी अधिनियमात कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीवरून सचिवांनी वारंवार ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. पुरविण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला नसल्याबद्दल भोजनावळ बंद होण्याची शक्यता आहे. पालिकेने लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, धुळे, पिंपरी चिंचवड, बृहन्मुंबई, नाशिक, अहमदनगर, मीरा भार्इंदर, कोल्हापूर, अमरावती, नागपूर व पुणे महापालिकेमध्ये प्रत्येक सभेच्यावेळी जेवण दिले जात नसल्याचेही स्पष्ट केले असल्याने आता याविषयी प्रशासन नक्की कोण भूमिका घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.