शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

गवळीदेव परिसरही बनला मद्यपींचा अड्डा; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:26 IST

प्रसाधनगृहांची दुरवस्था : धबधबा परिसरातील माहिती फलकांचीही तोडफोड; सुरक्षेसाठी उपाययोजनाच नाही

नामदेव मोरे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्मार्ट सिटीमधील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या गवळीदेव धबधबा परिसराची दुरवस्था झाली आहे. मद्यपींचा वावर वाढला असून, सर्वत्र दारूच्या बाटल्यांचा खच पाहावयास मिळत आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी तयार केलेल्या दोन्ही ठिकाणच्या प्रसाधनगृहांची व माहिती फलकांचीही मोडतोड करण्यात आली आहे. वनविभाग, महानगरपालिका व पोलीस प्रशासनानेही सुरक्षेसाठी काहीही सुविधा केलेली नाही.नवी मुंबईमधील एकमेव सुरक्षित व सुस्थितीमध्ये असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये गवळीदेव धबधबा परिसराचा समावेश होतो. पांडवकडा प्रमाणे येथे अपघात होत नसल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील हजारो पर्यटक येथे येत असतात. ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक, घणसोलीमधील तरुणाई व वनविभागानेही या परिसराचा विकास करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. सर्वांच्या पाठपुराव्याला यश येऊन वनविभागाने धबधब्याकडे जाणारी पायवाट व्यवस्थित केली होती. सर्वत्र पक्षांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. पर्यटकांना बसण्यासाठी लागडी निवारा शेड तयार केले होते, परंतु येथे सुरक्षेसाठी काहीही व्यवस्था केली नाही. परिणामी, धबधबा परिसराची दुरवस्था झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतरही प्रत्येक रविवारी जवळपास दोन हजार पर्यटक या परिसराला भेटी देत आहेत. इतर दिवशीही अनेक पर्यटक जात असतात, परंतु येथील अवस्था पाहून व्यथित होऊन परत यावे लागत आहे.धबधबा परिसरात मद्यपींचा अड्डा बनला आहे. बिनधास्तपणे अनेक तरुण मद्यपान करत असतात. मोकळ्या बाटल्या जागा मिळेल, तेथे टाकून दिल्या जातात. बाटल्यांचा खच ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. निवारा शेडचा वापर खाद्यपदार्थ शिजवण्यासाठी केला जात आहे.सुरक्षा व्यवस्था नाही : गवळी देव परिसरामध्ये वनविभागाने सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था केलेली नाही. यामुळे मद्यपान करणारे बिनधास्तपणे दिवसभर ठाण मांडून बसलेले असतात. नवी मुंबईमधील व बाहेरील पर्यटकही सहकुटुंब येथे येत असतात. मद्यपींना पाहून पर्यटक नाराजी व्यक्त करू लागले आहेत. पोलीसही गस्त घालत नसल्यामुळे व मद्यपींवर कारवाई करत नसल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.गवळीदेव धबधबा परिसरात सहकुटुंब भटकंतीसाठी आलो होतो. मंदिराजवळच मद्यपींचा अड्डा तयार झाल्याचे पहावयास मिळाले. सर्वत्र बाटल्यांचा खच पाहिल्यानंतर कौटुंबिक सहलीसाठी येथे यायचे की नाही, असा प्रश्न पडला आहे.- संजय शिंदे, रहिवासी नेरूळआम्ही प्रत्येक वर्षी गवळीदेव परिसरात पावसाळी पर्यटनासाठी येतो. गतवर्षी येथे उत्तम सुविधा होत्या. या वर्षी प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली आहे. माहिती फलक तुटलेले आहेत. सुरक्षेसाठीही काहीच उपाययोजना दिसल्या नाहीत.- शितल पवार, रहिवासी कोपरखैरणे